शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

वार्तापत्र : यंदा उपाययोजना करणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 21:03 IST

- सागर दुबे बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षकाच्या अधिकारातंर्गत (आरटीई) खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेशस्तरावर २५ टक्के जागा वंचित दुर्बल ...

- सागर दुबेबालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षकाच्या अधिकारातंर्गत (आरटीई) खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेशस्तरावर २५ टक्के जागा वंचित दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येत असते. या जागांसाठी दरवर्षी सात ते आठ हजार अर्ज शिक्षण विभागाला प्राप्त असतात. मात्र, तरी सुध्दा हजारावर आरटीईच्या जागा रिक्त राहतात. गेल्या तीन ते चार वर्षांपासून जागा रिक्त राहण्याची परंपरा कायम आहे. मात्र, त्यावर कुठलाही तोडगा काढण्यात आलेला नाही. यावर्षी जागा रिक्त राहू नये यासाठी काय उपाययोजना राबविल्या जातात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

नुकतेच ३ मार्च पासून आरटीई प्रवेशासाठी पालकांकडून ऑनलईन अर्ज मागविले जात आहे. पहिल्याच दिवशी पाचशेवर पालकांनी अर्ज केले. ३१ मार्चपर्यंत पालकांना अर्ज करता येणार आहे. मात्र, यंदाही राखीव जागा रिक्त राहू नये, यासाठी शिक्षण विभागाने उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. पाल्याची प्रवेश निश्चितीसाठी पालकांना संदेश पाठविला जातो. मात्र, ग्रामीण भागातील पालकांना कधी संदेश प्राप्त होत नाही. त्यामुळे ते शाळापर्यंत पोहचत नाही. त्यामुळे पाल्यास प्रवेशापासून वंचित राहण्याची वेळ येते. मागील वर्षी अकराशे जागा रिक्त राहिल्या. त्यामुळे यंदाही जागा रिक्त राहणार नाही. याची काळजी घेणे आवश्यक आहे. आरटीई प्रवेशासाठीचा अर्ज दाखल करण्यासाठी ऑनलाईन व ॲपची सुविधा शिक्षण विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आली होती.मात्र, ॲपला पालकांचा कमी प्रतिसाद मिळताना दिसून येत. यंदा ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नसल्याचे दिसून येत आहे. यावर्षी ३ हजार ६५ जागांसाठी आजापर्यंत १ हजार ८०० पालकांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. शिक्षण विभागाकडून कागदपत्रांबाबत आवश्यक सूचना करण्यात आल्या आहे. अद्याप लॉटरी संदर्भात कुठलीही तारीख जाहीर झालेली नाही. यावेळी किती मुलांचे सिलेक्शन होते. याकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव