शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-दिल्ली विमानाचे तिकीट झाले ५०-६० हजारांना; इंडिगोची विमाने रद्द, दुसऱ्या कंपन्यांनी लुटायला सुरुवात केली...
2
इंडिगोला मोठा दिलासा! डीजीसीएने क्रू विश्रांतीचा नियम मागे घेतला, तरीही उड्डाणे सुरळीत होण्यासाठी काही दिवस लागणार
3
नगरपालिकांची मतमोजणी २१ डिसेंबरलाच; सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला, पण...
4
लहान मुले-वृद्धांनी बेंचवर झोपून रात्र काढली; इंडिगो संकटामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल;..!
5
जो रुट सुसाट! सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड धोक्यात! पण इंग्लंड बॅटरला खरंच ते शक्य होईल का?
6
१ लाखापर्यंतच्या रकमेसाठी समान व्याजदर, RBIकडून सर्व बँकांसाठी नवे नियम; होणार फायदा
7
एअरटेलने स्वस्तातले ३० दिवसांचे दोन प्लॅन बंद केले; आता जास्त पैसे मोजल्याशिवाय पर्याय नाही
8
ना गोवा ना काश्मीर, २०२५ मध्ये लोकांनी 'गुगल'वर 'या' छोट्या शहराला सर्वाधिक केले सर्च
9
प्रवाशांचे हाल! मुंबई-पुण्यासह देशभरातील ६००हून अधिक इंडिगो विमानांचे उड्डाण रद्द!
10
Gold Silver Price Today: सोन्याच्या दरात जोरदार तेजी, चांदीचा दर २ लाखांच्या जवळ; एकाच झटक्यात २४०० रुपयांची तेजी
11
जिद्दीला सलाम ! डोळ्याला इन्फेक्शन... तरीही गॉगल लावून मैदानात उतरला अन् पठ्ठाने शतकच ठोकलं
12
सनी देओल रुपेरी पडद्यावर धमाका करण्यासाठी सज्ज, या दिवशी रिलीज होणार 'बॉर्डर २'चा टीझर
13
आसिम मुनीर यांची ताकद वाढली; पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे 'हे' ५ मोठे अधिकार संपुष्टात!
14
पुतिन-मोदींची 'सरप्राइज राइड', सफेद रंगाच्या Fortuner ची सगळीकडे चर्चा, महाराष्ट्राशी कनेक्शन
15
Matthew Hayden: 'कपडे काढून धावेन' म्हणणारा मॅथ्यू हेडन जो रूटच्या शतकानंतर काय म्हणाला?
16
"आईशप्पथ हे पुन्हा करणार नाही"; तरुणाचा मास्टर प्लॅन बघून स्कॅमरने टेकले हात, लोकेशन कळताच आरोपी घाबरला
17
एआय: महासत्ता की महासंकट?, गरीब-श्रीमंतांमधील...; 'संयुक्त राष्ट्र संघा'ने या तंत्रज्ञानाबद्दल दिला गंभीर इशारा
18
टाटा समूहावर शोककळा! 'लॅक्मे' आणि 'वेस्टसाइड'च्या संस्थापिका सिमोन टाटा यांचे ९५व्या वर्षी निधन
19
इन्स्टावरच्या गर्लफ्रेंडशी लग्न करायला पोहोचला तरुण; वरातही वाजत निघाली अन् अचानक मुलगी फोनच उचलेना..
20
BB 19: "असं संपायला नको होतं...", मालती चहर घराबाहेर गेल्यानंतर प्रणित मोरेची अशी अवस्था
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.ला महसूल मिळवून देणाऱ्या छापखान्याचे दार उघडणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:15 IST

जळगाव : गेल्या १७ वर्षांपासून बंद असलेल्या जिल्हा परिषद छापखान्याचा विषय प्रत्येक सभेमध्ये गाजतो. मात्र, चर्चेपलीकडे या छापखान्याची चाके ...

जळगाव : गेल्या १७ वर्षांपासून बंद असलेल्या जिल्हा परिषद छापखान्याचा विषय प्रत्येक सभेमध्ये गाजतो. मात्र, चर्चेपलीकडे या छापखान्याची चाके सुरू होण्यासाठी ठोस प्रयत्न होत नाहीत. त्यामुळे जि.प.चा स्टेशनरीचा खर्च सुरूच आहे; शिवाय यातून मिळणारा महसूल व उत्पन्न याकडेही गांभीर्याने बघितले जात नाही. गेल्या दोन वर्षांपूर्वी हालचाली गतिमान झाल्याचे चित्र असतानाच अचानक पुन्हा हा विषय थंड बस्त्यात गेला आहे. या छापखान्याच्या ठिकाणी आता फक्त भंगार पडले असून उत्पन्नाचे हे स्रोत प्रशासकीय अनास्थेमुळे रखडले आहे.

१ जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीत छापखाना आहे. या ठिकाणी दिशादर्शक फलकही लावण्यात आला आहे. मात्र, छापखान्यासमोर आता वाहने उभी केली जातात आणि वर्षानुवर्षे याचे दार बंदच ठेवले आहे. अगदी कधीतरी अचानक ते उघडले जाते.

इतिहास असा

२ १९९१ मध्ये छापखान्याला सुरुवात झाली. १९९४ पर्यंत हा छापखाना सुरळीत सुरू होता. जिल्हा परिषदेच्या वर्षाच्या स्टेशनरीच्या मोठ्या खर्चाची यातून बचत होत होती. मात्र, तीन वर्षांनंतर हा छापखाना बंद झाला. २००१ मध्ये तो पुन्हा सुरू करण्यात आला; मात्र २००३ मध्ये पुन्हा बंद झाला आणि तेव्हापासून ते कुलूप उघडण्याइतकी ठोस पावले गेल्या १७ वर्षांत उचलण्यात आलेली नाहीत. दोन वर्षांपूर्वी समितीने दौरा केला. मात्र, बैठकाच होत नाहीत आणि अहवालावर निर्णयही नाही.

३ छापखाना समितीच्या अध्यक्षस्थानी समाज कल्याण सभापती जयपाल बोदडे आहेत. त्यांनी सुरुवातीला आवाज उठवल्याने वेगाने हालचाली झाल्या. मात्र, त्यात सातत्य राहिले नाही व छापखाना सुरू होण्यावर प्रश्नचिन्ह कायम राहिले आहे.

- वर्षाचा स्टेशनरीचा खर्च ४० लाख

- छापखान्याला अपेक्षित खर्च १ कोटी

- ठेवलेली तरतूद ६० लाख

- कक्ष नूतनीकरणावर - १ ते ३ लाखांपर्यंत खर्च

‘लोकमत’ची भूमिका

छापखान्यासाठी समिती स्थापन झाली होती, समितीचा सातारा येथे दौराही पार पडला. मात्र, त्यानंतर पाहिजे त्या गतीने छापखान्याचा विषय झालेला नाही. छापखान्यातून उत्पन्न मिळत असेल तर प्रशासकीय आणि राजकीय हेवेदावे दूर ठेवून याकडे बघणे गरजेचे आहे. कक्षाचे सुशोभीकरण करून त्या ठिकाणी कोणी बसायलाच नाही? तर अशा बाबी टाळून मूळ छापखाना सुरू करण्यासंदर्भात हालचाली होणे गरजेचे आहे. सातारा करू शकते मग जळगाव का नाही? याचा विचार अधिकारी व सदस्यांनी करावा.