शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

मृत्यूनंतर नागा साधूंना मुखाग्नी दिला जातो का? अंत्यसंस्काराचे नियम काय, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 19:04 IST

ऐतिहासिक दाखले तपासायचे झाल्यास नागा साधू यांचा इतिहास फार जुना आहे. आदि गुरू शंकराचार्य यांनी नागा योद्धांची सेना तयार केली होती.

प्रयागराज - उत्तर प्रदेशच्या प्रयागराज इथं महाकुंभ मेळ्याला सुरुवात झाली असून तिथं साधू, संत, नागा साधू यांची मोठ्या संख्येने हजेरी आहे. नागा साधू सामान्यत: खूप कमी दिसून येतात. परंतु महाकुंभ येथे नागा साधूंनी उत्साहाने सहभाग नोंदवला आहे. नागा साधू यांचं जीवन रहस्यमय असते. त्यांचे जीवन ते मृत्यूपर्यंत प्रत्येक गोष्ट गूढ असते. नागा साधू यांच्या जीवनाबद्दल अनेकांना जाणून घेण्याची उत्कंठा असते त्यात नागा साधू यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार कसे करतात हा प्रश्नही अनेकांना पडला असेल. त्याचे उत्तर पुढे तुम्हाला वाचायला मिळेल.

नागा साधू बनण्यासाठी घोर तपस्या करावी लागते. नागा साधू जिवंत असतानाच स्वत:चे पिंडदान करतात. हिंदू धर्मात जन्मापासून मृत्यूपर्यंत अनेक प्रथा पाळल्या जातात ज्याचे पालन सगळ्यांकडून केले जाते. त्यातील एक अखेरचं अंत्यसंस्कार. माणसाच्या मृत्यूनंतर त्यांचं पिंडदान करण्याची प्रथा आहे. मात्र नागा साधू यांच्यावर अंत्यसंस्कार केले जात नाहीत तर मृत्यूनंतर त्यांची समाधी करतात. त्यांच्या मृतदेहाला अग्नी दिला जात नाही कारण असं करणे दोष मानला जातो. नागा साधू यांनी आधीच स्वत:चे जीवन संपवलेले असते असं त्यामागचं कारण सांगितले जाते.

पिंडदान केल्यानंतरच ते नागा साधू बनतात त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर पिंडदान आणि मुखाग्नी दिला जात नाही. त्यांना भू किंवा जलसमाधी दिली जाते. समाधी देण्यापूर्वी त्यांना स्नान घातले जाते. त्यानंतर मंत्रोच्चारण करून समाधी दिली जाते. जेव्हा नागा साधूचा मृत्यू होतो तेव्हा त्यांच्या शरीरावर भस्म लावला जातो.  भगवे कपडे टाकले जातात. समाधी घेतल्यानंतर त्या ठिकाणावर सनातन निशाण बनवले जाते जेणेकरून लोकांकडून तिथे अस्वच्छता होऊ नये. नागा साधूंना पूर्ण मानसन्मानाने अखेरचा निरोप दिला जातो. नागा साधू यांना धर्म रक्षकही बोलले जाते. 

दरम्यान, ऐतिहासिक दाखले तपासायचे झाल्यास नागा साधू यांचा इतिहास फार जुना आहे. आदि गुरू शंकराचार्य यांनी नागा योद्धांची सेना तयार केली होती. शं‍कराचार्यांनी बाहेरील आक्रमणापासून पवित्र धर्मस्थळे, धार्मिक ग्रंथ यांच्या रक्षणाची जबाबदारी या नागा योद्धांवर दिली होती. धर्माच्या रक्षणासाठी एका हातात शास्त्र आणि दुसऱ्या हातात शस्त्र घेणे गरजेचे आहे असा संदेश शं‍कराचार्यांना भारतवर्षाला द्यायचा होता. हाच संदेश घेऊन नागा साधू देशाच्या कानाकोपऱ्यात धार्मिक कार्यक्रमात पोहचतात.