शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

मनपाच्या विकास योजनांमध्ये त्रुटी ठेवणारा झारीतील शुक्राचार्य कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:20 IST

कोट्यवधींचा भुर्दंड देणाऱ्या अधिकाऱ्यांना अभय कोणाचे ? : मनपाचा भोंगळ कारभार अजय पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिकेतील ...

कोट्यवधींचा भुर्दंड देणाऱ्या अधिकाऱ्यांना अभय कोणाचे ? : मनपाचा भोंगळ कारभार

अजय पाटील,

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महापालिकेतील प्रशासकीय कामकाजातील चुकांचे वेगवेगळे प्रताप आता समोर येत असून, ठराविक अधिकारी ‘मोडस ऑपरेंडीस’ यामध्ये कार्यरत असल्याचेही दिसून येत आहे. ठराविक अधिकाऱ्यांकडून विविध योजना, विकास कामे व निविदांमध्ये वारंवार चुका करून किंवा मुद्दाम त्रुटी ठेवण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे महापालिकेला कोट्यवधींचा भुर्दंड बसत असून, अशा चुका वारंवार करणाऱ्या मनपातील झारीतील शुक्राचार्याला कोणाचा राजाश्रय लाभत आहे, असा प्रश्न यामुळे उपस्थित केला जात आहे.

मनपातील ठराविक अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे मनपाला तर आर्थिक फटका बसतच आहे, मात्र, यामुळे त्या योजनांवर देखील परिणाम होत आहे. घनकचरा प्रकल्प असो वा मलनिस्सारण योजना, ही सर्व कामे लांबतच जात आहेत. यामुळे जळगावकरांना मनपा अधिकाऱ्यांच्या चुकांचा फटका देखील बसत आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये झालेल्या चुका व बसलेला भुर्दंड

१. योजना - घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प

झालेली चूक - इतर मनपांचा डीपीआर केला कॉपी-पेस्ट. तसेच न तपासता शासनाकडे पाठविला मंजुरीला.

बसलेला भुर्दंड - शासनाने जुना डीपीआर नामंजूर करून, नवीन डीपीआर तयार करण्याच्या दिल्या सूचना. तसेच नव्याने वाढीव खर्च टाकून, या १८ कोटींच्या खर्चाची जबाबदारी दिली मनपा प्रशासनावर. ३१ कोटींचा डीपीआर मनपाच्या चुकीमुळे झाला ४९ कोटींचा.

२. योजना - अमृतअंतर्गत भुयारी गटार योजना

झालेली चूक - भुयारी गटार योजनेसाठी निविदा तयार करताना योजनेंतर्गत रस्त्यांचे खोदकाम केल्यानंतर, त्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची जबाबदारी मक्तेदारावर न सोपविता ती महापालिकेवरच देण्यात आली.

बसलेला भुर्दंड - भुयारी गटार योजनेंतर्गत शहरातील सुमारे २२० कि.मी.चे रस्ते खोदण्यात आले. हे रस्ते नव्याने तयार करण्यासाठी मनपाला सुमारे १० ते २० कोटींचा खर्च येणार आहे.

३. योजना - अमृतअंतर्गत पाणी पुरवठा योजना

झालेली चूक - अमृतअंतर्गत पाणी पुरवठा योजनेंतर्गत नागरिकांना २४ तास पाणी पुरवठा होणार आहे. यासाठी वॉटर मीटरची आवश्यकता राहणार आहे. मात्र, मनपाकडून निविदा तयार करताना निविदेत वॉटर मीटरचा उल्लेखच करण्यात आला नाही.

बसलेला भुर्दंड - नागरिकांना २४ तास पाणी पुरवठा वॉटर मीटरशिवाय करूच शकत नाहीत. तसेच आता नव्याने वॉटर मीटर बसविण्यासाठी ९६ कोटींचा खर्च येणार असून, जोपर्यंत वॉटर मीटर बसणार नाही, तोपर्यंत जळगावकरांना २४ तास पाणी पुरवठा करणे शक्य नाही. तसेच हा खर्चही मनपाला करावा लागणार आहे.

४. योजना - बायोमायनिंग प्रकल्प

झालेली चूक - आव्हाणे शिवारातील मनपाचा बंद पडलेला घनकचरा प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी याठिकाणी अनेक वर्षांपासून पडलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी एका संस्थेला ठेका देण्यात आला. ठेक्यासाठी निविदा काढताना प्रकल्पाच्या ठिकाणी पडलेल्या कचऱ्याचे अंदाजे माप घेण्यात आले. त्यानुसार तेच माप निर्धारित धरून, तेवढ्या कचऱ्यावर बायोमायनिंग प्रक्रिया करण्यासाठी निविदा काढण्यात आली.

बसलेला भुर्दंड - १ लाख मेट्रिक टन एवढ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी मनपाने निविदा काढली. ठेकेदाराने मनपाने निश्चित करून दिलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया केल्यानंतर याठिकाणी अजून ८० हजार टनपेक्षा अधिक कचरा पडून आहे. या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पुन्हा नव्याने काम सुरू करावे लागणार आहे.

चुका करणाऱ्या अधिकाऱ्याला कोणाचे अभय ?

मनपातील ठराविक अधिकाऱ्याकडूनच वारंवार चुका केल्या जात आहेत. मात्र, अशा अधिकाऱ्यावर कोणतीही कारवाई आतापर्यंत होताना दिसून येत नाही. मनपाला तब्बल ५० ते ७० कोटींचा भुर्दंड देऊनही अशा चुका करणाऱ्या अधिकाऱ्याची साधी चौकशी देखील मनपाकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे या अधिकाऱ्याला कोणाचे अभय मिळत आहे का ? याचीही चौकशी होणे आता गरजेचे आहे. घनकचरा प्रकल्पाप्रकरणी महापौरांनी चौकशीचे आदेश दिले असून, या चौकशीत तरी चुका करणाऱ्या अधिकाऱ्यांचे नाव समोर येण्याची शक्यता आहे.