शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही चार नाही तर आठ मुलं जन्माला घाला, आम्हाला..."; असदुद्दीन ओवेसींचे अमरावतीत नवनीत राणांना प्रत्यूत्तर
2
मनपा निवडणुकीनंतर प्रणिती शिंदेंचा भाजप प्रवेश, फडणवीस- शिंदेंमध्ये डील; सुजात आंबेडकरांचा खळबळजनक दावा
3
शरद पवार यावेळी खासदार बनू शकणार नाहीत? ओवेसी यांनी राज्यसभेचे गणित सांगितले; भविष्यातील राजकारणाचे दिले संकेत
4
नेहरुंनीही नेपाळच्या राजाला काठमांडूतून उचललेले?; व्हेनेझुएलाच्या निमित्ताने त्या ऐतिहासिक घटनेची चर्चा...
5
नवरा कामासाठी दुबईला, भाच्याच्या प्रेमात वेडी झाली बायको; १० लाखांचे दागिने घेऊन गेली पळून
6
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर स्वतंत्र प्रार्थना सभा का ठेवली? झाल्या चर्चा; अखेर हेमा मालिनींनी दिली प्रतिक्रिया
7
"अभिषेक असता तर भाजपची हिम्मत झाली नसती"; दहिसरमध्ये ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले, "तेजस्वीसोबत भांडण नाही"
8
भविष्यातील तंत्रज्ञान! झोमॅटोच्या मालकाच्या चेहऱ्यावर हे कोणते गॅजेट?  नेटकरी झालेत अवाक् 
9
तुमच्या राजकारणात आमचे प्रश्न गेले कुठे..? कळंबोली, तळोजातील मतदार उमेदवारांवर नाराज
10
पुणे: मढेघाटात ट्रेकिंगला गेलेल्या विद्यार्थ्यांवर मधमाशांचा तुफान हल्ला; ३५ हून अधिक जण जखमी, स्थानिकांच्या सतर्कतेने अनर्थ टळला!
11
इराणमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली, सर्वोच्च नेते खोमेनी रशियाला पळून जाण्याचा तयारीत
12
"जय दुधाणे आणि हेमलतासारखी अटक विजय मल्याला कधी होणार?", मराठी अभिनेत्रीचा संतप्त सवाल
13
अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: १२ राशींपैकी बाप्पाची कृपा कोणावर? कोणाला फायदा? कोणाला तोटा?
14
Narayan Rane : 'मी एका उपशाखा प्रमुखाला ठार मारणार होतो, बाळासाहेब ठाकरेंनी मला समजावलं म्हणून...'; नारायण राणेंनी सांगितला किस्सा
15
ट्रंप यांनी जाहीर केली सरकारी मदत घेणाऱ्या देशांची लिस्ट; त्यात भारताचे तीन शेजारी, भारताचे नाव आहे का?
16
परेश रावल यांचं मराठी रंगभूमीवरील प्रेम पुन्हा दिसलं, प्रेक्षकांमध्ये बसून पाहिलं 'हे' नाटक
17
सुरक्षित गुंतवणुकीचा 'सुपर' पर्याय! पोस्टाच्या NSC मध्ये २.५० लाखांवर मिळवा १.१६ लाखांचे फिक्स व्याज
18
खळबळजनक! नायजेरियात २२ भारतीय खलाशांना बेड्या; मालवाहू जहाजावर कोकेन सापडले...
19
धक्कादायक! अमेरिकेत भारतीय तरुणीचा खून करून प्रियकर भारतात पसार; पोलिसांना भेटून आला...
20
वंदे भारत एक्सप्रेस रुळावरून घसरण्याचा कट! रुळांवर लाकूड ठेवल्याचे आढळले; मोठा अपघात टळला
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राच्या विकासासाठी जी लढाई आम्ही लढलो, ती आम्ही जिंकलो : नवनीत राणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 21:18 IST

मुंबई महापालिकेत गेल्या दोन पिढ्यांपासून जे राजकारण सुरू होतं त्याला आता फुल स्टॉप लागणार, राणा यांनी व्यक्त केला विश्वास.

प्रशांत भदाणेमहाराष्ट्राच्या विकासासाठी जी लढाई आम्ही लढलो ती आम्ही जिंकलो आहोत. येणाऱ्या काळात लव जिहादच्या विरोधात आम्ही मोठी मोहीम उभारू. लव्ह जिहादचा खात्मा करण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे, अमरावती जिल्ह्यापासून आम्ही त्याची सुरुवात केली आहे आणि जळगावत त्याचं जाहीर आव्हान करत असल्याचे वक्तव्य खासदार नवनीत राणा यांनी केले.

“हनुमान चालीसाचे पठण केलं त्यामुळे आम्हाला ठाकरे सरकारने तुरूंगात टाकलं होतं, आम्ही निर्दोष होतो तरी आम्हाला १४ दिवस तुरुंगामध्ये राहावं लागलं. ज्यांचा वध करायचा होता त्याचा वध आम्ही केला आणि त्यांना घरी बसवलं,” अशा शब्दात नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता टीका केली. अमरावती जिल्ह्यातील ज्या मुली लव्ह जिहादच्या कचाट्यात सापडल्या आहेत, त्यांच्याशी संपर्क करून त्यांना आणि कुटुंबीयांना मदत करण्याचं काम सुरू आहे. राज्यात ज्या ज्या ठिकाणी लव्ह जिहादच्या कचाट्यात कुणी सापडले असेल त्यांनी आमच्याशी संपर्क करावा त्यांना मदत करण्याचे काम करणार असल्याचंही त्या म्हणाल्या.

मुख्यमंत्री पदावर असताना उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले ते फक्त फेसबुकच्या माध्यमातून जनतेपर्यंत जात होते, ही महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवी बाब होती अशी टीकाही नवनीत राणा यांनी केली. 0आमच्या कणाकणात हनुमानजी आहेत, त्यामुळे हनुमान चालीसाचे पठण करून राज्यावरचं संकट दूर करणं हा आमचा हेतू होता. मी एक महिला आहे त्याशिवाय २५ लाख लोकांमधून निवडून गेलेली खासदार देखील आहे. त्यामुळे संसदेत बोलत असताना मी फक्त माझ्या मतदारसंघापुरतं नाहीतर देशातल्या महिलेचा आवाज म्हणून बोलत असते. उद्धव ठाकरे यांनी मला जेलमध्ये टाकण्याचं काम केलं, त्याची शिक्षा त्यांना भोगावे लागेल. अजूनही तर सुरुवात आहे, पिक्चर अजून बाकी आहे अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरेंना इशाराही दिला.

आता फुलस्टॉप लागणारआताचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे जीवाचे रान करून काम करत आहेत अशी स्तुती सुमनेही नवनीत राणा यांनी उधळली. गेल्या अडीच वर्षात जेवढे काम झालं नाही, दीड महिन्यातच या सरकारने जीआर काढले. सुरुवात चांगली झाली आहे असेही त्या म्हणाल्या. मुंबई महापालिकेत गेल्या दोन पिढ्यांपासून जे राजकारण सुरू होतं त्याला आता फुल स्टॉप लागणार आहे, रामभक्त आणि हनुमान भक्त हे करून दाखवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणाUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्र