शहरं
Join us  
Trending Stories
1
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
2
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
3
मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
4
कॅनडात दोन आठवड्यात दोन भारतीयांची हत्या; कोण होते शिवांक अवस्थी आणि हिमांशी खुराणा?
5
Vijay Hazare Trophy: किंग कोहलीचं शतक हुकलं! पण 'फिफ्टी प्लस'च्या 'सिक्सर'सह पुन्हा दाखवला क्लास
6
BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार...
7
AI मुळे नोकरी गेली, खर्च भागवण्यासाठी कपल बनलं 'बंटी-बबली'; १५ लाखांच्या चोरीची पोलखोल
8
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
9
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
10
"माणूसकीचा विसर पडण्याच्या आत...", बांगलादेशमध्ये हिंदू युवकाची हत्या, जान्हवी कपूर संतापली
11
गणपती बाप्पा मोरया… २०२६ मध्ये किती वेळा अंगारक योग जुळून येणार? ‘या’ अंगारकी चतुर्थी खास!
12
करोडपती होण्याचे स्वप्न आता आवाक्यात! दरमहा इतक्या रुपयांची SIP; पाहा चक्रवाढ व्याजाची कमाल
13
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
14
कॅनडात आणखी एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या, शिवांकला विद्यापीठ परिसरातच घातल्या गोळ्या
15
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
16
किडनी विक्रीतून रामकृष्णने घेतली २० एकर जमीन; फेसबुक ग्रुपद्वारे विणले अवयव तस्करीसाठी एजंटांचे जाळे
17
नव्या वर्षापासून UPI साठी लागू होणार नवा नियम; ई-कॉमर्स कंपन्यांच्या चलाखीवर बसणार चाबूक, प्रकरण काय?
18
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये जाणार की उद्धवसेनेत?; उद्धव ठाकरेंचा फोन, पुण्यात राजकीय ट्विस्ट
19
भारतातील युपीआय व्यवहारांत मोठी प्रादेशिक दरी; महाराष्ट्र अग्रस्थानी तर बिहार पिछाडीवर, कारण काय?
20
खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
Daily Top 2Weekly Top 5

भारतातील एक असं गाव जिथे चप्पल-शूज घालत नाही लोक, हॉस्पिटलमध्येही जात नाहीत; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 17:37 IST

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, या लोकांना कुठे दूर जायचं असेल तरीही ते चपप्ल घालत नाहीत. हे गाव देशातील इतर गावांपेक्षा फार वेगळं आहे. या गावाचं नाव आहे वेमना इंदलू.

आजच्या काळात चप्पल आणि हॉस्पिटलशिवाय कुणीही दूर राहू शकत नाही. पण भारतात आजही एक गाव असं आहे जेथील लोक ना चप्पल घालत ना कधी हॉस्पिटलमध्ये जात. हैराण करणारी बाब म्हणजे या गावात एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला किंवा खासदार-आमदाराला यायचं असेल तर त्यांनाही चप्पल गावाबाहेर काढावी लागते. तेच या गावातील लोक गावात असो वा गावाबाहेर ते विना चप्पलच असतात.

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, या लोकांना कुठे दूर जायचं असेल तरीही ते चपप्ल घालत नाहीत. हे गाव देशातील इतर गावांपेक्षा फार वेगळं आहे. या गावाचं नाव आहे वेमना इंदलू.  आंध्र प्रदेशच्या तिरूपतीपासून हे गाव 50 किलोमीटर दूर आहे. एका रिपोर्टनुसार, या गावाच्या सरपंचांनी सांगितलं की, जेव्हापासून हे लोक गावात वसले, तेव्हापासून ही परंपरा आहे की, गावात जर कुणी आलं तर आंघोळ केल्याशिवाय येऊ नये. 

तिरूपती जिल्ह्याच्या पाटला मंडलच्या या छोट्याशा गावात 25 परिवार राहतात. गावातील एकूण लोकसंख्या 80 आहे. जास्तीत जास्त लोक शिकलेले नाहीत आणि शेतीवर अवलंबून आहेत. गावातील नियमांचं पालन गावातील लोकांच्या नातेवाईकांना देखील करावं लागतं. रिपोर्टनुसार, स्वत:ला पलवेकरी जातीचे सांगतात. 

गावातील लोक भगवान वेंकटेश्वरची पूजा करण्यासाठी तिरूमाला इथेही जात नाही. ते गावातच त्यांची पूजा करतात. गावातील लोक म्हणतात की, ते कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जात नाही. कारण त्यांना विश्वास आहे की, देवच सगळं ठीक करेल. लोक कडूलिंबाच्या झाडाची  परिक्रमा करतात. पण हॉस्पिटलमध्ये जात नाहीत. 

गावातील महिला सांगतात की, ते लोक घरीच सगळंकाही करतात. गर्भवती महिलेला सुद्धा ते हॉस्पिटलमध्ये नेत नाहीत. ना कुणाला बाहेरून येऊ देतात. शाळेत जाणारी मुलं दुपारी जेवणासाठी घरी येतात. ते शाळेतील अन्न खात नाहीत. जेवण करून पुन्हा शाळेत जातात. मासिक पाळी आली तर महिलांना घराच्याच नाही तर गावाच्या बाहेर रहावं लागतं. त्यांच्यासाठी गावाबाहेर एक रूम बांधण्यात आली आहे. गावातील लोकांना सरकारी योजनांचा लाभ मिळतो. त्यांच्या घरी धान्य पोहोचवलं जातं. जिल्हाधिकारी म्हणाले की, गावातील लोकांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी जागरूकता शिबीर चालवावं लागेल.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेAndhra Pradeshआंध्र प्रदेश