शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

महाराष्ट्राच्या विकासासाठी जी लढाई आम्ही लढलो, ती आम्ही जिंकलो : नवनीत राणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 21:18 IST

मुंबई महापालिकेत गेल्या दोन पिढ्यांपासून जे राजकारण सुरू होतं त्याला आता फुल स्टॉप लागणार, राणा यांनी व्यक्त केला विश्वास.

प्रशांत भदाणेमहाराष्ट्राच्या विकासासाठी जी लढाई आम्ही लढलो ती आम्ही जिंकलो आहोत. येणाऱ्या काळात लव जिहादच्या विरोधात आम्ही मोठी मोहीम उभारू. लव्ह जिहादचा खात्मा करण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे, अमरावती जिल्ह्यापासून आम्ही त्याची सुरुवात केली आहे आणि जळगावत त्याचं जाहीर आव्हान करत असल्याचे वक्तव्य खासदार नवनीत राणा यांनी केले.

“हनुमान चालीसाचे पठण केलं त्यामुळे आम्हाला ठाकरे सरकारने तुरूंगात टाकलं होतं, आम्ही निर्दोष होतो तरी आम्हाला १४ दिवस तुरुंगामध्ये राहावं लागलं. ज्यांचा वध करायचा होता त्याचा वध आम्ही केला आणि त्यांना घरी बसवलं,” अशा शब्दात नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता टीका केली. अमरावती जिल्ह्यातील ज्या मुली लव्ह जिहादच्या कचाट्यात सापडल्या आहेत, त्यांच्याशी संपर्क करून त्यांना आणि कुटुंबीयांना मदत करण्याचं काम सुरू आहे. राज्यात ज्या ज्या ठिकाणी लव्ह जिहादच्या कचाट्यात कुणी सापडले असेल त्यांनी आमच्याशी संपर्क करावा त्यांना मदत करण्याचे काम करणार असल्याचंही त्या म्हणाल्या.

मुख्यमंत्री पदावर असताना उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले ते फक्त फेसबुकच्या माध्यमातून जनतेपर्यंत जात होते, ही महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवी बाब होती अशी टीकाही नवनीत राणा यांनी केली. 0आमच्या कणाकणात हनुमानजी आहेत, त्यामुळे हनुमान चालीसाचे पठण करून राज्यावरचं संकट दूर करणं हा आमचा हेतू होता. मी एक महिला आहे त्याशिवाय २५ लाख लोकांमधून निवडून गेलेली खासदार देखील आहे. त्यामुळे संसदेत बोलत असताना मी फक्त माझ्या मतदारसंघापुरतं नाहीतर देशातल्या महिलेचा आवाज म्हणून बोलत असते. उद्धव ठाकरे यांनी मला जेलमध्ये टाकण्याचं काम केलं, त्याची शिक्षा त्यांना भोगावे लागेल. अजूनही तर सुरुवात आहे, पिक्चर अजून बाकी आहे अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरेंना इशाराही दिला.

आता फुलस्टॉप लागणारआताचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे जीवाचे रान करून काम करत आहेत अशी स्तुती सुमनेही नवनीत राणा यांनी उधळली. गेल्या अडीच वर्षात जेवढे काम झालं नाही, दीड महिन्यातच या सरकारने जीआर काढले. सुरुवात चांगली झाली आहे असेही त्या म्हणाल्या. मुंबई महापालिकेत गेल्या दोन पिढ्यांपासून जे राजकारण सुरू होतं त्याला आता फुल स्टॉप लागणार आहे, रामभक्त आणि हनुमान भक्त हे करून दाखवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणाUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्र