शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

नशिराबाद येथील शेतकºयाची विहीर ७ वर्षांपासून गेली चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 12:31 IST

८० वर्षीय वृद्धाची जिल्हाधिकाºयांकडे तक्रार

ठळक मुद्दे‘जाऊ तिथं खाऊ’चा प्रत्यय विहीर व साहित्य चोरल्याची तक्रार अन् २०११ मध्ये विहीर झाली गायब

जळगाव : मकरंद अनासपुरे अभिनित ‘जाऊ तिथं खाऊं’ हा विहीर चोरीस गेल्याच्या तक्रारीचे कथानक असलेला २००७ साली आलेला चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटाची आठवण करून देणारी किंबहुना त्याचा प्रत्यय आणून देणारीच घटना जिल्ह्यात घडली आहे. नशिराबाद येथील ८० वर्षीय वृद्ध शेतकºयाची ४० वर्षीय विहीर २०११ पासून चोरीस गेली आहे. त्यामुळे या शेतकºयाला पाण्याअभावी पिक घेणेही अशक्य बनले असून न्याय मिळवून देण्याची मागणी या शेतकºयाने जिल्हाधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.दयाराम सोना रोटे (८०)असे या शेतकºयाचे नाव असून ते नशिराबाद येथे खालची अळी, होळी मैदान येथे राहतात. त्यांनी नशिराबाद येथे गट नं.१२३५ मध्ये त्यांच्या शेतात सन १९७१ मध्ये विहीर खोदली होती. तसेच विहिरीवर विद्युत पंप व पाईपलाईन बसवून त्या पाण्यावर केळी, ऊस आदी बागायती पिके घेत होते.रोटे यांच्या शेतालगतच शेत असलेल्या दोघा शेतकरी भावंडांना अचानक ही विहीर त्यांच्या शेताच्या हद्दीत असल्याचा साक्षात्कार झाला. दोन वेळा मोजणीत विहीर रोटे यांच्या शेतातच असल्याचे स्पष्ट होऊनही २०११ मध्ये मात्र तलाठी व अधिकाºयांशी संगनमत केल्याने ही विहीर तक्रारदार शेतकºयांच्या हद्दीत असल्याचा चमत्कार घडला. इतकेच नव्हे तर या तक्रार शेतकरी भावंडांनी विद्युत मोटार व पाईपलाईनवर देखील हक्क सांगत ती काढून घेण्यास मज्जाव केला. मात्र तरीही रोटे यांनी २०१६ पर्यंत विहिरीच्या पाण्याचा वापर केला. मात्र या शेतकरी भावंडांनी त्यांना धमकावत पाण्याचा वापर रोखला. त्यामुळे त्यांना शेती करणे अशक्य बनले आहे.विहीर व साहित्य चोरल्याची तक्राररोटे यांनी याबाबत सोमवारी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांची भेट घेतली. दोघा शेतकरी भावंडांनी तलाठी व संबंधीतांना हाताशी धरून संगनमताने विहीर त्यांच्या हद्दीत करून घेतली असून त्यावरील विद्युत पंप व पाईपलाईन आदी साहित्यही चोरले आहे. तसेच शेतात जाण्यासाठीचा वहिवाट रस्ता वापरास मनाई करीत असल्याची असल्याची तक्रार केली आहे.दरम्यान, तलाठी व महसूल  अधिकाºयांशी संगनमतामुळे विहीर चोरीस गेल्याची तक्रार आल्याने आता जिल्हाधिकारी या वृद्ध शेतकºयाच्या तक्रारीची किती गांभीर्याने दखल घेतात? याबाबत उत्सुकता आहे.अन् २०११ मध्ये विहीर झाली गायबदोघा भावंडांच्या तक्रारीवरून २००७ मध्ये तलाठी तसेच महसूल विभागाच्या अधिकाºयांनी पहिल्यांदा शेताची मोजणी केली. मात्र विहीर दयाराम रोटे यांच्याच शेतात असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतरही २००८ साली पुन्हा तक्रार केल्याने तत्पर महसूल विभागाच्या तलाठी व संबंधीत अधिकाºयांनी पुन्हा मोजणी केली. मात्र त्यावेळी देखील विहीर रोटे यांच्या शेतातच असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मात्र तक्रारकर्त्या दोघा भावंडांनी तलाठ्याशी व संबंधीत अधिकाºयांशी हातमिळवणी करीत २०११ मध्ये पुन्हा या शेतजमिनीची मोजणी केली. आणि आश्चर्य घडले. ४० वर्षांपासून रोटे यांच्या शेतातील विहीर तक्रारकर्त्यांच्या शेतात असल्याचे स्पष्ट झाले.