शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या दिवशीच नवरदेवाच्या लव्हस्टोरीचा झाला खुलासा, होणाऱ्या पत्नीची बहिणच निघाली प्रेयसी आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 09:29 IST

2 मे रोजी नवरदेव बॅंडबाजासहीत वरात घेऊन रिंकु कुमारीच्या घरी पोहोचला. मुलीकडील लोकांनी वरातीचं स्वागत केलं आणि लग्नाचे रितीरिवाज सुरू केले.

बिहारच्या सारण जिल्ह्यात एका लग्नात चांगलाच गोंधळ झाला. लग्नासाठी तरूणीच्या घरी वरात घेऊन पोहोचलेल्या नवरदेवाच्या प्रेम प्रकरणाचा अचानक खुलासा झाला. त्यानंतर लग्नात वाद पेटला होता. अशात नवरदेवाचं त्याच्या प्रेयसीसोबत लग्न लावून देण्यात आलं. हैराण करणारी बाब म्हणजे नवरदेवाची प्रेयसी दुसरी कुणी नसून त्याची होणारी मेहुणीच निघाली. दोन्ही परिवाराच्या सहमती त्यांचं लग्न लावून देण्यात आलं.

ही घटना भभौली गावातील आहे. गावात राहणाऱ्या रामू बीनची मुलगी रिंकू कुमारीचं लग्न छपरा शहरातील राजेश कुमार याच्यासोबत जुळलं होतं. 2 मे रोजी त्यांचं लग्न होणार होतं. नवरदेव ठरल्यानुसार वरात घेऊन आला. पण पुढे जे झालं ते सगळ्यांना हैराण करणारं ठरलं.

2 मे रोजी नवरदेव बॅंडबाजासहीत वरात घेऊन रिंकु कुमारीच्या घरी पोहोचला. मुलीकडील लोकांनी वरातीचं स्वागत केलं आणि लग्नाचे रितीरिवाज सुरू केले. द्वारपूजेनंतर रिंकू आणि राजेश यांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातले. 

पण यानंतर कहाणीमध्ये ट्विस्ट आला. नवरीची लहान बहीण पुतुल कुमारीने आपला होणारा भाओजी म्हणजे नवरदेवाला फोन केला आणि फोनवर धमकी दिली की, जर तू माझ्या बहिणीसोबत लग्न केलं तर ती छतावरून उडी मारून आपलं जीवन संपवेल. यानंतर घाबरलेल्या नवरदेवाने परिवाराला सगळं सत्य सांगितलं.

त्यानंतर लग्न मंडपात तणावाचं वातावरण तयार झालं. वाद इतका वाढला की, वरातीतील लोकांमध्ये आणि मुलीकडील लोकांमध्ये हाणामारीही झाली. गावातील लोकांनी याची सूचना पोलिसांना दिली. पोलिसांनी दोन्ही परिवारांना समजावून सांगितलं. त्यानंतर राजेशचं लग्न रिंकूसोबत नाही तर पुतुल कुमारीसोबत लावून देण्यात आलं. 

असं सांगण्यात आलं की, पुतुल कुमारी आणि राजेश आधीच एकमेकांना ओळखत होते. राजेशचं लग्न पुतुल कुमारीची बहीण रिंकूसोबत ठरलं होतं. लग्न ठरल्यावर 2 मे रोजी लग्न होणार होतं. दुसरीकडे पुतुल कुमारी इंटरमीडिएटची परीक्षा छपरा येथील कॉलेजमध्ये देत होती. यादरम्यान पुतुल कुमारीची तिचा होणारा भाओजी राजेशसोबत सतत भेट होत होती.

नंतर दोघे फोनवरही तासंतास बोलत होते. ज्यानंतर दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू झालं. पण पुतुल कुमारी राजेशला आपल्या बहिणीसोबत लग्न करताना पाहू शकली नाही. ऐनवेळी तिने राजेशला फोन करून आत्महत्या करण्याची धमकी दिली. राजेश घाबरला आणि त्याने परिवाराला सगळं सत्य सांगितलं. दोन्ही परिवारांनी समजदारी दाखवत त्यांचं लग्न लावून दिलं. 

टॅग्स :Biharबिहारmarriageलग्नJara hatkeजरा हटके