शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
2
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
3
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
4
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
5
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
6
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
7
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
8
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
9
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
10
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
11
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
13
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
14
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
15
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
16
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
17
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
18
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
19
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
20
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा

धरणगाव शहरात बावीस दिवसानंतर पाणीपुरवठा, तोही अशुद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 21:35 IST

एकतर वीस ते बावीस दिवसांनी पाणी येते आणि तेही गढूळ व अशुध्द त्यामुळे धरणगावातील नागिरकांचे आरोग्यच धोक्यात आले आहे.

ठळक मुद्देनगरपालिकेचे फिल्टर प्लांट ठरते शोपीस

लोकमत न्यूज नेटवर्क

धरणगाव : शहरात गेल्या वीस ते बावीस दिवसानंतर पाणीपुरवठा झालेला असून अशुद्ध पाणी नळाला येताना दिसून येते. नगरपालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून फिल्टर प्लांट केवळ नावालाच आहे का, असा प्रश्न नागरिक करीत आहेत. हिवाळ्यात वीस ते पंचवीस दिवसानंतर पाणीपुरवठा होत होता. मात्र आता उन्हाळा सुरु झालेला असून आजही हीच परिस्थिती दिसून येते.

एप्रिल-मे महिन्यात तर नळांना पाणीच मिळत नाही, ज्यावेळेस पाऊस पडेल, त्याचवेळेस पाणीपुरवठा होताना दिसून येतो. शुद्ध पाणीपुरवठा होणे आवश्यक असून यात टीसीएल पावडर आम्लाचा वापर नगरपालिकेमार्फत होत नाही. याठिकाणी प्रचंड प्रमाणात दूषित पाणीपुरवठा होत असून नागरिकांत संतापाची लाट उसळत आहे. यात कुणाचा कट झालेला असून सर्दी, खोकला आजारांचे प्रमाण धरणगाव शहरात वाढलेले दिसून येते. त्यात अजून नगरपालिका अशुद्ध पाणीपुरवठा करत आहे. नगरपालिकेने फिल्टर प्लांट बसवला असून तो फक्त शोपीस म्हणून आहे का, असादेखील प्रश्न उपस्थित होत आहे.

 

पाणी उकळून प्यावे. धावडा येथील पाणीपुरवठा खंडित झालेला असून त्याठिकाणी पाईपलाईन दुरुस्तीचे व गाळ काढण्याचे काम सुरू आहे.

-अनुराधा पाटील, पाणी पुरवठा विभाग, धरणगाव

शहरातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळत नसून या ठिकाणी आजारी पडण्याचे प्रमाणात प्रचंड वाढ झालेली दिसून येते पाणीपुरवठा नगरपालिकेमार्फत होत असून २० ते २५ दिवसांतून होतो. तोदेखील अशुध्द असल्याने यापुढे जर पाणीपुरवठा अशुद्ध प्रमाणात आला तर भाजपतर्फे आंदोलन करण्यात येईल.

-दिलीप महाजन, शहराध्यक्ष, भाजपा, धरणगाव

टॅग्स :JalgaonजळगावDharangaonधरणगावMuncipal Corporationनगर पालिकाwater pollutionजल प्रदूषण