शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

भारतीयांचा जुगाड! आता लग्नात नातेवाईकांच्या शिफ्ट्स; प्रत्येकासाठी वेळ फिक्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2020 17:49 IST

लग्नासाठी ५० पाहुण्यांची मर्यादा असल्यानं अनेकांनी शोधला जुगाड

कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन यामुळे एप्रिल-मे महिन्यातील अनेक विवाह सोहळे रद्द झाले. यानंतर आता अनेकांनी जूनमध्ये दोनाचे चार हात करण्याची तयारी सुरू केली आहे. जूनमध्ये लग्नाचे सहा मुहूर्त होते. त्यातील पाच मुहूर्त राहिले आहेत. एका लग्नाला केवळ ५० जणच उपस्थित राहू शकतात, असा नियम आहे. मात्र या नियमाला बगल देण्यासाठी आता वेगवेगळे जुगाड करण्याचा प्रयत्न होत आहे. लग्नात जास्तीत जास्त पाहुण्यांना उपस्थित राहता यावं यासाठी पंजाबमधील काही जणांनी वेगळीच शक्कल लढवली आहे. नातेवाईक आणि मित्रांना शिफ्टमध्ये बोलावण्याची योजना आखण्यात आली आहे. शाकाहारी जेवणास प्राधान्य देणाऱ्यांना ४ ते ६ या वेळेत बोलावलं जात आहे. त्यांच्यासाठी राजमा, चावल, पनीर असा बेत आहे. तर रात्री ६ ते ८ या वेळेत मांसाहारी जेवण आवडणाऱ्यांना निमंत्रित केलं जात आहे. त्यांच्यासाठी मटन, चिकन, कबाब आणि दारूची व्यवस्था करण्यात आली आहे. पाहुण्यांनी लग्नात ३० ते ४५ मिनिटंच थांबावं, अशी विनंतीदेखील करण्यात येत आहे. अनेकांनी यासाठी जिल्हा प्रशासनाकडे रितसर परवानगी मागितली आहे. यामुळे लग्न समारंभात गर्दी कमी होईल. याशिवाय सर्वांनाच यामध्ये सहभागी होता येईल, असा दावा करण्यात येत आहे. यासाठी आतापर्यंत ११ जणांनी जालंदर जिल्हा प्रशासनाकडे अर्ज केले आहेत. मॉडेल टाऊनचे रहिवासी असलेल्या राकेश शर्मांनी अशाच प्रकारचा अर्ज केला आहे. त्यांच्या बहिणीच्या मुलाचं २७ जूनला लग्न आहे. या सोहळ्यात पाहुण्यांना दोन शिफ्टमध्ये बोलावण्याची परवानगी त्यांनी प्रशासनाकडे मागितली आहे. नागरिकांनी सर्व नियमांचं पालन करून लग्न सोहळ्यांचं आयोजन करावं, असं जालंधरचे उपायुक्त वरिंदक कुमार शर्मांनी सांगितलं. लोकांनी नियमांच्या चौकटीत राहावं. तसं केल्यास कोणतीही अडचण येणार नाही. समारंभात ५० पेक्षा जास्त पाहुणे उपस्थित राहता कामा नये. या नियमांचं काटेकोरपणे पालन व्हायला हवं, असं शर्मा म्हणाले.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्न