शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
4
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
5
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
6
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
7
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
8
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
9
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
10
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
11
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
12
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
13
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
14
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
15
रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकची गेल्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक विक्री; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!
16
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
17
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
19
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
20
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!

जळगावचे तरुण करताहेत पूरग्रस्त भागात घर, मंदिरांची साफसफाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : अतिवृष्टीमुळे होत्याचे नव्हते झालेल्या कोकणात जाऊन आवश्यक साहित्याच्या वितरणासह घर, मंदिरांची साफसफाई करण्यासाठी जळगावातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : अतिवृष्टीमुळे होत्याचे नव्हते झालेल्या कोकणात जाऊन आवश्यक साहित्याच्या वितरणासह घर, मंदिरांची साफसफाई करण्यासाठी जळगावातील तरुण दिवस-रात्र झटत असून त्यांच्या या सेवाभावाने कोकणवासीय भारावून गेले आहेत. गावामध्ये वेगवेगळे काम करण्यासह रुग्णवाहिकेसोबत जाऊन गावोगावी आरोग्य तपासणीस हातभार तसेच औषध वितरणाचे काम हे तरुण करीत आहेत. यामध्ये सेवारथ परिवार, विश्व हिंदू परिषद तसेच बजरंग दलाच्या कार्यर्त्यांचा समावेश आहे.

कोकण, पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे गावांमध्ये पावसाचे पाणी शिरून घरं, दुकाने, मंदिर पाण्यात बुडाली. आता पूर ओसरला असला तरी गावात चिखल, केरकचरा कायम आहे. घरातील सर्व नष्ट झाल्याने पूरग्रस्तांना अन्न, वस्त्रासह त्यांच्या मदतीसाठी झटणाऱ्या हातांचीही गरज आहे. ही गरज ओळखून जळगावातील सेवारथ परिवार, जीएम फाउंडेशन, पत्रकार संघ यांच्यासह विविध संस्थांनी वेगवेगळे साहित्य पाठविले. या सोबतच या संस्थांमधीलच सेवारथ परिवार तसेच विश्व हिंदू परिषद तसेच बजरंग दलाचे कार्यकर्ते चिपळूण येथे जाऊन सेवाकार्य करीत आहेत.

ज्येष्ठांना मिळाला आधार

जळगावातील १८ तरुण चिपळून येथे गेले असून पूरग्रस्त भागात ते वेगवेगळी जबाबदारी संभाळत आहेत. चिपळूण येथे घरांमध्ये झालेला चिखल काढणे गरजेचे असताना ज्यांच्या घरात तरुण मुले नाही, अशा ज्येष्ठांचे हाल होत आहे. त्या वेळी जळगावातील हे तरुण या ज्येष्ठांच्या मदतीसाठी सरसावले असून त्यांच्या घराची साफसफाई करण्याचे काम हे तरुण करीत आहेत. आतापर्यंत या तरुणांनी १५० घरांची साफसफाई केली असून मंदिरांमध्येही जाऊन स्वच्छता मोहीम राबविली जात आहेत. यात १७ मंदिरांची सफाई करण्यात आली असल्याचे सेवारथ परिवाराच्यावतीने सांगण्यात आले.

अडीच हजारावर नागरिकांची तपासणी

पूरग्रस्त भागात आरोग्याचाही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी जळगावातूनच एक रुग्णवाहिका पाठविण्यात आली आहे. या रुग्णवाहिकेसोबत डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांसह तीन तरुण वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन औषधी वितरण करीत आहेत. सोबतच आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येत असून आतापर्यंत दोन हजार ५०० ते दोन हजार ६०० जणांची तपासणी करण्यात आली आहे.

पूरग्रस्त भागात लागणारी आवश्यक ती मदत करण्याची तयारी या तरुणांनी दर्शविली आहे. सोबतच तेथे अजून आवश्यक साहित्य पाठविणार असल्याचे सेवारथ परिवाराचे दिलीप गांधी, डॉ. रितेश पाटील, डॉ. नीलिमा सेठिया यांनी सांगितले.