शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

अनोखी प्रथा! इथे लग्नानंतर कपल ३ दिवस टॉयलेटलाच जात नाहीत, कारण वाचून चक्रावून जाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 10:49 IST

तीन दिवस नवीन जोडप्याला टॉयलेटला जाऊ दिलं जात नाही आणि त्यासाठी लोकांमध्ये अनेक मान्यता आहे.

जगभरात लग्नाबाबत वेगवेगळे रितीरिवाज पार पाडले जातात. भारतात तर शहरं बदलली की लग्नाच्या परंपरा बदलतात. अशीच एक आश्चर्यचकित करणारी परंपरा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. इंडोनेशियातील टीडॉन्ग समुदायात हा अनोखा आणि विचित्र रिवाज केला जातो. इथे नवरी आणि नवरदेव लग्नानंतर तीन दिवसांपर्यंत टॉयलेटचा वापरच करत नाहीत.

लग्नानंतर नवरी आणि नवरदेवाने टॉयलेटचा वापर करणं इथे अपशकुन मानला जातो. येथील लोक या रिवाजाला एक पवित्र रिवाज मानतात. टॉयलेटला गेल्यावर या रिवाजाची पवित्रता दूर होते. तसेच असं केलं तर नवरी-नवरदेव अशुद्ध होतात. येथील लोकांमध्ये मान्यता आहे की, नवरी-नवरदेवाला वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी इंडोनेशियामध्ये हा रिवाज केला जातो.

या समुदायानुसार, वॉशरूम अनेक लोक वापरतात. लोक शरीरातील घाण बाहेर काढतात. त्यामुळे तिथे नकारात्मक शक्ती असतात. लग्नानंतर लगेच टॉयलेटला गेल्याने हीच नकारात्मकता नवरी-नवरदेवात येण्याचा धोका असतो. इतकेच नाही तर नव्या जोडप्याचं नातंही धोक्यात येऊ शकतं, अशी मान्यता आहे.

अनेकदा तर नातं तुटण्याचीही वेळ येते. त्यामुळे या समुदायातील लोक या मान्यतेबाबत फार जागरूक आहेत. इतकेच नाही तर त्यांच्यात अशीही मान्यता आहे की, हा रिवाज तोडला तर जोडप्याचा जीवही जाऊ शकतो. त्यामुळे ते पूर्ण काळजी घेतात की, नवरी-नवरदेवाला या रिवाजामुळे कोणतीही अडचण होऊ नये. तसेच त्यांनी शौचालयाचा वापर करू नये. त्यासाठी त्यांना कमी खायला आणि प्यायला दिलं जातं.

टॅग्स :IndonesiaइंडोनेशियाJara hatkeजरा हटके