शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

आधी तुझं माझं जमेना; अन् आता तुझ्यावाचून करमेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:17 IST

सुनील पाटील जळगाव : सुरळीत चालेल्या संसारात वेगवेगळ्या कारणांनी मिठाचा खडा पडून एकमेकांपासून दुरावलेल्या जिल्ह्यातील १३५ दाम्पत्यांना एकत्र ...

सुनील पाटील

जळगाव : सुरळीत चालेल्या संसारात वेगवेगळ्या कारणांनी मिठाचा खडा पडून एकमेकांपासून दुरावलेल्या जिल्ह्यातील १३५ दाम्पत्यांना एकत्र आणून त्यांची संसारवेल पुन्हा बहरली आहे. ‘आधी तुझं माझं जमेना;अन् आता तुझ्यावाचून करमेना!’असेच वर्णन या प्रकरणांचे करावे लागेल. पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला सहाय्य कक्षातील सावित्रीच्या लेकींनी या दाम्पत्यांच्या जीवनात समेट घडवून आणला आहे.

महिलांवर होत असलेल्या अन्याय, अत्याचार रोखण्यासह त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात महिला सहाय्य कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. सकाळी दहा वाजेपासून तर सायंकाळी सात वाजेपर्यंत समुपदेशनाचे काम सुरु असते.

पोलीस अधीक्षक कार्यालयात आहे सेल

महिला व पुरुषांमधील कौटुंबिक वादात समेट घडवून आणण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय आवारात महिला सहाय्य कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या अख्त्यारीत हा सेल आहे. सकाळी १० ते सायंकाळी सात अशा वेळेत येथे कार्य चालते. ज्या प्रकरणात समेट घडलाच नाही, अशी प्रकरणे पोलीस ठाणे किंवा न्यायालयात पाठविली जातात.

क्षुल्लक कारणावरुन होताहेत वाद

कधी बायको माहेरी जाते म्हणून तर कधी सासू-सासरे जास्तच कटकट करतात. मुलांना वेळेवर खायलाच दिले नाही. त्यांचा क्लासच घेतला नाही, यासारख्या क्षुल्लक कारणावरुन पती-पत्नीत वादाची ठिणगी पडली. त्यामुळे पत्नी माहेरी निघून गेलेली असते तर कधी सातत्याने पती किंवा पत्नी मोबाईलमध्येच गुंतलेले असता, त्यावरुन संशयाचे भू्त मनात निर्माण होतात आदी कारणांमुळे वाद होत असल्याचे दिसून आलेले आहे.

कोट...

जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत १२९० तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या, त्यापैकी १३५ तक्रारीत समेट घडवून आणला आहे. वादाचे कारणे अतिशय क्षुल्लक आहेत. पती-पत्नी एकत्र यावेत, त्यांचा संसार अधिक बहरला पाहिजे, हीच आमची अपेक्षा असते. त्याच दृष्टीकोणातून आमचे कार्य चालते. लांब राहणाऱ्या दाम्पत्यांना यायला उशीर लागत असल्याने अशा प्रकरणात तडजोड उशिरा होते.

-वैशाली पाटील, समन्वयक, महिला सहाय्य कक्ष

नऊ महिन्यात महिला सहाय्य कक्षाकडे आलेल्या तक्रारी

दाखल संख्या : १२९०

एकत्र आलेले दाम्पत्य : १३५