शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

छत्तीसगडमधील मोहंम्मद फैजखान यांच्या गोसेवा सद्भावना पदयात्रेचे रावेरात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:25 IST

राष्ट्रीय गोसेवा प्रकोष्ठ मुस्लिम मंचचे राष्ट्रीय संयोजक मोहंम्मद फैजखान (रायपूर, छत्तीसगड) यांनी गोमाता हीच साऱ्या विश्वाची जननी असून, गोसेवेची असलेली द्वेषभावना प्रेमात परावर्तित करण्याची जनजागृती करताना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचण्यासाठी १४ हजार किलोमीटरची गोसेवा सद्भावना पदयात्रा गत दोन वर्षांपासून आरंभली आहे.

ठळक मुद्देदोन वर्षात लद्दाख ते अमृतसर पदयात्रेतील ११ हजार ५०० कि. मी. गोसंवर्धनासाठी पायी प्रवासगोसेवा सद्भावना पदयात्रा गत दोन वर्षांपासून

रावेर, जि.जळगाव : राष्ट्रीय गोसेवा प्रकोष्ठ मुस्लिम मंचचे राष्ट्रीय संयोजक मोहंम्मद फैजखान (रायपूर, छत्तीसगड) यांनी गोमाता हीच साऱ्या विश्वाची जननी असून, गोसेवेची असलेली द्वेषभावना प्रेमात परावर्तित करण्याची जनजागृती करताना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचण्यासाठी १४ हजार किलोमीटरची गोसेवा सद्भावना पदयात्रा गत दोन वर्षांपासून आरंभली आहे. लद्दाखपासून कन्याकुमारी ते आता अमृतसरकडे आगेकूच करताना दोन वर्षात ११ हजार किलोमीटर अंतर पार करत त्यांचे आज रावेर शहरात आगमन झाले आहे.रावेर शहरात माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अ‍ॅड.सूरज चौधरी, सुशील पाटील, रौनक पाटील यांनी रावेर विकास युवा मंचतर्फे प्रा.मोहंम्मद फैजखान तसेच त्यांचे सहकारी पीयूष राय (उत्तर प्रदेश), बाबा परदेशी रामसाहू (छत्तीसगड ) व कैलास वैष्णव (राजस्थान) यांचे स्वागत केले.तब्बल दोन वर्षांपासून सुमारे साडेअकरा हजार किलोमीटर अंतर गोसेवा सद्भावनेसाठी पायी भ्रमंती करताना समाजातील अंतिम टोकावरील घटकांशी हितगुज साधताना ध्यानात आले की, देवनार, गोवा, मुंबई, केरळ या भागात गोहत्या सर्रासपणे मोठ्या प्रमाणात होत असल्याने सदरील भागात दुष्काळाच्या झळा कमालीच्या गंभीर व तीव्र आहेत. या भागातून पायी चालत येताना चार दिवस अंघोळीला पाणी मिळू न शकल्याने हवाई पाहणीतून दुष्काळाची पाहणी करणाºया सरकारला दुष्काळाची ही गंभीर दाहकता तरी कशी कळणार, असा सवाल राष्ट्रीय गोसेवा मुस्लिम प्रकोष्ठ मंचचे राष्ट्रीय संयोजक प्रा.मोहंमद फैजखान यांनी यावेळी व्यक्त केला.हिंदू धर्मातील गायीच्या धार्मिक महतीपलीकडे जावून पाहता गाय ही सबंध मानव कल्याणासाठी पंचमहाभूतांनी बनलेली अमृतसंजीवनी असून, ती कोणत्या एका जातीधर्मापुुरता मर्यादित नाही. शेती उत्पादनात वापरल्या जाणाºया नत्रयुक्त रासायनिक खतांमुळे कॅन्सरचा भस्मासुर फोफावला आहे. गायीचे शेण व मूत्र कॅन्सरवर रामबाण उपाय असून ब्रेनट्युमरच्या कॅन्सरवर गोमुत्राची मात्रा रामबाण ठरली आहे. म्हणून शेतीशिवारात नत्रयुक्त खतांऐवजी गायीचे शेणखत व गोमुत्राचा वापर करण्याची गरज आहे. गायीचे दूध, दही, तुप, गोमुत्र व शेण ही पंचगव्य पृथ्वी, जल, अग्नी, वायू व आकाश या पंचमहाभूतांसमान असल्याने वेदशास्त्रांनी गाय ही साºया विश्वाची जननी असल्याची दिलेली शिकवण मानवजातीला अमृत संजीवनी ठरली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.गोमातेचे मानवी जीवनाच्या कल्याणासाठी पर्यावरण व समाजस्वास्थ्यासाठी अनन्यसाधारण महत्त्व असल्याने व वेदशास्त्र, संत- मंहतांनी गोमाता ही साºया विश्वाची जननी असल्याची शिकवण दिली आहे. मोहंम्मद पैगंबरांनी गायीचे दुध व तुप हे मानवी जीवनासाठी नवसंजीवनी असल्याचे तर गोमांस हे रोगाचे माहेर असल्याची शिकवण दिली असल्याचे व ख्रिश्चन धर्मगुरू इसाहीमोही यांचा जन्मच गायीच्या गोठ्यात झाल्याचा संदेश देत गोमातेविषयी असलेला विद्वेष नाहीसा करून प्रेमाचे बीजारोपण या पदयात्रेतून करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :SocialसामाजिकRaverरावेर