शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

घटत्या लोकसंख्येमुळे चीनचा अजब निर्णय; लग्न न झालेल्या जोडप्यांना दिली मोठी ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 13:48 IST

चीनमध्ये अधिक मुले जन्माला येण्यासाठी लोकांना विशेष सुविधा देण्यात येत आहेत.

दिवसेंदिवस लोकसंख्येत होणारी घट पाहता चीनची डोकेदुखी वाढली आहे. लोकसंख्या वाढीसाठी चीन आता अजबगजब कायदे बनवू लागला आहे. चीनने लोकांना जास्तीत जास्त मुले जन्माला घालणे आणि लग्न सहजपणे व्हावे यासाठी ब्राइड प्राइस नावाची परंपरा संपुष्टात आणली आहे. ही परंपरा म्हणजे मुले मुलीकडच्यांना हुंडा देतात. या लग्नासाठी जवळपास वर्षभर जातो. त्याशिवाय लग्नावरही मोठा खर्च होतो. त्यामुळे अनेक तरुण लग्नही करत नाहीत. आता चीन सरकारने ही परंपरा संपवण्याची घोषणा केली आहे. त्याशिवाय चीन सरकारने लग्न न करता बाळ जन्माला घालण्याची परवानगी दिली आहे. 

लोकसंख्या वाढीसाठी चीनची उपाययोजनाचीन देशाची लोकसंख्या वाढविण्यासाठी सतत नवीन उपाययोजना राबवण्याचा प्रयत्न करीत आहे. गेल्या काही दशकांत चीनमध्ये जन्म दर कमी झाला आहे. इथल्या वृद्ध लोकांची लोकसंख्या वाढली आहे, तर युवक आणि कामगार लोक कमी झाले आहेत. यामुळे अस्वस्थ चीनने गेल्या काही वर्षांत लोकसंख्या वाढविण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या. 

हुंडा प्रणालीविरूद्धही उचलली पावले लोकांनी हुंडा प्रणाली आणि खर्चिक विवाहसोहळाविरूद्धही पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यासाठी जागरूकता मोहिम आयोजित केली जात आहे. या व्यतिरिक्त, अनेक ठिकाणी महिला दिनानिमित्त चीनी सरकारकडून सामूहिक विवाह देखील आयोजित केले जात आहेत.

कपल लिव्ह-इनमध्येही मुले जन्माला घालू शकतातचीनमध्ये अधिक मुले जन्माला येण्यासाठी लोकांना विशेष सुविधा देण्यात येत आहेत. चीनमध्ये एक पुराणमतवादी समाज आहे आणि तेथे कठोर नियम पाळले जातात. परंतु आजकाल चीन सरकार लोकसंख्या वाढविण्यासाठी अशा अनेक उपायांचा अवलंब करीत आहे, ज्याने अनेक जण हैराण झाले आहेत. नियम बदलून चीनच्या सिचुआन प्रांतात आता लग्न न झालेल्या जोडप्यांनाही प्रसूतीची रजा आणि वैद्यकीय खर्च प्रदान करण्यास सुरुवात केली आहे. सिचुआनमध्ये आता लग्न न होता झालेल्या आईलाही त्या सरकारी सुविधांचा फायदा होईल, जे आतापर्यंत फक्त विवाहित जोडप्यांना मिळत असे. सिचुआन हा चीनमधील ५ वा सर्वात मोठा प्रांत आहे. त्याची लोकसंख्या सुमारे साडेतीन कोटी आहे, जी कमी होत आहे. या कारणास्तव, सिचुआन प्रांताने बाकी देशापेक्षा एक पाऊल पुढे विचार केला आहे. देशातील तीन मुलांच्या धोरणाऐवजी सिचुआनने मुलांच्या संख्येवरील प्रत्येक बंदी उठवली आहे. या सुविधा चीनमध्ये उपलब्धमुले होण्यासाठी सरकारने नव्याने विवाहित जोडप्यांना ३० दिवसांची पगाराची रजा देण्याची घोषणा केली आहे. याचा हेतू असा आहे की पती -पत्नी वेळ घालवू शकतात आणि लोकसंख्या वाढविण्यात भागीदार बनू शकतात. यापूर्वी चीनमध्ये लग्नासाठी फक्त तीन दिवसांची पगाराची रजा होती. 

टॅग्स :chinaचीनIndiaभारत