शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

भारतीयांचा जुगाड! आता लग्नात नातेवाईकांच्या शिफ्ट्स; प्रत्येकासाठी वेळ फिक्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2020 17:49 IST

लग्नासाठी ५० पाहुण्यांची मर्यादा असल्यानं अनेकांनी शोधला जुगाड

कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन यामुळे एप्रिल-मे महिन्यातील अनेक विवाह सोहळे रद्द झाले. यानंतर आता अनेकांनी जूनमध्ये दोनाचे चार हात करण्याची तयारी सुरू केली आहे. जूनमध्ये लग्नाचे सहा मुहूर्त होते. त्यातील पाच मुहूर्त राहिले आहेत. एका लग्नाला केवळ ५० जणच उपस्थित राहू शकतात, असा नियम आहे. मात्र या नियमाला बगल देण्यासाठी आता वेगवेगळे जुगाड करण्याचा प्रयत्न होत आहे. लग्नात जास्तीत जास्त पाहुण्यांना उपस्थित राहता यावं यासाठी पंजाबमधील काही जणांनी वेगळीच शक्कल लढवली आहे. नातेवाईक आणि मित्रांना शिफ्टमध्ये बोलावण्याची योजना आखण्यात आली आहे. शाकाहारी जेवणास प्राधान्य देणाऱ्यांना ४ ते ६ या वेळेत बोलावलं जात आहे. त्यांच्यासाठी राजमा, चावल, पनीर असा बेत आहे. तर रात्री ६ ते ८ या वेळेत मांसाहारी जेवण आवडणाऱ्यांना निमंत्रित केलं जात आहे. त्यांच्यासाठी मटन, चिकन, कबाब आणि दारूची व्यवस्था करण्यात आली आहे. पाहुण्यांनी लग्नात ३० ते ४५ मिनिटंच थांबावं, अशी विनंतीदेखील करण्यात येत आहे. अनेकांनी यासाठी जिल्हा प्रशासनाकडे रितसर परवानगी मागितली आहे. यामुळे लग्न समारंभात गर्दी कमी होईल. याशिवाय सर्वांनाच यामध्ये सहभागी होता येईल, असा दावा करण्यात येत आहे. यासाठी आतापर्यंत ११ जणांनी जालंदर जिल्हा प्रशासनाकडे अर्ज केले आहेत. मॉडेल टाऊनचे रहिवासी असलेल्या राकेश शर्मांनी अशाच प्रकारचा अर्ज केला आहे. त्यांच्या बहिणीच्या मुलाचं २७ जूनला लग्न आहे. या सोहळ्यात पाहुण्यांना दोन शिफ्टमध्ये बोलावण्याची परवानगी त्यांनी प्रशासनाकडे मागितली आहे. नागरिकांनी सर्व नियमांचं पालन करून लग्न सोहळ्यांचं आयोजन करावं, असं जालंधरचे उपायुक्त वरिंदक कुमार शर्मांनी सांगितलं. लोकांनी नियमांच्या चौकटीत राहावं. तसं केल्यास कोणतीही अडचण येणार नाही. समारंभात ५० पेक्षा जास्त पाहुणे उपस्थित राहता कामा नये. या नियमांचं काटेकोरपणे पालन व्हायला हवं, असं शर्मा म्हणाले.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्न