शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात घरातील कर्ता पुरुष गेल्याचे दु:ख लोकप्रतिनिधी व प्रशासनाला केव्हा कळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 13:40 IST

विकास पाटीलराष्टÑीय महामार्ग क्रमांक सहा मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या चार महिन्यात असा एकही दिवस नाही की जळगाव ते नशिराबाद दरम्यान महामार्गावर अपघात झाला नाही. निष्पाप नागरिकांचा बळी जात असताना लोकप्रतिनिधी व प्रशासन हलायला तयार नाही. नागरिकांच्या सहनशिलतेचा अंत हे दोन्ही घटक पाहत आहेत.जळगाव जिल्ह्यातील चिखली (ता.मुक्ताईनगर) पासून तर धुळे ...

विकास पाटीलराष्टÑीय महामार्ग क्रमांक सहा मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या चार महिन्यात असा एकही दिवस नाही की जळगाव ते नशिराबाद दरम्यान महामार्गावर अपघात झाला नाही. निष्पाप नागरिकांचा बळी जात असताना लोकप्रतिनिधी व प्रशासन हलायला तयार नाही. नागरिकांच्या सहनशिलतेचा अंत हे दोन्ही घटक पाहत आहेत.जळगाव जिल्ह्यातील चिखली (ता.मुक्ताईनगर) पासून तर धुळे जिल्ह्यातील फागणेपर्यंतच्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे कामगेल्याकाहीवर्षांपासूनहाती घेण्यात आले आहे. मात्र हे काम अत्यंत धीम्या गतीने सुरु आहे. ते केव्हा पूर्ण होईल, हे प्रशासनही सांगू शकत नाही. महामार्गाच्या दोन्ही बाजूला खोदकाम करण्यात आल्याने हा महामार्ग धोकादायक बनला असून अपघाताला आमंत्रण देत आहे. त्यामुळे महामार्गाचे चौपदरीकरण तातडीने होणे आवश्यक आहे.पाळधी ते नशिराबादपर्यंतचा महामार्ग तरअत्यंत धोकादायक बनला आहे. प्रचंड वर्दळ, त्यातच महामार्गाची व साईडपट्ट्यांची झालेली दैना अपघातास कारणीभूत ठरत आहे. चौपदरीकरण होईल तेव्हा होईल मात्र साईडपट्ट्यांची दुरुस्ती करण्यास काय अडचण आहे?दररोज होत असलेल्या अपघातात कुणाचा मुलगा ठार होत आहे तर कुणाचा पिता. घरातील कर्त्या पुरुषाचाच मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळत आहे. मात्र लोकप्रतिनिधी व प्रशासनाला याचे सोयरेसुतक नाही. ज्या कुटुंबाचे पोट त्या कर्ता पुरुषावर अवलंबून असते, तो अचानक गेल्याने त्या कुटुंबाची अवस्था काय असते, हे लोकप्रतिनिधी व प्रशासनाला कदाचित माहित नसावे. म्हणून कदाचित महामार्गाचे चौपरीकरण व जळगावातील समांतर रस्त्यांचे काम तातडीने व्हावे यासाठी हे दोन्हीही घटक प्रयत्न करताना दिसत नाही. ते केले असते तर आतापर्यंत बरेच काम झाले असते व अनेकांचा जीव वाचला असता. मात्र लोकप्रतिनिधी केवळ आश्वासने देवून वेळ मारुन नेत आहेत.जळगावजिल्ह्यातरस्ते सुरक्षा समितीची बैठक नियमितहोत नाही. कधी तरी होते, तिही कुणी गांभीर्याने घेत नाही. आतापर्यंत झालेल्या बैठकांमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयांची अंमलबजावणी झालेलीनाही. त्यामुळे अपघातांची मालिका सुरुच आहे. काल पाळधीगावानजीक वळण रस्त्यावर शाळेतील विद्यार्थ्यांना घरी घेवून जाण्यासाठी शाळेकडे जात असलेल्या एका व्हॅनला दुचाकीने जोरदार धडक दिली. त्यात तीन जण ठार झाले. गेल्या महिन्यात नशिराबाद नजिकही वळणावर भीषण अपघात झाला होता. त्यात जळगावातील पाच तरुण ठार झाले होते. त्यानंतर त्याच जागी पुन्हा दोन ट्रकचा समोरासमोर अपघात झाला. त्यात दोन चालक ठार झाले. वळणांवर वारंवार अपघात होत असताना तेथे साधे ‘रिफ्लेक्टर’ही लावण्याची तसदी प्रशासनघेतनाही.यावरुनवाहनधारकांच्या जीवाची त्यांना किती काळजी आहे, हे यावरुन दिसून येते.

टॅग्स :AccidentअपघातJalgaonजळगाव