शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

शिक्षकांवर शिकविण्यापेक्षा इतर कामांचेच ओझे अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 19:04 IST

जळगाव - आदर्श विद्यार्थी घडविण्याचे काम शिक्षकांमार्फत होत असते. शिक्षक हाच विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक गुरू असतो. समाजात शिक्षकाला आदराचे स्थान ...

ठळक मुद्दे राष्ट्रीय कार्याच्या नावाखाली शिक्षकांवरच सारे घेतले जाते खपवून

जळगाव - आदर्श विद्यार्थी घडविण्याचे काम शिक्षकांमार्फत होत असते. शिक्षक हाच विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक गुरू असतो. समाजात शिक्षकाला आदराचे स्थान आहे. शाळेतून सर्व ज्ञान विद्यार्थ्यांना देण्याचा त्याचा अखंडित प्रवास सुरू असतो. मात्र, जिल्हा परिषद शिक्षकांवर शिकविण्यापेक्षा इतर कामांचेच ओझे जास्त आहे. याचा परिणाम थेट विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत असून इंग्रजी शाळांकडे पालकांचा ओढा वाढला आहे. त्यामुळे इतर कामांसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारल्यास शिक्षणाची गुणवत्ता सुधारेल असा सूर विविध शिक्षक संघटनांतून उमटत आहे.निवडणूक आयोगाचे महत्वाचे काम आहे. हे सर्वच मान्य करतात. त्याचे प्रशिक्षण घेणे, मतदान केंद्राध्यक्ष अधिकारी, कर्मचारी म्हणून ड्युटी करणे हे काम सर्व शिक्षक राष्ट्रीय कार्य म्हणून आवडीने करतात. परंतु, याव्यतिरिक्त अनेक कामाचे दडपण, अनेक अशैक्षणिक कामाचे ओझे शिक्षकांवर आले आहे. इतरही कोणतेही कामे असो, ते शिक्षकांचे माथी मारले जाते. त्यात मतदार यादी सर्वेक्षण, शौचालय नोंदणी, विविध जनजागृती, आरोग्य तपासणी विभागाचे विविध कार्य, मतदान याद्या तयार करणे आदी कामांचा समावेश आहे. यातून सुटका कधी असा शिक्षकांचा प्रश्न आहे.गुरूजी शाळेत येतच नाही, असा होतो आरोपशिक्षकांना शाळेत विद्यार्थ्यांना शिकविण्यापेक्षा इतर अशैक्षणिक काम जास्त करावे लागतात. या कामासाठी एक शिक्षक पूर्णपणे लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकविण्याची काम मागे पडतात. पर्यायाने शिक्षक शिकवतच नाही, शाळेतच येत नाही, असा विद्यार्थी अपप्रचार करतात. त्यामुळे पालकांचा शाळा व शिक्षकाप्रती पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो. त्यातच दोन शिक्षकी शाळा असली की, दुसर्या शिक्षकावरही ताण पडतो.शासकीय योजनांचा भार- शिक्षकांना मतदार यादी, पशु, गाव, आरोग्य असे अनेक प्रकारचे सर्वे, जनजागृती मोहिमा, जनगणना अशी अनेक कामे करावी लागतात. या कामांसाठीच एक शिक्षक पूर्णवेळ लागतो.- पोषण आहार, धान्य वाटप आणि त्यासोबत त्याचे १२ प्रकारचे रेकॉर्ड ठेवणे, निवडणुकीची कामे, आरोग्य विभागाचे लसीकरण, गावातील आजारी, वृद्ध, बालकांचे सर्वेक्षण, गोळ्या औषधांचे वाटप, कृषी विभागाची कामे, प्रत्येक नव्या उपक्रमांत शिक्षक केंद्रस्थानी असतो.- कोरोना काळातही शिक्षकांना कामे होतीच. शाळेच्या काळात अशी कामे लावल्यावर त्या शिक्षकाने अध्यापन कधी करावे, असा सवाल शिक्षक संघटनांनी केला.गुणवत्तेवर होतो परिणाम...शिक्षकांना अशैक्षणिक कामे मोठ्या प्रमाणात दिली जातात. याचा परिणामी शैक्षणिक गुणवत्तेवर होतो. अनेक शिक्षकांना मानसिक आजारासह इतर आजारही जडले आहेत. दोन शिक्षकी शाळांच्या शिक्षकांचे अधिक हाल हातात. त्यामुळे गुणवत्तेचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी शिक्षकांवर अतिरिक्त कामांचे ओझे नको.- प्रमोद पाटील, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदजिल्हा परिषदेच्या शाळा - १८२७जिल्हा परिषद शिक्षकांची संख्या - ७३७७जि. प. शाळा विद्यार्थी संख्या - १८३९६९

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव