शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

होय! मुंबईतील गर्दीमुळे आता आमचाही जीव गुदमरतोय - आधुनिक मुंबईचे शिल्पकार नाना शंकरशेठ यांचे पणतू सुरेंद्र शेठ यांची व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 13:07 IST

ज्यांनी भारतात रेल्वे आणली, त्यांचाच रेल्वेला विसर पडला, ‘मुंबई सेंट्रल’ला नानांचे नाव देण्याची अपेक्षा

विहार तेंडुलकरजळगाव : नाना शंकरशेठ यांनी मुंबईची निर्मिती केली, पण आज दुर्दैवाने मुंबईत आमचीही घुसमट होऊ लागलेय. मी गिरगावात राहतो, तेथे एवढी गर्दी आहे की, बाहेर पडलो तरी जीव घुसमटून जातो, अशी खंत आधुनिक मुंबईचे शिल्पकार नाना शंकरशेठ यांचे पणतू सुरेंद्र विनायक शंकर शेठ यांनी ‘लोकमत’ जवळ व्यक्त केली.नानांची सोमवारी २१८वी जयंती होती. त्यानिमित्त जळगावात एका कार्यक्रमासाठी आले असताना, त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.प्रश्न : नानांनी भारतात रेल्वे आणली, आज रेल्वेचे जाळे अखंड भारतात पसरले आहे..उत्तर : हो! पण दुर्दैवाने आज एकाही स्थानकाला नानांचं नाव नाही. ‘व्हीटी’ला त्यांचं नाव द्यावं, अशी आमची मागणी होती. पण राजकीय इच्छाशक्ती कमी पडली. आता मुंबई सेंट्रलला नानांचं नाव द्यावं, अशी आमची मागणी आहे. आम्ही रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनाही भेटलो. त्यांनी हिरवा कंदील दिला आहे. पुढील दोन आठवड्यात राज्य मंत्रिमंडळासमोर असा प्रस्ताव संमत होईल, अशी आशा आहे. आमची मागणी आहे की, नानांनी त्यांच्या संपत्तीचा त्याग करून रेल्वे आणली, त्यांची ओळख कुठेतरी निर्माण व्हावी, पुढील पिढीला नानांचं कार्य समजावं.प्रश्न : मुंबईचे जगणं आता हाताबाहेर चाललं आहे. अनेक प्रश्नांची जननी म्हणून मुंबईकडे पाहिले जाते, हे पाहिल्यावर काय वाटतं?उत्तर : मुंबईचा प्रश्न खूपच गंभीर बनला आहे. आता लोकल लोक मुंबई सोडून चाललेत आणि बाहेरून येणाऱ्या लोकांनीच मुंबई भरून गेली आहे. बाहेरून येणाºया कुणालाही मुंबईची दारे बंद व्हावीत, अशी आमची भूमिका नाही. तेही भारताचेच सुपुत्र आहेत. पण त्याला मर्यादा असावी. आता मुंंबईत जीव घुसमटू लागलाय.प्रश्न : नानांच्या कार्याचा प्रसार होण्यासाठी कुुटुंबिय म्हणून आपले काही प्रयत्न आहेत का?उत्तर : वडाळ्याला नानांचं स्मारक बांधण्यात येत आहे. त्याचे भूमीपूजनही झाले आहे. त्यासाठी थोडी निधीची आवश्यकता आहे. दानशूर लोकं पुढे येत आहेत. याठिकाणी केवळ शैक्षणिक उपक्रम राबवले जातील आणि त्यातून निर्माण होणारा निधी हा गरजू लोकांसाठी वापरला जाईल.रेल्वेकडून याबाबत सकारात्मक निर्णय का होत नाही?नानांनी भारतात रेल्वे आणली. ज्यावेळी लंडनमध्ये त्यांनी रेल्वे पाहिली, त्यावेळी त्यांनी ब्रिटीश सरकारकडे विनंती केली. ती मान्य झाली अन् मुंबईत रेल्वेच्या कामाला गती मिळाली. रेल्वेच्या त्यावेळच्या बोर्ड आॅफ डायरेक्टरमध्ये पाच सदस्य होते. तीन ब्रिटीश दोन भारतीय. भारतीयांमध्ये एक जमशेदजी जीजीभाई व नाना शंकरशेठ. नानांनी व्हीटी स्टेशनच्या कार्यालयासाठी स्वत:ची जागाही दिली. एवढेच नाही तर हा प्रकल्प उभारणीसाठी निधीही दिला. मुंबईचा कारभार पूर्वी ज्या टाऊनहॉलमधून चालायचा, त्याची उभारणीही नांनांनी केली. अशा सत्पुरुषाचे नाव रेल्वे स्थानकाला द्यावे, असे आजपर्यंत कोणालाच वाटले नाही.नानांच्या नावे शैक्षणिक उपक्रमनानांनी स्टुडंट लिटररी अ‍ॅण्ड सायंटिफिक सोसायटी ही पहिली शैक्षणिक संस्था काढली. ज्या संस्थेत जमशेदजी टाटांसारखे उद्योजक होते. त्यांनी संस्कृत स्कॉलरशिप सुरु केली. कारण संस्कृत हा त्यांच्या आवडीचा विषय होता. आजही दहावी परिक्षेत संस्कृतमध्ये प्रथम येणाºया विद्यार्थ्याला ती दिली जाते. नानांनी गिरगावात मुंलीसाठी पहिली शाळा सुरु केली अन् तीही मोफत!

 

टॅग्स :Jalgaonजळगाव