शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
6
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
7
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
8
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
9
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
10
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
11
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
12
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
13
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
14
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
16
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
17
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
18
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
19
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
20
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले

विधान परिषद : 'युती' तोडणाऱ्या खडसेंना शिवसेना खरंच मतदान करणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 18:13 IST

महाविकास आघाडीचे उमेदवार खडसेंची वाट बिकट?

प्रशांत भदाणेविधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगानं सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून येतंय. राज्यसभेप्रमाणे या निवडणुकीतही महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशीच लढत आहे. राज्यसभेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून महाविकास आघाडी समोर भाजपचं आव्हान तर आहेच पण त्यासोबतच स्वकियांमधील मतभेदाचं मोठं आव्हान महाविकास आघाडीला पेलावं लागणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंना स्वकियांकडून दगाफटका होण्याची भीती आहे. खडसे महाविकास आघाडीचे उमेदवार असले तरी त्यांना शिवसेनेची मते मिळणार का? हा खरा प्रश्न आहे. कारण भाजप सेनेतील युती तोडल्याचा राग... आणि इतिहासातील काही गोष्टींचा राग आजही शिवसैनिकांच्या मनात आहे. त्यामुळं विधान परिषदेचा कोण गुलाल उधळणार हे पाहणं महत्त्वाचं असेल

एकनाथ खडसे, भाजप सोडून राष्ट्रवादीत आलेले उत्तर महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत. राष्ट्रवादीत आल्यावरही राजकीय पुनर्वसनासाठी त्यांची धडपड सुरु आहे. राष्ट्रवादीनं आता त्यांना विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारी दिली खरी, पण खडसे सहज आमदार होतील, अशी स्थिती नाहीये. राष्ट्रवादीत आल्यापासून भाजप खडसेंच्या निशाण्यावर आहे. त्यामुळं खडसेंना रोखण्यासाठी भाजप फिल्डिंग लावेल, यात शंका नाही. दुसरीकडं खडसेंनी आमदार व्हावं हे जळगाव जिल्ह्यातील स्वकियांनाच रुचणारं नाही. आता हे स्वकीय कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी इतिहासाची पाने चाळली तर ती नावे समोर येतील. पालकमंत्री गुलाबराव पाटील, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील या नेत्यांचे खडसेंसोबत कायमच हाडवैर राहिलं आहे. या इतिहासाचा परिणाम खडसेंच्या बाजूने असेल की विरोधात हे पुढच्या दोनच दिवसात स्पष्ट होणार आहे.

यापूर्वी राज्यात भाजप सेनेची युती होती. असं असताना जळगावात मात्र, गुलाबराव पाटील आणि चंद्रकांत पाटलांसोबत खडसेंचं हाडवैर होतं, ते आजही कायम आहे. खडसे कृषिमंत्री असताना गुलाबराव पाटलांनी त्यांच्यावर शासकीय अनुदान लाटल्याचा आरोप केला होता. त्यामुळं गुलाबराव पाटलांवर त्यांच्या मुलाच्या हळदीच्या दिवशीच, खडसेंनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. एवढंच नाही तर आईचं निधन झालं तेव्हाही गुलाबराव पाटील तुरुंगात होते. दुसरीकडं चंद्रकांत पाटील हे सुरुवातीपासून खडसेंशी संघर्ष करत आहेत. हा इतिहास असताना हे दोन्ही नेते खडसेंच्या पदरात आपलं मत टाकतील का? हा खरा प्रश्न आहे. विशेष म्हणजे या दोन्ही नेत्यांचं अलीकडे भाजप नेते गिरीश महाजनांशी चांगलं ट्युनिंग जमतं, त्यामुळं खडसेंना मैदान मारणं सोपं नाही हेही तितकंच खरं.

एकीकडं अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना विधानपरिषद निवडणुकीत मतदान करता येणार नाहीये. त्यामुळं राष्ट्रवादीची हक्काची दोन मतं कमी झाली आहेत, अशातच शिवसेनेची मतं मिळाली नाहीत तर खडसेंची वाट बिकट आहे, हे निश्चित.

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाElectionनिवडणूक