शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

नशिराबाद येथील शेतकºयाची विहीर ७ वर्षांपासून गेली चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 12:31 IST

८० वर्षीय वृद्धाची जिल्हाधिकाºयांकडे तक्रार

ठळक मुद्दे‘जाऊ तिथं खाऊ’चा प्रत्यय विहीर व साहित्य चोरल्याची तक्रार अन् २०११ मध्ये विहीर झाली गायब

जळगाव : मकरंद अनासपुरे अभिनित ‘जाऊ तिथं खाऊं’ हा विहीर चोरीस गेल्याच्या तक्रारीचे कथानक असलेला २००७ साली आलेला चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटाची आठवण करून देणारी किंबहुना त्याचा प्रत्यय आणून देणारीच घटना जिल्ह्यात घडली आहे. नशिराबाद येथील ८० वर्षीय वृद्ध शेतकºयाची ४० वर्षीय विहीर २०११ पासून चोरीस गेली आहे. त्यामुळे या शेतकºयाला पाण्याअभावी पिक घेणेही अशक्य बनले असून न्याय मिळवून देण्याची मागणी या शेतकºयाने जिल्हाधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.दयाराम सोना रोटे (८०)असे या शेतकºयाचे नाव असून ते नशिराबाद येथे खालची अळी, होळी मैदान येथे राहतात. त्यांनी नशिराबाद येथे गट नं.१२३५ मध्ये त्यांच्या शेतात सन १९७१ मध्ये विहीर खोदली होती. तसेच विहिरीवर विद्युत पंप व पाईपलाईन बसवून त्या पाण्यावर केळी, ऊस आदी बागायती पिके घेत होते.रोटे यांच्या शेतालगतच शेत असलेल्या दोघा शेतकरी भावंडांना अचानक ही विहीर त्यांच्या शेताच्या हद्दीत असल्याचा साक्षात्कार झाला. दोन वेळा मोजणीत विहीर रोटे यांच्या शेतातच असल्याचे स्पष्ट होऊनही २०११ मध्ये मात्र तलाठी व अधिकाºयांशी संगनमत केल्याने ही विहीर तक्रारदार शेतकºयांच्या हद्दीत असल्याचा चमत्कार घडला. इतकेच नव्हे तर या तक्रार शेतकरी भावंडांनी विद्युत मोटार व पाईपलाईनवर देखील हक्क सांगत ती काढून घेण्यास मज्जाव केला. मात्र तरीही रोटे यांनी २०१६ पर्यंत विहिरीच्या पाण्याचा वापर केला. मात्र या शेतकरी भावंडांनी त्यांना धमकावत पाण्याचा वापर रोखला. त्यामुळे त्यांना शेती करणे अशक्य बनले आहे.विहीर व साहित्य चोरल्याची तक्राररोटे यांनी याबाबत सोमवारी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांची भेट घेतली. दोघा शेतकरी भावंडांनी तलाठी व संबंधीतांना हाताशी धरून संगनमताने विहीर त्यांच्या हद्दीत करून घेतली असून त्यावरील विद्युत पंप व पाईपलाईन आदी साहित्यही चोरले आहे. तसेच शेतात जाण्यासाठीचा वहिवाट रस्ता वापरास मनाई करीत असल्याची असल्याची तक्रार केली आहे.दरम्यान, तलाठी व महसूल  अधिकाºयांशी संगनमतामुळे विहीर चोरीस गेल्याची तक्रार आल्याने आता जिल्हाधिकारी या वृद्ध शेतकºयाच्या तक्रारीची किती गांभीर्याने दखल घेतात? याबाबत उत्सुकता आहे.अन् २०११ मध्ये विहीर झाली गायबदोघा भावंडांच्या तक्रारीवरून २००७ मध्ये तलाठी तसेच महसूल विभागाच्या अधिकाºयांनी पहिल्यांदा शेताची मोजणी केली. मात्र विहीर दयाराम रोटे यांच्याच शेतात असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतरही २००८ साली पुन्हा तक्रार केल्याने तत्पर महसूल विभागाच्या तलाठी व संबंधीत अधिकाºयांनी पुन्हा मोजणी केली. मात्र त्यावेळी देखील विहीर रोटे यांच्या शेतातच असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मात्र तक्रारकर्त्या दोघा भावंडांनी तलाठ्याशी व संबंधीत अधिकाºयांशी हातमिळवणी करीत २०११ मध्ये पुन्हा या शेतजमिनीची मोजणी केली. आणि आश्चर्य घडले. ४० वर्षांपासून रोटे यांच्या शेतातील विहीर तक्रारकर्त्यांच्या शेतात असल्याचे स्पष्ट झाले.