शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
3
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
4
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
5
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
6
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
7
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
8
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
9
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
10
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
11
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
12
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
13
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
14
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
15
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
16
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
18
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
19
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
20
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!

प्रसूतीनंतर अतिरक्तस्त्राव झाल्यानं विवाहितेचा मृत्यू; नातलगांचा डॉक्टरांवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 3:35 PM

डॉक्टरांनी केलेल्या हलगर्जीपणामुळेच पूजा यांचा मृत्यू झाल्याचा आरोप विश्वकर्मा कुटुंबीयांनी केला आहे. इनकॅमेरा शवविच्छेदन करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

जळगाव- प्रसूतीनंतर मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने एका विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी जळगावात घडली. डॉक्टरांनी उपचारात हलगर्जीपणा केल्यानेच विवाहितेचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप मृत विवाहितेच्या नातेवाइकांनी केला आहे. दरम्यान, या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

पूजा जयप्रकाश विश्वकर्मा असे या मृत विवाहितेचे नाव आहे. या घटनेसंदर्भात मृत पूजा यांच्या सासूबाई पुष्पा विश्वकर्मा व पती जयप्रकाश विश्वकर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा यांना काल (शुक्रवारी) सकाळी शहरातील डॉ. तिलोत्तमा गाजरे यांच्या गाजरे रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी त्यांची नॉर्मल प्रसुती झाली. मात्र, यानंतर पूजा यांची प्रकृती खालावली. मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने त्यांना डॉ. गाजरे यांच्या रुग्णालयातून आकाशवाणी चौकातील अपेक्स रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्या ठिकाणी उपचार सुरू असताना त्यांचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला. डॉक्टरांनी हजारो रुपयांची औषधी मागवली. मात्र, तरीही त्यांचा जीव वाचला नाही. डॉक्टरांनी केलेल्या हलगर्जीपणामुळेच पूजा यांचा मृत्यू झाल्याचा आरोप विश्वकर्मा कुटुंबीयांनी केला आहे. इनकॅमेरा शवविच्छेदन करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

प्रकरणाची चौकशी करून डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी-विश्वकर्मा कुटुंबीयांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या घटनेनंतर रुग्णालयात काही काळ तणावाचे वातावरण होते. घटनास्थळी काही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलीस देखील दाखल झाले होते. या प्रकरणी उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नव्हता.

डॉक्टर गाजरे म्हणतात...पूजा विश्वकर्मा यांची प्रसूती माझ्या रुग्णालयात झाली. प्रसूतीनंतर गर्भाशय नैसर्गिकरित्या आकुंचन पावते. पण पूजा यांच्या बाबतीत तसे झाले नाही. अतिप्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाल्याने त्यांना अपेक्स रुग्णालयात हलविण्यात आले. त्याठिकाणी योग्य तो औषधोपचार केले. शर्थीचे प्रयत्न करूनही त्यांचा जीव वाचला नाही. त्यांच्या उपचारात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा झालेला नाही, असे स्पष्टीकरण डॉ. तिलोत्तमा गाजरे यांनी दिले आहे. विश्वकर्मा कुटुंबीयांनी केलेले आरोप त्यांनी नाकारले आहेत.

 

 

टॅग्स :Jalgaonजळगावdoctorडॉक्टरWomenमहिला