शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

पोलिसी दंडुक्याशिवाय आम्हाला जमतच नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : वाहतुकीचे नियम मोडण्यात जळगावकर आघाडीवर आहेत. वाहन चालविताना घाई इतकी झालेली असते की, सिग्नलवरही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : वाहतुकीचे नियम मोडण्यात जळगावकर आघाडीवर आहेत. वाहन चालविताना घाई इतकी झालेली असते की, सिग्नलवरही नियमांचे पालन करणे जमत नाही. वाहतूक पोलिसांनी कारवाई केली की, पुन्हा वाद घालायला पुढे अशी परिस्थिती आहे. वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या एकट्या शहरात शहर वाहतूक शाखेने ५० हजार ८५५ जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. जिल्ह्यात नियम मोडणाऱ्यांची संख्या ९४ हजार ९७५ इतकी आहे.

शहरातील महामार्गावरील आकाशवाणी, अजिंठा चौक, इच्छादेवी या प्रमुख चौकांत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आले. शहरातील कोर्ट चौकातदेखील याचे मोठे प्रमाण आहे. वाहतूक पोलीस नसला की, हे प्रमाण अधिक असते. आकाशवाणी चौकात दोन सिग्नल येतात. तेथे नेहमीच नियमांचे उल्लंघन केले जाते. या चौकात तर वाहतूक पोलीस असतानाही लाल सिग्नल असल्यावरदेखील वाहनधारक वाहने दामटताना दिसून आले. मुख्य चौकात पोलीस असतात, तर आकाशवाणीच्या भिंतीला लागून असलेल्या चौकात पोलीस नसल्याने त्याचा गैरफायदा वाहनधारकांकडून घेतला जात असल्याचे प्रकर्षाने जाणवले. काही वाहनधारक तर कारवाईचीही भीती बाळगत नाही. पोलिसांनी मागून आवाज दिला, तर त्याकडे दुर्लक्ष करून वाहनधारक पुढे पळतात. यात दुचाकीस्वारांची संख्या अधिक आहे. महिलाही नियम मोडण्यात कमी नसल्याचे दिसून आले.

रोज ३५ जणांना दंड

सिग्नल नियमांचे उल्लंघन करणाऱ्या किमान ३५ जणांवर रोज दंडात्मक कारवाई करण्यात येते. वर्षभरात २४३ जणांनी सिग्नल जम्पिंग केले असून त्यांच्याकडून ४८ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सर्वाधिक कारवाया आकाशवाणी व अजिंठा चौकात झालेल्या आहेत. शहरातील टॉवर व कोर्ट चौकातही मोठ्या प्रमाणात कारवाया झालेल्या आहेत.

कोट..

सध्या शहरात अमृत योजनेचे काम सुरू असल्याने त्यात सिग्नलच्या वायरिंग तुटल्या आहेत. त्यामुळे सिग्नल बऱ्याच वेळा बंद असतात. दिवसाला एका सिग्नलवर ५० च्यावर कारवाया होतात. लाल सिग्नल असतानाही वाहने दामटणाऱ्या किमान ३० ते ३५ जणांवर कारवाई केली जाते.

-देविदास कुनगर, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा

वाहनचालक काय म्हणतात...

नियमांचे पालन करणे म्हणजे स्वत:ला शिस्त लावणे, असे आहे. घाई करून पटकन इच्छितस्थळी जायचे असले, तरी त्यात फारसा फरक पडत नाही. १० ते १५ मिनिटे मागेपुढे होऊ शकतात. सिग्नल बंद असले तरीदेखील काळजी घेणे गरजेचे आहे.

-रमेश पाटील, वाहनधारक

सिग्नलवर घाई करून उपयोग नाही. दंडाची रक्कम भरून माणूस मोकळा होतो, परंतु अपघात झाला तर त्याची भरपाई करता येत नाही. त्यात शरीराचा अवयव निकामी होऊ शकतो, त्याशिवाय वाहनाचे नुकसानही होण्याची भीती असते. त्यामुळे स्वत:चा जीव महत्त्वाचा आहे. त्यासाठी प्रत्येकाने वाहतूक नियमांचे पालन करून शिस्त पाळावी.

-संतोष नेटके, वाहनधारक

शहरात वाहतूककोंडी मोठी असते. चारही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागतात. एकाने नियम मोडला की, त्यामागे चार जण नियम मोडतात. बऱ्याचवेळा गर्दीच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची संख्या कमी असते, ती वाढविणे गरजेचे आहे. वाहतूक नियमांचे पालन झालेच पाहिजे, त्याबद्दल दुमत नाही. आम्ही काळजी घेतो.

-रामचंद्र पाटील, वाहनधारक

--