शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
4
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
5
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
6
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
7
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
8
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
9
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
10
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
13
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
14
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
15
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
16
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
17
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
18
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
19
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
20
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...

संपूर्ण राज्यात फक्त एकच रेल्वे स्टेशन, इथेच संपते रेल्वे लाइन, जाणून घ्या सविस्तर... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 21:44 IST

11 लाख लोकसंख्येसाठी एकच रेल्वे स्टेशन असलेले हे राज्य कोणते आहे? ते जाणून घेऊया...

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेला देशाची लाइफलाइन म्हटले जाते. कारण दररोज कोट्यवधी लोक आपले गाव, घर, शहर आणि कार्यालयांपर्यंत पोहोचण्यासाठी रेल्वेने प्रवास करतात. देशात रेल्वेचे मोठे जाळे असून सुमारे आठ हजार रेल्वे स्टेशन आहेत.

रेल्वे स्टेशनची संख्या प्रत्येक राज्यात हजारोंच्या घरात आहे, पण भारतातील एक राज्य असे आहे, जिथे फक्त एकच रेल्वे स्टेशन आहे. 11 लाख लोकसंख्येसाठी एकच रेल्वे स्टेशन असलेले हे राज्य कोणते आहे? ते जाणून घेऊया...

मिझोराम हे भारताच्या ईशान्येकडील असे राज्य आहे,  याठिकाणी फक्त एकच रेल्वे स्टेशन आहे. मिझोराममधील बइरबी रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर भारतीय रेल्वेचा प्रवास संपतो. या स्टेशनवरून प्रवासी गाड्यांव्यतिरिक्त मालाची वाहतूकही केली जाते. 

मिझोराममध्ये असलेले बइरबी रेल्वे स्टेशन, हे राज्यातील एकमेव स्टेशन आहे. या व्यतिरिक्त दुसरे कोणतेही राज्यात रेल्वे स्टेशन नाही. अकरा लाख लोकसंख्येच्या राज्यात एकच रेल्वे स्टेशन असेल तर लोकांना अडचणींचा सामना करावा लागणार, हे उघड आहे. दुसरे स्टेशन स्थानक नसल्यामुळे राज्यातील सर्व लोक प्रवासासाठी बइरबी रेल्वे स्टेशनवरून प्रवास करतात.

3 प्लॅटफॉर्म असलेल्या स्टेशनवर सुविधांचा अभाव3 प्लॅटफॉर्म असलेल्या बइरबी रेल्वे स्टेशनवरही सुविधांचा अभाव आहे. या रेल्वे स्टेशनचा कोड BHRB आहे. स्टेशनवर गाड्यांच्या वाहतुकीसाठी 4 ट्रॅक आहेत. 2016 मध्ये या स्टेशनचा पुनर्विकास सुरू करण्यात आला होता, कारण पूर्वी  हे स्टेशन खूपच लहान होते. 

दुसरे रेल्वे स्टेशन बांधण्याचा रेल्वेचा प्रस्तावयाचबरोबर, बइरबी रेल्वे स्टेशन 84 किमी अंतरावर असलेल्या स्टेशन कथाकल जंक्शन रेल्वे स्टेशनशी जोडलेले आहे. त्यातील 2 किमीचा भाग मिझोराममध्ये येतो. दरम्यान, याठिकाणी दुसरे रेल्वे स्टेशन सुद्धा बांधण्याचाही रेल्वेचा प्रस्ताव आहे.

टॅग्स :railwayरेल्वेJara hatkeजरा हटके