शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

अनोखी प्रथा! इथे लग्नानंतर कपल ३ दिवस टॉयलेटलाच जात नाहीत, कारण वाचून चक्रावून जाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 10:49 IST

तीन दिवस नवीन जोडप्याला टॉयलेटला जाऊ दिलं जात नाही आणि त्यासाठी लोकांमध्ये अनेक मान्यता आहे.

जगभरात लग्नाबाबत वेगवेगळे रितीरिवाज पार पाडले जातात. भारतात तर शहरं बदलली की लग्नाच्या परंपरा बदलतात. अशीच एक आश्चर्यचकित करणारी परंपरा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. इंडोनेशियातील टीडॉन्ग समुदायात हा अनोखा आणि विचित्र रिवाज केला जातो. इथे नवरी आणि नवरदेव लग्नानंतर तीन दिवसांपर्यंत टॉयलेटचा वापरच करत नाहीत.

लग्नानंतर नवरी आणि नवरदेवाने टॉयलेटचा वापर करणं इथे अपशकुन मानला जातो. येथील लोक या रिवाजाला एक पवित्र रिवाज मानतात. टॉयलेटला गेल्यावर या रिवाजाची पवित्रता दूर होते. तसेच असं केलं तर नवरी-नवरदेव अशुद्ध होतात. येथील लोकांमध्ये मान्यता आहे की, नवरी-नवरदेवाला वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी इंडोनेशियामध्ये हा रिवाज केला जातो.

या समुदायानुसार, वॉशरूम अनेक लोक वापरतात. लोक शरीरातील घाण बाहेर काढतात. त्यामुळे तिथे नकारात्मक शक्ती असतात. लग्नानंतर लगेच टॉयलेटला गेल्याने हीच नकारात्मकता नवरी-नवरदेवात येण्याचा धोका असतो. इतकेच नाही तर नव्या जोडप्याचं नातंही धोक्यात येऊ शकतं, अशी मान्यता आहे.

अनेकदा तर नातं तुटण्याचीही वेळ येते. त्यामुळे या समुदायातील लोक या मान्यतेबाबत फार जागरूक आहेत. इतकेच नाही तर त्यांच्यात अशीही मान्यता आहे की, हा रिवाज तोडला तर जोडप्याचा जीवही जाऊ शकतो. त्यामुळे ते पूर्ण काळजी घेतात की, नवरी-नवरदेवाला या रिवाजामुळे कोणतीही अडचण होऊ नये. तसेच त्यांनी शौचालयाचा वापर करू नये. त्यासाठी त्यांना कमी खायला आणि प्यायला दिलं जातं.

टॅग्स :IndonesiaइंडोनेशियाJara hatkeजरा हटके