शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

धरणगाव शहरात बावीस दिवसानंतर पाणीपुरवठा, तोही अशुद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 21:35 IST

एकतर वीस ते बावीस दिवसांनी पाणी येते आणि तेही गढूळ व अशुध्द त्यामुळे धरणगावातील नागिरकांचे आरोग्यच धोक्यात आले आहे.

ठळक मुद्देनगरपालिकेचे फिल्टर प्लांट ठरते शोपीस

लोकमत न्यूज नेटवर्क

धरणगाव : शहरात गेल्या वीस ते बावीस दिवसानंतर पाणीपुरवठा झालेला असून अशुद्ध पाणी नळाला येताना दिसून येते. नगरपालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून फिल्टर प्लांट केवळ नावालाच आहे का, असा प्रश्न नागरिक करीत आहेत. हिवाळ्यात वीस ते पंचवीस दिवसानंतर पाणीपुरवठा होत होता. मात्र आता उन्हाळा सुरु झालेला असून आजही हीच परिस्थिती दिसून येते.

एप्रिल-मे महिन्यात तर नळांना पाणीच मिळत नाही, ज्यावेळेस पाऊस पडेल, त्याचवेळेस पाणीपुरवठा होताना दिसून येतो. शुद्ध पाणीपुरवठा होणे आवश्यक असून यात टीसीएल पावडर आम्लाचा वापर नगरपालिकेमार्फत होत नाही. याठिकाणी प्रचंड प्रमाणात दूषित पाणीपुरवठा होत असून नागरिकांत संतापाची लाट उसळत आहे. यात कुणाचा कट झालेला असून सर्दी, खोकला आजारांचे प्रमाण धरणगाव शहरात वाढलेले दिसून येते. त्यात अजून नगरपालिका अशुद्ध पाणीपुरवठा करत आहे. नगरपालिकेने फिल्टर प्लांट बसवला असून तो फक्त शोपीस म्हणून आहे का, असादेखील प्रश्न उपस्थित होत आहे.

 

पाणी उकळून प्यावे. धावडा येथील पाणीपुरवठा खंडित झालेला असून त्याठिकाणी पाईपलाईन दुरुस्तीचे व गाळ काढण्याचे काम सुरू आहे.

-अनुराधा पाटील, पाणी पुरवठा विभाग, धरणगाव

शहरातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळत नसून या ठिकाणी आजारी पडण्याचे प्रमाणात प्रचंड वाढ झालेली दिसून येते पाणीपुरवठा नगरपालिकेमार्फत होत असून २० ते २५ दिवसांतून होतो. तोदेखील अशुध्द असल्याने यापुढे जर पाणीपुरवठा अशुद्ध प्रमाणात आला तर भाजपतर्फे आंदोलन करण्यात येईल.

-दिलीप महाजन, शहराध्यक्ष, भाजपा, धरणगाव

टॅग्स :JalgaonजळगावDharangaonधरणगावMuncipal Corporationनगर पालिकाwater pollutionजल प्रदूषण