शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
2
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
3
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
4
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
5
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
6
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
7
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
8
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
9
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
10
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
11
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
12
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
13
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'
14
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
15
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
16
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
17
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
18
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
19
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
20
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."

लग्न असो की अंत्ययात्रा फुलं मात्र या गावाचीच

By विलास.बारी | Published: December 05, 2017 3:18 PM

फुलशेतीमुळे जळगाव जिल्ह्यातील या गावाचे बदलले अर्थकारण

ठळक मुद्देशिरसोली परिसरात भ्रमंतीदरम्यान कास पठाराची अनुभूतीलग्न असो की अंत्ययात्रा फुलं मात्र शिरसोलीचेचफुलशेतीमुळे बदलले गावाचे अर्थकारण

विलास बारीजळगाव,दि.५ : मानवाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत विविध प्रकारचे संस्कार करण्यात येत असतात. प्रत्येक संस्कारासाठी काही विधी ठरवून दिले आहेत त्यात फुलं ही अविभाज्य भाग असतात. एखाद्या ठिकाणी अंत्यसंस्कार असो किंवा विवाह समारंभ या ठिकाणी जळगावपासून अवघ्या १४ किलोमिटर अंतरावर असलेल्या शिरसोली या गावातील विविध रंगी फुले ही हमखास असतात. फुलशेतीमुळे या गावाचे अर्थकारण बदलून गेले आहे.७० टक्के शेतकऱ्यांचा फुलशेती व्यवसायजळगावपासून काही अंतरावर असलेल्या शिरसोली गावातील एकुण क्षेत्रापैकी तब्बल ७० टक्के क्षेत्रावर शेतकऱ्यांनी फुलशेती सुरु केली आहे. रोख आणि हमीचे पिक असल्याने शेतकऱ्यांकडून शेवंती, झेंडू, लिली, नवरंग, तेरडा, गुलाब, निशिगंध, जरबेरा, मोगरा यासह विविध फुलांची लागवड केली जात आहे.जळगाव, पुणे व नाशिकची बाजारपेठशिरसोलीच्या फुलांना जळगावसह पुणे व नाशिक याठिकाणी मोठी मागणी आहे. शहराच्या लगत असलेल्या या गावातील शेतकऱ्यांना फुलांची मोठी बाजारपेठ लाभली आहे. त्यामुळे थेट नाशिक व पुणे-मुंबईपर्यंत रोज संध्याकाळी स्वतंत्र वाहने किंवा लक्झरीमार्फत फुले पाठविण्यात येत असतात. एका एकरमध्ये दोन ते तीन लाखांचे उत्पन्न घेणारे अनेक शेतकरी या भागात आहेत.फुलशेतीमुळे बदलले गावाचे अर्थकारण३५ ते ४० हजार लोकसंख्या असलेल्या शिरसोली गावात ५५ टक्के बारी समाजाची वस्ती आहे. सुरुवातीला हा समाज नागवेलीची (विळ्याच्या पानाची) शेती करीत होता. मात्र पानतांड्यावर वारंवार येणारे रोग आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आर्थिक संकटावर पर्याय म्हणून बारी समाज बांधव गेल्या दहा ते बारा वर्षांपासून फुलशेतीकडे वळले. हळूहळू बारी समाजासोबतच माळी, पाटील, मराठा पाटील समाजबांधवांनी देखील फुलशेतीकडे आपला मोर्चा वळविला. फुलशेतीमुळे गावाचे अर्थकारण बदलले आहे.पहाटे तीन वाजता सुरु होते लगबगफुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांची पहाटे तीन वाजेपासून शेतातील फुले तोडण्यासाठी लगबग सुरु होते. सकाळी सात वाजेपर्यंत फुले तोडून आणल्यानंतर चांगल्या व थोड्या हलक्या दर्जाच्या फुलांची वर्गवारी केली जाते. त्यानंतर ही फुले जळगावातील गोलाणी मार्केटमध्ये भरणाऱ्या फुलबाजारात विक्रीसाठी आणले जातात. या ठिकाणी प्रत्येक उत्पादकाने कोणत्या आडत्याकडे फुले द्यावे हे ठरलेले असते. ज्या शेतकºयांना पुणे, मुंबई किंवा नाशिक येथे फुले पाठवायची असतात ते मजुरांच्या माध्यमातून दिवसभर फुले तोडून लक्झरी किंवा स्वतंत्र वाहनातून रात्री फुले रवाना केली जातात.शिरसोली परिसरात भ्रमंतीदरम्यान कास पठाराची अनुभूतीशिरसोली परिसरात शेतांमध्ये फेरफटका मारल्यानंतर लांबपर्यंत फुलांची शेती आढळून येते. विविधरंगी आणि विविध जातीची फुले पाहिल्यानंतर सातारा जिल्ह्यातील कास पठाराची अनुभूती याठिकाणी येत असते. विविध जातींच्या गुलाबासह येथील शेतकऱ्यांनी जरबेरा, कार्निशिया यासारख्या थंड वातावरणात वाढीस लागणाऱ्या फुलांची देखील शेती सुरु केली आहे.लग्न असो की अंत्ययात्रा फुलं मात्र शिरसोलीचेचजळगावात विविध सभा, समारंभ तसेच सजावटीसाठी शिरसोलीच्या फुलांचा वापर केला जातो. एखाद्या कुटुंबात विवाह असला तरी अंत्यसंस्कार असले तरी या गावातील फुलांचा वापर होत असतो. शिरसोलीसह पाळधी, वावडदे, जळके,पाळधी या गावांमध्ये देखील फुलांची लागवड करण्यात येत असते.

टॅग्स :JalgaonजळगावFarmerशेतकरी