शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

नशिराबाद येथील शेतकºयाची विहीर ७ वर्षांपासून गेली चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 12:31 IST

८० वर्षीय वृद्धाची जिल्हाधिकाºयांकडे तक्रार

ठळक मुद्दे‘जाऊ तिथं खाऊ’चा प्रत्यय विहीर व साहित्य चोरल्याची तक्रार अन् २०११ मध्ये विहीर झाली गायब

जळगाव : मकरंद अनासपुरे अभिनित ‘जाऊ तिथं खाऊं’ हा विहीर चोरीस गेल्याच्या तक्रारीचे कथानक असलेला २००७ साली आलेला चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटाची आठवण करून देणारी किंबहुना त्याचा प्रत्यय आणून देणारीच घटना जिल्ह्यात घडली आहे. नशिराबाद येथील ८० वर्षीय वृद्ध शेतकºयाची ४० वर्षीय विहीर २०११ पासून चोरीस गेली आहे. त्यामुळे या शेतकºयाला पाण्याअभावी पिक घेणेही अशक्य बनले असून न्याय मिळवून देण्याची मागणी या शेतकºयाने जिल्हाधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.दयाराम सोना रोटे (८०)असे या शेतकºयाचे नाव असून ते नशिराबाद येथे खालची अळी, होळी मैदान येथे राहतात. त्यांनी नशिराबाद येथे गट नं.१२३५ मध्ये त्यांच्या शेतात सन १९७१ मध्ये विहीर खोदली होती. तसेच विहिरीवर विद्युत पंप व पाईपलाईन बसवून त्या पाण्यावर केळी, ऊस आदी बागायती पिके घेत होते.रोटे यांच्या शेतालगतच शेत असलेल्या दोघा शेतकरी भावंडांना अचानक ही विहीर त्यांच्या शेताच्या हद्दीत असल्याचा साक्षात्कार झाला. दोन वेळा मोजणीत विहीर रोटे यांच्या शेतातच असल्याचे स्पष्ट होऊनही २०११ मध्ये मात्र तलाठी व अधिकाºयांशी संगनमत केल्याने ही विहीर तक्रारदार शेतकºयांच्या हद्दीत असल्याचा चमत्कार घडला. इतकेच नव्हे तर या तक्रार शेतकरी भावंडांनी विद्युत मोटार व पाईपलाईनवर देखील हक्क सांगत ती काढून घेण्यास मज्जाव केला. मात्र तरीही रोटे यांनी २०१६ पर्यंत विहिरीच्या पाण्याचा वापर केला. मात्र या शेतकरी भावंडांनी त्यांना धमकावत पाण्याचा वापर रोखला. त्यामुळे त्यांना शेती करणे अशक्य बनले आहे.विहीर व साहित्य चोरल्याची तक्राररोटे यांनी याबाबत सोमवारी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांची भेट घेतली. दोघा शेतकरी भावंडांनी तलाठी व संबंधीतांना हाताशी धरून संगनमताने विहीर त्यांच्या हद्दीत करून घेतली असून त्यावरील विद्युत पंप व पाईपलाईन आदी साहित्यही चोरले आहे. तसेच शेतात जाण्यासाठीचा वहिवाट रस्ता वापरास मनाई करीत असल्याची असल्याची तक्रार केली आहे.दरम्यान, तलाठी व महसूल  अधिकाºयांशी संगनमतामुळे विहीर चोरीस गेल्याची तक्रार आल्याने आता जिल्हाधिकारी या वृद्ध शेतकºयाच्या तक्रारीची किती गांभीर्याने दखल घेतात? याबाबत उत्सुकता आहे.अन् २०११ मध्ये विहीर झाली गायबदोघा भावंडांच्या तक्रारीवरून २००७ मध्ये तलाठी तसेच महसूल विभागाच्या अधिकाºयांनी पहिल्यांदा शेताची मोजणी केली. मात्र विहीर दयाराम रोटे यांच्याच शेतात असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतरही २००८ साली पुन्हा तक्रार केल्याने तत्पर महसूल विभागाच्या तलाठी व संबंधीत अधिकाºयांनी पुन्हा मोजणी केली. मात्र त्यावेळी देखील विहीर रोटे यांच्या शेतातच असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मात्र तक्रारकर्त्या दोघा भावंडांनी तलाठ्याशी व संबंधीत अधिकाºयांशी हातमिळवणी करीत २०११ मध्ये पुन्हा या शेतजमिनीची मोजणी केली. आणि आश्चर्य घडले. ४० वर्षांपासून रोटे यांच्या शेतातील विहीर तक्रारकर्त्यांच्या शेतात असल्याचे स्पष्ट झाले.