शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

छत्तीसगडमधील मोहंम्मद फैजखान यांच्या गोसेवा सद्भावना पदयात्रेचे रावेरात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:25 IST

राष्ट्रीय गोसेवा प्रकोष्ठ मुस्लिम मंचचे राष्ट्रीय संयोजक मोहंम्मद फैजखान (रायपूर, छत्तीसगड) यांनी गोमाता हीच साऱ्या विश्वाची जननी असून, गोसेवेची असलेली द्वेषभावना प्रेमात परावर्तित करण्याची जनजागृती करताना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचण्यासाठी १४ हजार किलोमीटरची गोसेवा सद्भावना पदयात्रा गत दोन वर्षांपासून आरंभली आहे.

ठळक मुद्देदोन वर्षात लद्दाख ते अमृतसर पदयात्रेतील ११ हजार ५०० कि. मी. गोसंवर्धनासाठी पायी प्रवासगोसेवा सद्भावना पदयात्रा गत दोन वर्षांपासून

रावेर, जि.जळगाव : राष्ट्रीय गोसेवा प्रकोष्ठ मुस्लिम मंचचे राष्ट्रीय संयोजक मोहंम्मद फैजखान (रायपूर, छत्तीसगड) यांनी गोमाता हीच साऱ्या विश्वाची जननी असून, गोसेवेची असलेली द्वेषभावना प्रेमात परावर्तित करण्याची जनजागृती करताना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचण्यासाठी १४ हजार किलोमीटरची गोसेवा सद्भावना पदयात्रा गत दोन वर्षांपासून आरंभली आहे. लद्दाखपासून कन्याकुमारी ते आता अमृतसरकडे आगेकूच करताना दोन वर्षात ११ हजार किलोमीटर अंतर पार करत त्यांचे आज रावेर शहरात आगमन झाले आहे.रावेर शहरात माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अ‍ॅड.सूरज चौधरी, सुशील पाटील, रौनक पाटील यांनी रावेर विकास युवा मंचतर्फे प्रा.मोहंम्मद फैजखान तसेच त्यांचे सहकारी पीयूष राय (उत्तर प्रदेश), बाबा परदेशी रामसाहू (छत्तीसगड ) व कैलास वैष्णव (राजस्थान) यांचे स्वागत केले.तब्बल दोन वर्षांपासून सुमारे साडेअकरा हजार किलोमीटर अंतर गोसेवा सद्भावनेसाठी पायी भ्रमंती करताना समाजातील अंतिम टोकावरील घटकांशी हितगुज साधताना ध्यानात आले की, देवनार, गोवा, मुंबई, केरळ या भागात गोहत्या सर्रासपणे मोठ्या प्रमाणात होत असल्याने सदरील भागात दुष्काळाच्या झळा कमालीच्या गंभीर व तीव्र आहेत. या भागातून पायी चालत येताना चार दिवस अंघोळीला पाणी मिळू न शकल्याने हवाई पाहणीतून दुष्काळाची पाहणी करणाºया सरकारला दुष्काळाची ही गंभीर दाहकता तरी कशी कळणार, असा सवाल राष्ट्रीय गोसेवा मुस्लिम प्रकोष्ठ मंचचे राष्ट्रीय संयोजक प्रा.मोहंमद फैजखान यांनी यावेळी व्यक्त केला.हिंदू धर्मातील गायीच्या धार्मिक महतीपलीकडे जावून पाहता गाय ही सबंध मानव कल्याणासाठी पंचमहाभूतांनी बनलेली अमृतसंजीवनी असून, ती कोणत्या एका जातीधर्मापुुरता मर्यादित नाही. शेती उत्पादनात वापरल्या जाणाºया नत्रयुक्त रासायनिक खतांमुळे कॅन्सरचा भस्मासुर फोफावला आहे. गायीचे शेण व मूत्र कॅन्सरवर रामबाण उपाय असून ब्रेनट्युमरच्या कॅन्सरवर गोमुत्राची मात्रा रामबाण ठरली आहे. म्हणून शेतीशिवारात नत्रयुक्त खतांऐवजी गायीचे शेणखत व गोमुत्राचा वापर करण्याची गरज आहे. गायीचे दूध, दही, तुप, गोमुत्र व शेण ही पंचगव्य पृथ्वी, जल, अग्नी, वायू व आकाश या पंचमहाभूतांसमान असल्याने वेदशास्त्रांनी गाय ही साºया विश्वाची जननी असल्याची दिलेली शिकवण मानवजातीला अमृत संजीवनी ठरली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.गोमातेचे मानवी जीवनाच्या कल्याणासाठी पर्यावरण व समाजस्वास्थ्यासाठी अनन्यसाधारण महत्त्व असल्याने व वेदशास्त्र, संत- मंहतांनी गोमाता ही साºया विश्वाची जननी असल्याची शिकवण दिली आहे. मोहंम्मद पैगंबरांनी गायीचे दुध व तुप हे मानवी जीवनासाठी नवसंजीवनी असल्याचे तर गोमांस हे रोगाचे माहेर असल्याची शिकवण दिली असल्याचे व ख्रिश्चन धर्मगुरू इसाहीमोही यांचा जन्मच गायीच्या गोठ्यात झाल्याचा संदेश देत गोमातेविषयी असलेला विद्वेष नाहीसा करून प्रेमाचे बीजारोपण या पदयात्रेतून करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :SocialसामाजिकRaverरावेर