शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

पोलिसी दंडुक्याशिवाय आम्हाला जमतच नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : वाहतुकीचे नियम मोडण्यात जळगावकर आघाडीवर आहेत. वाहन चालविताना घाई इतकी झालेली असते की, सिग्नलवरही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : वाहतुकीचे नियम मोडण्यात जळगावकर आघाडीवर आहेत. वाहन चालविताना घाई इतकी झालेली असते की, सिग्नलवरही नियमांचे पालन करणे जमत नाही. वाहतूक पोलिसांनी कारवाई केली की, पुन्हा वाद घालायला पुढे अशी परिस्थिती आहे. वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या एकट्या शहरात शहर वाहतूक शाखेने ५० हजार ८५५ जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. जिल्ह्यात नियम मोडणाऱ्यांची संख्या ९४ हजार ९७५ इतकी आहे.

शहरातील महामार्गावरील आकाशवाणी, अजिंठा चौक, इच्छादेवी या प्रमुख चौकांत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आले. शहरातील कोर्ट चौकातदेखील याचे मोठे प्रमाण आहे. वाहतूक पोलीस नसला की, हे प्रमाण अधिक असते. आकाशवाणी चौकात दोन सिग्नल येतात. तेथे नेहमीच नियमांचे उल्लंघन केले जाते. या चौकात तर वाहतूक पोलीस असतानाही लाल सिग्नल असल्यावरदेखील वाहनधारक वाहने दामटताना दिसून आले. मुख्य चौकात पोलीस असतात, तर आकाशवाणीच्या भिंतीला लागून असलेल्या चौकात पोलीस नसल्याने त्याचा गैरफायदा वाहनधारकांकडून घेतला जात असल्याचे प्रकर्षाने जाणवले. काही वाहनधारक तर कारवाईचीही भीती बाळगत नाही. पोलिसांनी मागून आवाज दिला, तर त्याकडे दुर्लक्ष करून वाहनधारक पुढे पळतात. यात दुचाकीस्वारांची संख्या अधिक आहे. महिलाही नियम मोडण्यात कमी नसल्याचे दिसून आले.

रोज ३५ जणांना दंड

सिग्नल नियमांचे उल्लंघन करणाऱ्या किमान ३५ जणांवर रोज दंडात्मक कारवाई करण्यात येते. वर्षभरात २४३ जणांनी सिग्नल जम्पिंग केले असून त्यांच्याकडून ४८ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सर्वाधिक कारवाया आकाशवाणी व अजिंठा चौकात झालेल्या आहेत. शहरातील टॉवर व कोर्ट चौकातही मोठ्या प्रमाणात कारवाया झालेल्या आहेत.

कोट..

सध्या शहरात अमृत योजनेचे काम सुरू असल्याने त्यात सिग्नलच्या वायरिंग तुटल्या आहेत. त्यामुळे सिग्नल बऱ्याच वेळा बंद असतात. दिवसाला एका सिग्नलवर ५० च्यावर कारवाया होतात. लाल सिग्नल असतानाही वाहने दामटणाऱ्या किमान ३० ते ३५ जणांवर कारवाई केली जाते.

-देविदास कुनगर, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा

वाहनचालक काय म्हणतात...

नियमांचे पालन करणे म्हणजे स्वत:ला शिस्त लावणे, असे आहे. घाई करून पटकन इच्छितस्थळी जायचे असले, तरी त्यात फारसा फरक पडत नाही. १० ते १५ मिनिटे मागेपुढे होऊ शकतात. सिग्नल बंद असले तरीदेखील काळजी घेणे गरजेचे आहे.

-रमेश पाटील, वाहनधारक

सिग्नलवर घाई करून उपयोग नाही. दंडाची रक्कम भरून माणूस मोकळा होतो, परंतु अपघात झाला तर त्याची भरपाई करता येत नाही. त्यात शरीराचा अवयव निकामी होऊ शकतो, त्याशिवाय वाहनाचे नुकसानही होण्याची भीती असते. त्यामुळे स्वत:चा जीव महत्त्वाचा आहे. त्यासाठी प्रत्येकाने वाहतूक नियमांचे पालन करून शिस्त पाळावी.

-संतोष नेटके, वाहनधारक

शहरात वाहतूककोंडी मोठी असते. चारही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागतात. एकाने नियम मोडला की, त्यामागे चार जण नियम मोडतात. बऱ्याचवेळा गर्दीच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची संख्या कमी असते, ती वाढविणे गरजेचे आहे. वाहतूक नियमांचे पालन झालेच पाहिजे, त्याबद्दल दुमत नाही. आम्ही काळजी घेतो.

-रामचंद्र पाटील, वाहनधारक

--