शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

यंदा खान्देश भारनियमनमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 12:38 IST

जळगाव : पंधरा दिवसांपासून थंडी गायब होताच, घरोघरी वातानुकुलीत उपकरणे सुरु झाल्याने विजेची मागणी वाढली आहे. मात्र, महावितरणकडे सध्या ...

जळगाव : पंधरा दिवसांपासून थंडी गायब होताच, घरोघरी वातानुकुलीत उपकरणे सुरु झाल्याने विजेची मागणी वाढली आहे. मात्र, महावितरणकडे सध्या स्थितीला महानिर्मितीकडून करण्यात आलेली विजेची उपलब्धता आणि काही खाजगी कंपन्यांकडून खरेदी करण्यात येत असलेल्या विजेमुळे यंदा जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्हा भारनियमन मुक्त राहील, अशी माहिती महावितरणच्या जळगाव परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी ‘लोकमत’ला दिली.उन्हाळ््याची चाहूल लागताच नागरिकांना भारनियमनाची चिंता सतावते. कारण उन्हाळ््यात विजेची मागणी दुपटीने वाढत असल्याने, विजेचा तुटवडा निर्माण होतो. अशा वेळेस शहरासह ग्रामीण भागात भारनियमन केले जाते. मात्र, यंदा विजेची मोठ्या प्रमाणावर मागणी असली तरी महावितरणकडून जिल्ह्यात कुठेही भारनियमन लागू न करण्याबाबत नियोजन सुरु आहे. विशेषत: एप्रिल आणि ‘मे’ महिन्यात विजेची मागणी सर्वांत मोठी असल्याने, या काळात भारनियमन होऊ नये, यासाठी महानिर्मितीसह खाजगी कंपन्यांच्याच्या प्रतिनिधींशी बैठका घेऊन, आतापासून नियोजन करण्यात येत आहे. मुख्य म्हणजे अनेकवेळा कोळशाच्या टंचाईमुळेदेखील वीजेची उपलब्धता कमी होऊन, भारनियमनाला सामोरे जावे लागते. त्यादृष्टीने महानिर्मितीने आतापासूनच पुरेसा कोळशाचा साठा उपलब्ध करुन ठेवल्याने, यंदा खान्देश भारनियमुक्त राहणार असल्याचा दावा महावितरणतर्फे करण्यात येत आहे. दरम्यान, सध्या जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी दोन ते तीन तास वारंवार वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण वाढले आहे़ या संदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी जिल्हाभरात सुरू असलेल्या वीजेच्या कामांमुळे वीज पुरवठा खंडीत होत असल्याचे स्पष्ट केले़सरासरी लागते ७७० ते ७८० मेगावॅट वीजजळगाव परिमंडळात जळगाव जिल्ह्यासह धुळे व नंदुरबारचा समावेश असून, या तिन्ही जिल्ह्यात सध्या स्थितीला दररोज सरासरी ७७० ते ७८० च्या घरात मेगावॅट वीज लागत आहे. धुळे व नंदुरबारच्या तुलनेने जळगाव जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्र जास्त असल्याने सर्वांधिक ४०० मेगावॅट वीज जळगाव जिल्ह्यासाठी लागत आहे.उन्हाळ््यात भारनियमन होऊन, नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागू नये, यासाठी महावितरणतर्फे विजेच्या पुरवठ्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा जळगाव परिमंडळात येणाºया जळगाव जिल्ह्यासह धुळे व नंदुरबार या ठिकाणी भारनियमन होणार नाही.-दीपक कुमठेकर, मुख्य अभियंता, महावितरण, जळगाव.

टॅग्स :mahavitaranमहावितरणJalgaonजळगाव