शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

यंदा खान्देश भारनियमनमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 12:38 IST

जळगाव : पंधरा दिवसांपासून थंडी गायब होताच, घरोघरी वातानुकुलीत उपकरणे सुरु झाल्याने विजेची मागणी वाढली आहे. मात्र, महावितरणकडे सध्या ...

जळगाव : पंधरा दिवसांपासून थंडी गायब होताच, घरोघरी वातानुकुलीत उपकरणे सुरु झाल्याने विजेची मागणी वाढली आहे. मात्र, महावितरणकडे सध्या स्थितीला महानिर्मितीकडून करण्यात आलेली विजेची उपलब्धता आणि काही खाजगी कंपन्यांकडून खरेदी करण्यात येत असलेल्या विजेमुळे यंदा जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्हा भारनियमन मुक्त राहील, अशी माहिती महावितरणच्या जळगाव परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी ‘लोकमत’ला दिली.उन्हाळ््याची चाहूल लागताच नागरिकांना भारनियमनाची चिंता सतावते. कारण उन्हाळ््यात विजेची मागणी दुपटीने वाढत असल्याने, विजेचा तुटवडा निर्माण होतो. अशा वेळेस शहरासह ग्रामीण भागात भारनियमन केले जाते. मात्र, यंदा विजेची मोठ्या प्रमाणावर मागणी असली तरी महावितरणकडून जिल्ह्यात कुठेही भारनियमन लागू न करण्याबाबत नियोजन सुरु आहे. विशेषत: एप्रिल आणि ‘मे’ महिन्यात विजेची मागणी सर्वांत मोठी असल्याने, या काळात भारनियमन होऊ नये, यासाठी महानिर्मितीसह खाजगी कंपन्यांच्याच्या प्रतिनिधींशी बैठका घेऊन, आतापासून नियोजन करण्यात येत आहे. मुख्य म्हणजे अनेकवेळा कोळशाच्या टंचाईमुळेदेखील वीजेची उपलब्धता कमी होऊन, भारनियमनाला सामोरे जावे लागते. त्यादृष्टीने महानिर्मितीने आतापासूनच पुरेसा कोळशाचा साठा उपलब्ध करुन ठेवल्याने, यंदा खान्देश भारनियमुक्त राहणार असल्याचा दावा महावितरणतर्फे करण्यात येत आहे. दरम्यान, सध्या जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी दोन ते तीन तास वारंवार वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण वाढले आहे़ या संदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी जिल्हाभरात सुरू असलेल्या वीजेच्या कामांमुळे वीज पुरवठा खंडीत होत असल्याचे स्पष्ट केले़सरासरी लागते ७७० ते ७८० मेगावॅट वीजजळगाव परिमंडळात जळगाव जिल्ह्यासह धुळे व नंदुरबारचा समावेश असून, या तिन्ही जिल्ह्यात सध्या स्थितीला दररोज सरासरी ७७० ते ७८० च्या घरात मेगावॅट वीज लागत आहे. धुळे व नंदुरबारच्या तुलनेने जळगाव जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्र जास्त असल्याने सर्वांधिक ४०० मेगावॅट वीज जळगाव जिल्ह्यासाठी लागत आहे.उन्हाळ््यात भारनियमन होऊन, नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागू नये, यासाठी महावितरणतर्फे विजेच्या पुरवठ्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा जळगाव परिमंडळात येणाºया जळगाव जिल्ह्यासह धुळे व नंदुरबार या ठिकाणी भारनियमन होणार नाही.-दीपक कुमठेकर, मुख्य अभियंता, महावितरण, जळगाव.

टॅग्स :mahavitaranमहावितरणJalgaonजळगाव