शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
2
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
3
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
4
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
5
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
6
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
7
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
8
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
10
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
11
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
12
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
13
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
14
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
15
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
17
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
18
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
19
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
20
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

अपघातात घरातील कर्ता पुरुष गेल्याचे दु:ख लोकप्रतिनिधी व प्रशासनाला केव्हा कळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 13:40 IST

विकास पाटीलराष्टÑीय महामार्ग क्रमांक सहा मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या चार महिन्यात असा एकही दिवस नाही की जळगाव ते नशिराबाद दरम्यान महामार्गावर अपघात झाला नाही. निष्पाप नागरिकांचा बळी जात असताना लोकप्रतिनिधी व प्रशासन हलायला तयार नाही. नागरिकांच्या सहनशिलतेचा अंत हे दोन्ही घटक पाहत आहेत.जळगाव जिल्ह्यातील चिखली (ता.मुक्ताईनगर) पासून तर धुळे ...

विकास पाटीलराष्टÑीय महामार्ग क्रमांक सहा मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या चार महिन्यात असा एकही दिवस नाही की जळगाव ते नशिराबाद दरम्यान महामार्गावर अपघात झाला नाही. निष्पाप नागरिकांचा बळी जात असताना लोकप्रतिनिधी व प्रशासन हलायला तयार नाही. नागरिकांच्या सहनशिलतेचा अंत हे दोन्ही घटक पाहत आहेत.जळगाव जिल्ह्यातील चिखली (ता.मुक्ताईनगर) पासून तर धुळे जिल्ह्यातील फागणेपर्यंतच्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे कामगेल्याकाहीवर्षांपासूनहाती घेण्यात आले आहे. मात्र हे काम अत्यंत धीम्या गतीने सुरु आहे. ते केव्हा पूर्ण होईल, हे प्रशासनही सांगू शकत नाही. महामार्गाच्या दोन्ही बाजूला खोदकाम करण्यात आल्याने हा महामार्ग धोकादायक बनला असून अपघाताला आमंत्रण देत आहे. त्यामुळे महामार्गाचे चौपदरीकरण तातडीने होणे आवश्यक आहे.पाळधी ते नशिराबादपर्यंतचा महामार्ग तरअत्यंत धोकादायक बनला आहे. प्रचंड वर्दळ, त्यातच महामार्गाची व साईडपट्ट्यांची झालेली दैना अपघातास कारणीभूत ठरत आहे. चौपदरीकरण होईल तेव्हा होईल मात्र साईडपट्ट्यांची दुरुस्ती करण्यास काय अडचण आहे?दररोज होत असलेल्या अपघातात कुणाचा मुलगा ठार होत आहे तर कुणाचा पिता. घरातील कर्त्या पुरुषाचाच मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळत आहे. मात्र लोकप्रतिनिधी व प्रशासनाला याचे सोयरेसुतक नाही. ज्या कुटुंबाचे पोट त्या कर्ता पुरुषावर अवलंबून असते, तो अचानक गेल्याने त्या कुटुंबाची अवस्था काय असते, हे लोकप्रतिनिधी व प्रशासनाला कदाचित माहित नसावे. म्हणून कदाचित महामार्गाचे चौपरीकरण व जळगावातील समांतर रस्त्यांचे काम तातडीने व्हावे यासाठी हे दोन्हीही घटक प्रयत्न करताना दिसत नाही. ते केले असते तर आतापर्यंत बरेच काम झाले असते व अनेकांचा जीव वाचला असता. मात्र लोकप्रतिनिधी केवळ आश्वासने देवून वेळ मारुन नेत आहेत.जळगावजिल्ह्यातरस्ते सुरक्षा समितीची बैठक नियमितहोत नाही. कधी तरी होते, तिही कुणी गांभीर्याने घेत नाही. आतापर्यंत झालेल्या बैठकांमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयांची अंमलबजावणी झालेलीनाही. त्यामुळे अपघातांची मालिका सुरुच आहे. काल पाळधीगावानजीक वळण रस्त्यावर शाळेतील विद्यार्थ्यांना घरी घेवून जाण्यासाठी शाळेकडे जात असलेल्या एका व्हॅनला दुचाकीने जोरदार धडक दिली. त्यात तीन जण ठार झाले. गेल्या महिन्यात नशिराबाद नजिकही वळणावर भीषण अपघात झाला होता. त्यात जळगावातील पाच तरुण ठार झाले होते. त्यानंतर त्याच जागी पुन्हा दोन ट्रकचा समोरासमोर अपघात झाला. त्यात दोन चालक ठार झाले. वळणांवर वारंवार अपघात होत असताना तेथे साधे ‘रिफ्लेक्टर’ही लावण्याची तसदी प्रशासनघेतनाही.यावरुनवाहनधारकांच्या जीवाची त्यांना किती काळजी आहे, हे यावरुन दिसून येते.

टॅग्स :AccidentअपघातJalgaonजळगाव