शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

जि.प.ला महसूल मिळवून देणाऱ्या छापखान्याचे दार उघडणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:15 IST

जळगाव : गेल्या १७ वर्षांपासून बंद असलेल्या जिल्हा परिषद छापखान्याचा विषय प्रत्येक सभेमध्ये गाजतो. मात्र, चर्चेपलीकडे या छापखान्याची चाके ...

जळगाव : गेल्या १७ वर्षांपासून बंद असलेल्या जिल्हा परिषद छापखान्याचा विषय प्रत्येक सभेमध्ये गाजतो. मात्र, चर्चेपलीकडे या छापखान्याची चाके सुरू होण्यासाठी ठोस प्रयत्न होत नाहीत. त्यामुळे जि.प.चा स्टेशनरीचा खर्च सुरूच आहे; शिवाय यातून मिळणारा महसूल व उत्पन्न याकडेही गांभीर्याने बघितले जात नाही. गेल्या दोन वर्षांपूर्वी हालचाली गतिमान झाल्याचे चित्र असतानाच अचानक पुन्हा हा विषय थंड बस्त्यात गेला आहे. या छापखान्याच्या ठिकाणी आता फक्त भंगार पडले असून उत्पन्नाचे हे स्रोत प्रशासकीय अनास्थेमुळे रखडले आहे.

१ जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीत छापखाना आहे. या ठिकाणी दिशादर्शक फलकही लावण्यात आला आहे. मात्र, छापखान्यासमोर आता वाहने उभी केली जातात आणि वर्षानुवर्षे याचे दार बंदच ठेवले आहे. अगदी कधीतरी अचानक ते उघडले जाते.

इतिहास असा

२ १९९१ मध्ये छापखान्याला सुरुवात झाली. १९९४ पर्यंत हा छापखाना सुरळीत सुरू होता. जिल्हा परिषदेच्या वर्षाच्या स्टेशनरीच्या मोठ्या खर्चाची यातून बचत होत होती. मात्र, तीन वर्षांनंतर हा छापखाना बंद झाला. २००१ मध्ये तो पुन्हा सुरू करण्यात आला; मात्र २००३ मध्ये पुन्हा बंद झाला आणि तेव्हापासून ते कुलूप उघडण्याइतकी ठोस पावले गेल्या १७ वर्षांत उचलण्यात आलेली नाहीत. दोन वर्षांपूर्वी समितीने दौरा केला. मात्र, बैठकाच होत नाहीत आणि अहवालावर निर्णयही नाही.

३ छापखाना समितीच्या अध्यक्षस्थानी समाज कल्याण सभापती जयपाल बोदडे आहेत. त्यांनी सुरुवातीला आवाज उठवल्याने वेगाने हालचाली झाल्या. मात्र, त्यात सातत्य राहिले नाही व छापखाना सुरू होण्यावर प्रश्नचिन्ह कायम राहिले आहे.

- वर्षाचा स्टेशनरीचा खर्च ४० लाख

- छापखान्याला अपेक्षित खर्च १ कोटी

- ठेवलेली तरतूद ६० लाख

- कक्ष नूतनीकरणावर - १ ते ३ लाखांपर्यंत खर्च

‘लोकमत’ची भूमिका

छापखान्यासाठी समिती स्थापन झाली होती, समितीचा सातारा येथे दौराही पार पडला. मात्र, त्यानंतर पाहिजे त्या गतीने छापखान्याचा विषय झालेला नाही. छापखान्यातून उत्पन्न मिळत असेल तर प्रशासकीय आणि राजकीय हेवेदावे दूर ठेवून याकडे बघणे गरजेचे आहे. कक्षाचे सुशोभीकरण करून त्या ठिकाणी कोणी बसायलाच नाही? तर अशा बाबी टाळून मूळ छापखाना सुरू करण्यासंदर्भात हालचाली होणे गरजेचे आहे. सातारा करू शकते मग जळगाव का नाही? याचा विचार अधिकारी व सदस्यांनी करावा.