शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
4
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
5
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
6
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
7
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
8
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
9
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
10
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
11
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
12
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
13
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
14
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
15
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
16
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
17
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
18
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
19
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
20
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा

लग्नाच्या दिवशीच नवरदेवाच्या लव्हस्टोरीचा झाला खुलासा, होणाऱ्या पत्नीची बहिणच निघाली प्रेयसी आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 09:29 IST

2 मे रोजी नवरदेव बॅंडबाजासहीत वरात घेऊन रिंकु कुमारीच्या घरी पोहोचला. मुलीकडील लोकांनी वरातीचं स्वागत केलं आणि लग्नाचे रितीरिवाज सुरू केले.

बिहारच्या सारण जिल्ह्यात एका लग्नात चांगलाच गोंधळ झाला. लग्नासाठी तरूणीच्या घरी वरात घेऊन पोहोचलेल्या नवरदेवाच्या प्रेम प्रकरणाचा अचानक खुलासा झाला. त्यानंतर लग्नात वाद पेटला होता. अशात नवरदेवाचं त्याच्या प्रेयसीसोबत लग्न लावून देण्यात आलं. हैराण करणारी बाब म्हणजे नवरदेवाची प्रेयसी दुसरी कुणी नसून त्याची होणारी मेहुणीच निघाली. दोन्ही परिवाराच्या सहमती त्यांचं लग्न लावून देण्यात आलं.

ही घटना भभौली गावातील आहे. गावात राहणाऱ्या रामू बीनची मुलगी रिंकू कुमारीचं लग्न छपरा शहरातील राजेश कुमार याच्यासोबत जुळलं होतं. 2 मे रोजी त्यांचं लग्न होणार होतं. नवरदेव ठरल्यानुसार वरात घेऊन आला. पण पुढे जे झालं ते सगळ्यांना हैराण करणारं ठरलं.

2 मे रोजी नवरदेव बॅंडबाजासहीत वरात घेऊन रिंकु कुमारीच्या घरी पोहोचला. मुलीकडील लोकांनी वरातीचं स्वागत केलं आणि लग्नाचे रितीरिवाज सुरू केले. द्वारपूजेनंतर रिंकू आणि राजेश यांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातले. 

पण यानंतर कहाणीमध्ये ट्विस्ट आला. नवरीची लहान बहीण पुतुल कुमारीने आपला होणारा भाओजी म्हणजे नवरदेवाला फोन केला आणि फोनवर धमकी दिली की, जर तू माझ्या बहिणीसोबत लग्न केलं तर ती छतावरून उडी मारून आपलं जीवन संपवेल. यानंतर घाबरलेल्या नवरदेवाने परिवाराला सगळं सत्य सांगितलं.

त्यानंतर लग्न मंडपात तणावाचं वातावरण तयार झालं. वाद इतका वाढला की, वरातीतील लोकांमध्ये आणि मुलीकडील लोकांमध्ये हाणामारीही झाली. गावातील लोकांनी याची सूचना पोलिसांना दिली. पोलिसांनी दोन्ही परिवारांना समजावून सांगितलं. त्यानंतर राजेशचं लग्न रिंकूसोबत नाही तर पुतुल कुमारीसोबत लावून देण्यात आलं. 

असं सांगण्यात आलं की, पुतुल कुमारी आणि राजेश आधीच एकमेकांना ओळखत होते. राजेशचं लग्न पुतुल कुमारीची बहीण रिंकूसोबत ठरलं होतं. लग्न ठरल्यावर 2 मे रोजी लग्न होणार होतं. दुसरीकडे पुतुल कुमारी इंटरमीडिएटची परीक्षा छपरा येथील कॉलेजमध्ये देत होती. यादरम्यान पुतुल कुमारीची तिचा होणारा भाओजी राजेशसोबत सतत भेट होत होती.

नंतर दोघे फोनवरही तासंतास बोलत होते. ज्यानंतर दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू झालं. पण पुतुल कुमारी राजेशला आपल्या बहिणीसोबत लग्न करताना पाहू शकली नाही. ऐनवेळी तिने राजेशला फोन करून आत्महत्या करण्याची धमकी दिली. राजेश घाबरला आणि त्याने परिवाराला सगळं सत्य सांगितलं. दोन्ही परिवारांनी समजदारी दाखवत त्यांचं लग्न लावून दिलं. 

टॅग्स :Biharबिहारmarriageलग्नJara hatkeजरा हटके