शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसी दंडुक्याशिवाय आम्हाला जमतच नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : वाहतुकीचे नियम मोडण्यात जळगावकर आघाडीवर आहेत. वाहन चालविताना घाई इतकी झालेली असते की, सिग्नलवरही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : वाहतुकीचे नियम मोडण्यात जळगावकर आघाडीवर आहेत. वाहन चालविताना घाई इतकी झालेली असते की, सिग्नलवरही नियमांचे पालन करणे जमत नाही. वाहतूक पोलिसांनी कारवाई केली की, पुन्हा वाद घालायला पुढे अशी परिस्थिती आहे. वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या एकट्या शहरात शहर वाहतूक शाखेने ५० हजार ८५५ जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. जिल्ह्यात नियम मोडणाऱ्यांची संख्या ९४ हजार ९७५ इतकी आहे.

शहरातील महामार्गावरील आकाशवाणी, अजिंठा चौक, इच्छादेवी या प्रमुख चौकांत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आले. शहरातील कोर्ट चौकातदेखील याचे मोठे प्रमाण आहे. वाहतूक पोलीस नसला की, हे प्रमाण अधिक असते. आकाशवाणी चौकात दोन सिग्नल येतात. तेथे नेहमीच नियमांचे उल्लंघन केले जाते. या चौकात तर वाहतूक पोलीस असतानाही लाल सिग्नल असल्यावरदेखील वाहनधारक वाहने दामटताना दिसून आले. मुख्य चौकात पोलीस असतात, तर आकाशवाणीच्या भिंतीला लागून असलेल्या चौकात पोलीस नसल्याने त्याचा गैरफायदा वाहनधारकांकडून घेतला जात असल्याचे प्रकर्षाने जाणवले. काही वाहनधारक तर कारवाईचीही भीती बाळगत नाही. पोलिसांनी मागून आवाज दिला, तर त्याकडे दुर्लक्ष करून वाहनधारक पुढे पळतात. यात दुचाकीस्वारांची संख्या अधिक आहे. महिलाही नियम मोडण्यात कमी नसल्याचे दिसून आले.

रोज ३५ जणांना दंड

सिग्नल नियमांचे उल्लंघन करणाऱ्या किमान ३५ जणांवर रोज दंडात्मक कारवाई करण्यात येते. वर्षभरात २४३ जणांनी सिग्नल जम्पिंग केले असून त्यांच्याकडून ४८ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सर्वाधिक कारवाया आकाशवाणी व अजिंठा चौकात झालेल्या आहेत. शहरातील टॉवर व कोर्ट चौकातही मोठ्या प्रमाणात कारवाया झालेल्या आहेत.

कोट..

सध्या शहरात अमृत योजनेचे काम सुरू असल्याने त्यात सिग्नलच्या वायरिंग तुटल्या आहेत. त्यामुळे सिग्नल बऱ्याच वेळा बंद असतात. दिवसाला एका सिग्नलवर ५० च्यावर कारवाया होतात. लाल सिग्नल असतानाही वाहने दामटणाऱ्या किमान ३० ते ३५ जणांवर कारवाई केली जाते.

-देविदास कुनगर, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा

वाहनचालक काय म्हणतात...

नियमांचे पालन करणे म्हणजे स्वत:ला शिस्त लावणे, असे आहे. घाई करून पटकन इच्छितस्थळी जायचे असले, तरी त्यात फारसा फरक पडत नाही. १० ते १५ मिनिटे मागेपुढे होऊ शकतात. सिग्नल बंद असले तरीदेखील काळजी घेणे गरजेचे आहे.

-रमेश पाटील, वाहनधारक

सिग्नलवर घाई करून उपयोग नाही. दंडाची रक्कम भरून माणूस मोकळा होतो, परंतु अपघात झाला तर त्याची भरपाई करता येत नाही. त्यात शरीराचा अवयव निकामी होऊ शकतो, त्याशिवाय वाहनाचे नुकसानही होण्याची भीती असते. त्यामुळे स्वत:चा जीव महत्त्वाचा आहे. त्यासाठी प्रत्येकाने वाहतूक नियमांचे पालन करून शिस्त पाळावी.

-संतोष नेटके, वाहनधारक

शहरात वाहतूककोंडी मोठी असते. चारही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागतात. एकाने नियम मोडला की, त्यामागे चार जण नियम मोडतात. बऱ्याचवेळा गर्दीच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची संख्या कमी असते, ती वाढविणे गरजेचे आहे. वाहतूक नियमांचे पालन झालेच पाहिजे, त्याबद्दल दुमत नाही. आम्ही काळजी घेतो.

-रामचंद्र पाटील, वाहनधारक

--