शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

कर्ज फेडता आलं नाही म्हणून १७ वर्ष तो घनदाट जंगलात एका कारमध्ये राहिला! काय आहे नेमकं प्रकरण? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2021 19:39 IST

कर्नाटकमधील एका व्यक्ती गेली १७ वर्ष एका जंगलात जुन्या झालेल्या पांढऱ्या अॅम्बेसेडर कारमध्ये राहत होता अशी एक हटके कहाणी समोर आली आहे.

कर्नाटकमधील एका व्यक्ती गेली १७ वर्ष एका जंगलात जुन्या झालेल्या पांढऱ्या अॅम्बेसेडर कारमध्ये राहत होता अशी एक हटके कहाणी समोर आली आहे. पण सर्वांपासून दूर जात जंगलात राहण्याची नामुष्की या व्यक्तीवर का आली? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यामागची कहाणी देखील रंजक आहे. चंद्रशेखर गौडा नावाचा ५६ वर्षीय व्यक्ती गेल्या १७ वर्षांपासून कर्नाटकातील जंगलात राहत आहे. चंद्रशेखर यांनी शेतीसाठी कर्ज घेतलं होतं आणि त्याची परतफेड करु न शकल्यानं त्यांनी आपली १.५ एकर जमीन गमावली होती. त्यानंतर ते जंगलात आपल्या अॅम्बेसेडर कारमध्येच राहू लागले होते. त्यांनी समाजापासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या १७ वर्षांपासून ते आपल्या कारमध्येच राहात आहेत आणि आज त्यांची कार एकदम जुनी झाली आहे. 

कर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यातील सुलिया येथील एका जंगलात चंद्रशेखर राहत आहेत. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जंगलात जवळपास ४ ते ५ किमीतर पायी अंतर कापावं लागतं. त्यानंतर बांबूंना बांधलेलं एक प्लास्टिकचं छप्पर नजरेस पडतं. त्याखाली त्यांनी आपली अॅम्बेसेडर कार उभी केली आहे आणि त्यातच ते गेल्या अनेक वर्षांपासून राहात आहेत. विशेष म्हणजे कारमध्ये असलेला रेडिओ आजही सुरू आहे. 

चंद्रशेखर आता वयोमानामुळे खूप खंगले आहेत आणि त्यांची प्रकृती देखील ठीक नसते. बऱ्याच काळापासून त्यांनी दाढी आणि केस देखील कापलेले नाहीत. त्यांच्याकडे कपड्यांचे फक्त दोन जोड आहेत आणि एक जोड रबरी चपला एवढंच त्यांचं स्वत:चं सामान आहे. जंगल आणि त्यांची कार हेच त्यांचं आता विश्व झालं आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार चंद्रशेखर यांच्याकडे नेकराल केमराजे नावाच्या गावात १.५ एकर शेतजमीन होती. यात ते सुपारीचं पीक घ्यायचे. सारंकाही व्यवस्थित सुरू होतं. २००३ साली त्यांनी एका सहकारी बँकेतून ४० हजार रुपयांचं कर्ज घेतलं होतं. पण ते फेडू न शकल्यानं बँकेनं त्यांच्या शेत जमीनीचा लिलाव केला होता आणि पैसे वसूल केले होते. या घटनेनं चंद्रशेखर पूर्णपणे खचले गेले आणि त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदललं. चंद्रशेखर यांच्याकडे राहण्यासाठी त्यांचं घर देखील नव्हतं. मग त्यांनी आपल्या अॅम्बेसेडर कारमध्येच राहण्याचा निर्णय घेतला. अॅम्बेसेडर कार घेऊन ते आपल्या बहिणीकडे गेले होते. पण तिथं त्यांचं भांडण झालं आणि ते कार घेऊन दूरवर जंगलात जाऊन राहू लागले. त्यांनी सर्वांशी संपर्क तोडला होता. जंगलात एका जागी त्यांनी आपली कार पार्क केली तिथंच राहायला सुरुवात केली. पावसापासून बचावासाठी त्यांनी एक प्लास्टिकचं छप्पर बांधलं आणि गेल्या १७ वर्षांपासून ते याच जागी राहात आहेत. 

गेल्या १७ वर्षांपासून ते कारमध्ये एकांतात राहात आहेत आणि जवळच्या नदीतच ते अंघोळ करतात. जंगलातील सुक्या बांबूंच्या लाकडापासून ते टोपल्या बनवू लागले आणि त्याची विक्री बाजारात करुन त्याबदल्यात तांदूळ, साखर आणि इतर किराणा सामान घेतात. त्यांची फक्त एकच इच्छा आहे आणि ती म्हणजे त्यांची जमीन त्यांना परत मिळावी. त्यासाठीची सर्व कागदपत्रं त्यांनी आजही सांभाळून ठेवली आहेत. 

टॅग्स :Karnatakकर्नाटकSocial Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके