शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

याड लागलंय प्रेमाचे जामनेरला.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 23:07 IST

प्रियकरासोबत लग्नाला होणारा विरोध, पळून जाऊन लग्न करून पोलीस ठाणे गाठण्याचे प्रकार जामनेर तालुक्यातील ग्रामीण भागात वाढले आहेत.

ठळक मुद्देहळद लागण्याच्या दिवशीच केला प्रियकरासोबत पोबारा.

लोकमत न्यूज नेटवर्क

जामनेर : प्रियकरासोबत लग्नाला होणारा विरोध, पळून जाऊन लग्न करून पोलीस ठाणे गाठण्याचे प्रकार तालुक्यातील ग्रामीण भागात वाढल्याने ‘याड लागलयं प्रेमाचे...’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.

त्याचे असे झाले की, पहिल्या घटनेत ग्रामीण भागातील या तरुणीला शुक्रवारी हळद लागणार होती. गावातील तरुणाशी तिचे प्रेमसंबंध होते, मात्र घरच्यांचा विरोध पाहून दोघांनी गुरुवारी गाव सोडले. मुलगी अचानक घरून निघून गेल्याने चिंतातुर पालकांनी शोध घेतला. कुठेही थांगपत्ता न लागल्याने पालकांनी पोलिसांत हरवल्याची तक्रार दिली.

विशेष म्हणजे त्या तरुणीचा आज विवाह होणार होता व दुपारीच ती पोलीस ठाण्यात प्रियकरासोबत लग्न करून हजर झाली. पोलिसांनी पालकांना बोलावले, मात्र तिने पालकांकडे जाण्यास नकार दिला.

ओळखीतून प्रेम बहरले

दुसऱ्या घटनेतील तरुणीचा साखरपुडा ठरला होता. तिची ओळख गावाजवळील दुसऱ्या तरुणाशी झाल्याने या ओळखीतून प्रेम बहरले. मात्र पालकांनी ठरवलेल्या तरुणाशीच विवाह करावा लागेल, या चिंतेने तिने त्या तरुणासोबत गाव सोडले व आज लग्न करून पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी पालकांना बोलावले. घरी जाण्यास नकार देतानाच त्या तरुणीने चक्क पोलीस संरक्षण मागितल्याने पोलीसही चक्रावले. पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी जबाब नोंदवून घेतले. अखेर या दोन्ही घटनेतील प्रेमी युगलांनी पोलिसांसमक्ष गाव सोडून इच्छितस्थळी जाणे पसंद केले.

टॅग्स :JalgaonजळगावJamnerजामनेरmarriageलग्न