शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

छत्तीसगडमधील मोहंम्मद फैजखान यांच्या गोसेवा सद्भावना पदयात्रेचे रावेरात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:25 IST

राष्ट्रीय गोसेवा प्रकोष्ठ मुस्लिम मंचचे राष्ट्रीय संयोजक मोहंम्मद फैजखान (रायपूर, छत्तीसगड) यांनी गोमाता हीच साऱ्या विश्वाची जननी असून, गोसेवेची असलेली द्वेषभावना प्रेमात परावर्तित करण्याची जनजागृती करताना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचण्यासाठी १४ हजार किलोमीटरची गोसेवा सद्भावना पदयात्रा गत दोन वर्षांपासून आरंभली आहे.

ठळक मुद्देदोन वर्षात लद्दाख ते अमृतसर पदयात्रेतील ११ हजार ५०० कि. मी. गोसंवर्धनासाठी पायी प्रवासगोसेवा सद्भावना पदयात्रा गत दोन वर्षांपासून

रावेर, जि.जळगाव : राष्ट्रीय गोसेवा प्रकोष्ठ मुस्लिम मंचचे राष्ट्रीय संयोजक मोहंम्मद फैजखान (रायपूर, छत्तीसगड) यांनी गोमाता हीच साऱ्या विश्वाची जननी असून, गोसेवेची असलेली द्वेषभावना प्रेमात परावर्तित करण्याची जनजागृती करताना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचण्यासाठी १४ हजार किलोमीटरची गोसेवा सद्भावना पदयात्रा गत दोन वर्षांपासून आरंभली आहे. लद्दाखपासून कन्याकुमारी ते आता अमृतसरकडे आगेकूच करताना दोन वर्षात ११ हजार किलोमीटर अंतर पार करत त्यांचे आज रावेर शहरात आगमन झाले आहे.रावेर शहरात माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अ‍ॅड.सूरज चौधरी, सुशील पाटील, रौनक पाटील यांनी रावेर विकास युवा मंचतर्फे प्रा.मोहंम्मद फैजखान तसेच त्यांचे सहकारी पीयूष राय (उत्तर प्रदेश), बाबा परदेशी रामसाहू (छत्तीसगड ) व कैलास वैष्णव (राजस्थान) यांचे स्वागत केले.तब्बल दोन वर्षांपासून सुमारे साडेअकरा हजार किलोमीटर अंतर गोसेवा सद्भावनेसाठी पायी भ्रमंती करताना समाजातील अंतिम टोकावरील घटकांशी हितगुज साधताना ध्यानात आले की, देवनार, गोवा, मुंबई, केरळ या भागात गोहत्या सर्रासपणे मोठ्या प्रमाणात होत असल्याने सदरील भागात दुष्काळाच्या झळा कमालीच्या गंभीर व तीव्र आहेत. या भागातून पायी चालत येताना चार दिवस अंघोळीला पाणी मिळू न शकल्याने हवाई पाहणीतून दुष्काळाची पाहणी करणाºया सरकारला दुष्काळाची ही गंभीर दाहकता तरी कशी कळणार, असा सवाल राष्ट्रीय गोसेवा मुस्लिम प्रकोष्ठ मंचचे राष्ट्रीय संयोजक प्रा.मोहंमद फैजखान यांनी यावेळी व्यक्त केला.हिंदू धर्मातील गायीच्या धार्मिक महतीपलीकडे जावून पाहता गाय ही सबंध मानव कल्याणासाठी पंचमहाभूतांनी बनलेली अमृतसंजीवनी असून, ती कोणत्या एका जातीधर्मापुुरता मर्यादित नाही. शेती उत्पादनात वापरल्या जाणाºया नत्रयुक्त रासायनिक खतांमुळे कॅन्सरचा भस्मासुर फोफावला आहे. गायीचे शेण व मूत्र कॅन्सरवर रामबाण उपाय असून ब्रेनट्युमरच्या कॅन्सरवर गोमुत्राची मात्रा रामबाण ठरली आहे. म्हणून शेतीशिवारात नत्रयुक्त खतांऐवजी गायीचे शेणखत व गोमुत्राचा वापर करण्याची गरज आहे. गायीचे दूध, दही, तुप, गोमुत्र व शेण ही पंचगव्य पृथ्वी, जल, अग्नी, वायू व आकाश या पंचमहाभूतांसमान असल्याने वेदशास्त्रांनी गाय ही साºया विश्वाची जननी असल्याची दिलेली शिकवण मानवजातीला अमृत संजीवनी ठरली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.गोमातेचे मानवी जीवनाच्या कल्याणासाठी पर्यावरण व समाजस्वास्थ्यासाठी अनन्यसाधारण महत्त्व असल्याने व वेदशास्त्र, संत- मंहतांनी गोमाता ही साºया विश्वाची जननी असल्याची शिकवण दिली आहे. मोहंम्मद पैगंबरांनी गायीचे दुध व तुप हे मानवी जीवनासाठी नवसंजीवनी असल्याचे तर गोमांस हे रोगाचे माहेर असल्याची शिकवण दिली असल्याचे व ख्रिश्चन धर्मगुरू इसाहीमोही यांचा जन्मच गायीच्या गोठ्यात झाल्याचा संदेश देत गोमातेविषयी असलेला विद्वेष नाहीसा करून प्रेमाचे बीजारोपण या पदयात्रेतून करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :SocialसामाजिकRaverरावेर