शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

यंदा खान्देश भारनियमनमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 12:38 IST

जळगाव : पंधरा दिवसांपासून थंडी गायब होताच, घरोघरी वातानुकुलीत उपकरणे सुरु झाल्याने विजेची मागणी वाढली आहे. मात्र, महावितरणकडे सध्या ...

जळगाव : पंधरा दिवसांपासून थंडी गायब होताच, घरोघरी वातानुकुलीत उपकरणे सुरु झाल्याने विजेची मागणी वाढली आहे. मात्र, महावितरणकडे सध्या स्थितीला महानिर्मितीकडून करण्यात आलेली विजेची उपलब्धता आणि काही खाजगी कंपन्यांकडून खरेदी करण्यात येत असलेल्या विजेमुळे यंदा जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्हा भारनियमन मुक्त राहील, अशी माहिती महावितरणच्या जळगाव परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी ‘लोकमत’ला दिली.उन्हाळ््याची चाहूल लागताच नागरिकांना भारनियमनाची चिंता सतावते. कारण उन्हाळ््यात विजेची मागणी दुपटीने वाढत असल्याने, विजेचा तुटवडा निर्माण होतो. अशा वेळेस शहरासह ग्रामीण भागात भारनियमन केले जाते. मात्र, यंदा विजेची मोठ्या प्रमाणावर मागणी असली तरी महावितरणकडून जिल्ह्यात कुठेही भारनियमन लागू न करण्याबाबत नियोजन सुरु आहे. विशेषत: एप्रिल आणि ‘मे’ महिन्यात विजेची मागणी सर्वांत मोठी असल्याने, या काळात भारनियमन होऊ नये, यासाठी महानिर्मितीसह खाजगी कंपन्यांच्याच्या प्रतिनिधींशी बैठका घेऊन, आतापासून नियोजन करण्यात येत आहे. मुख्य म्हणजे अनेकवेळा कोळशाच्या टंचाईमुळेदेखील वीजेची उपलब्धता कमी होऊन, भारनियमनाला सामोरे जावे लागते. त्यादृष्टीने महानिर्मितीने आतापासूनच पुरेसा कोळशाचा साठा उपलब्ध करुन ठेवल्याने, यंदा खान्देश भारनियमुक्त राहणार असल्याचा दावा महावितरणतर्फे करण्यात येत आहे. दरम्यान, सध्या जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी दोन ते तीन तास वारंवार वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण वाढले आहे़ या संदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी जिल्हाभरात सुरू असलेल्या वीजेच्या कामांमुळे वीज पुरवठा खंडीत होत असल्याचे स्पष्ट केले़सरासरी लागते ७७० ते ७८० मेगावॅट वीजजळगाव परिमंडळात जळगाव जिल्ह्यासह धुळे व नंदुरबारचा समावेश असून, या तिन्ही जिल्ह्यात सध्या स्थितीला दररोज सरासरी ७७० ते ७८० च्या घरात मेगावॅट वीज लागत आहे. धुळे व नंदुरबारच्या तुलनेने जळगाव जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्र जास्त असल्याने सर्वांधिक ४०० मेगावॅट वीज जळगाव जिल्ह्यासाठी लागत आहे.उन्हाळ््यात भारनियमन होऊन, नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागू नये, यासाठी महावितरणतर्फे विजेच्या पुरवठ्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा जळगाव परिमंडळात येणाºया जळगाव जिल्ह्यासह धुळे व नंदुरबार या ठिकाणी भारनियमन होणार नाही.-दीपक कुमठेकर, मुख्य अभियंता, महावितरण, जळगाव.

टॅग्स :mahavitaranमहावितरणJalgaonजळगाव