शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

जळगावचे तरुण करताहेत पूरग्रस्त भागात घर, मंदिरांची साफसफाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : अतिवृष्टीमुळे होत्याचे नव्हते झालेल्या कोकणात जाऊन आवश्यक साहित्याच्या वितरणासह घर, मंदिरांची साफसफाई करण्यासाठी जळगावातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : अतिवृष्टीमुळे होत्याचे नव्हते झालेल्या कोकणात जाऊन आवश्यक साहित्याच्या वितरणासह घर, मंदिरांची साफसफाई करण्यासाठी जळगावातील तरुण दिवस-रात्र झटत असून त्यांच्या या सेवाभावाने कोकणवासीय भारावून गेले आहेत. गावामध्ये वेगवेगळे काम करण्यासह रुग्णवाहिकेसोबत जाऊन गावोगावी आरोग्य तपासणीस हातभार तसेच औषध वितरणाचे काम हे तरुण करीत आहेत. यामध्ये सेवारथ परिवार, विश्व हिंदू परिषद तसेच बजरंग दलाच्या कार्यर्त्यांचा समावेश आहे.

कोकण, पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे गावांमध्ये पावसाचे पाणी शिरून घरं, दुकाने, मंदिर पाण्यात बुडाली. आता पूर ओसरला असला तरी गावात चिखल, केरकचरा कायम आहे. घरातील सर्व नष्ट झाल्याने पूरग्रस्तांना अन्न, वस्त्रासह त्यांच्या मदतीसाठी झटणाऱ्या हातांचीही गरज आहे. ही गरज ओळखून जळगावातील सेवारथ परिवार, जीएम फाउंडेशन, पत्रकार संघ यांच्यासह विविध संस्थांनी वेगवेगळे साहित्य पाठविले. या सोबतच या संस्थांमधीलच सेवारथ परिवार तसेच विश्व हिंदू परिषद तसेच बजरंग दलाचे कार्यकर्ते चिपळूण येथे जाऊन सेवाकार्य करीत आहेत.

ज्येष्ठांना मिळाला आधार

जळगावातील १८ तरुण चिपळून येथे गेले असून पूरग्रस्त भागात ते वेगवेगळी जबाबदारी संभाळत आहेत. चिपळूण येथे घरांमध्ये झालेला चिखल काढणे गरजेचे असताना ज्यांच्या घरात तरुण मुले नाही, अशा ज्येष्ठांचे हाल होत आहे. त्या वेळी जळगावातील हे तरुण या ज्येष्ठांच्या मदतीसाठी सरसावले असून त्यांच्या घराची साफसफाई करण्याचे काम हे तरुण करीत आहेत. आतापर्यंत या तरुणांनी १५० घरांची साफसफाई केली असून मंदिरांमध्येही जाऊन स्वच्छता मोहीम राबविली जात आहेत. यात १७ मंदिरांची सफाई करण्यात आली असल्याचे सेवारथ परिवाराच्यावतीने सांगण्यात आले.

अडीच हजारावर नागरिकांची तपासणी

पूरग्रस्त भागात आरोग्याचाही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी जळगावातूनच एक रुग्णवाहिका पाठविण्यात आली आहे. या रुग्णवाहिकेसोबत डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांसह तीन तरुण वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन औषधी वितरण करीत आहेत. सोबतच आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येत असून आतापर्यंत दोन हजार ५०० ते दोन हजार ६०० जणांची तपासणी करण्यात आली आहे.

पूरग्रस्त भागात लागणारी आवश्यक ती मदत करण्याची तयारी या तरुणांनी दर्शविली आहे. सोबतच तेथे अजून आवश्यक साहित्य पाठविणार असल्याचे सेवारथ परिवाराचे दिलीप गांधी, डॉ. रितेश पाटील, डॉ. नीलिमा सेठिया यांनी सांगितले.