शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

धरणगाव शहरात बावीस दिवसानंतर पाणीपुरवठा, तोही अशुद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 21:35 IST

एकतर वीस ते बावीस दिवसांनी पाणी येते आणि तेही गढूळ व अशुध्द त्यामुळे धरणगावातील नागिरकांचे आरोग्यच धोक्यात आले आहे.

ठळक मुद्देनगरपालिकेचे फिल्टर प्लांट ठरते शोपीस

लोकमत न्यूज नेटवर्क

धरणगाव : शहरात गेल्या वीस ते बावीस दिवसानंतर पाणीपुरवठा झालेला असून अशुद्ध पाणी नळाला येताना दिसून येते. नगरपालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून फिल्टर प्लांट केवळ नावालाच आहे का, असा प्रश्न नागरिक करीत आहेत. हिवाळ्यात वीस ते पंचवीस दिवसानंतर पाणीपुरवठा होत होता. मात्र आता उन्हाळा सुरु झालेला असून आजही हीच परिस्थिती दिसून येते.

एप्रिल-मे महिन्यात तर नळांना पाणीच मिळत नाही, ज्यावेळेस पाऊस पडेल, त्याचवेळेस पाणीपुरवठा होताना दिसून येतो. शुद्ध पाणीपुरवठा होणे आवश्यक असून यात टीसीएल पावडर आम्लाचा वापर नगरपालिकेमार्फत होत नाही. याठिकाणी प्रचंड प्रमाणात दूषित पाणीपुरवठा होत असून नागरिकांत संतापाची लाट उसळत आहे. यात कुणाचा कट झालेला असून सर्दी, खोकला आजारांचे प्रमाण धरणगाव शहरात वाढलेले दिसून येते. त्यात अजून नगरपालिका अशुद्ध पाणीपुरवठा करत आहे. नगरपालिकेने फिल्टर प्लांट बसवला असून तो फक्त शोपीस म्हणून आहे का, असादेखील प्रश्न उपस्थित होत आहे.

 

पाणी उकळून प्यावे. धावडा येथील पाणीपुरवठा खंडित झालेला असून त्याठिकाणी पाईपलाईन दुरुस्तीचे व गाळ काढण्याचे काम सुरू आहे.

-अनुराधा पाटील, पाणी पुरवठा विभाग, धरणगाव

शहरातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळत नसून या ठिकाणी आजारी पडण्याचे प्रमाणात प्रचंड वाढ झालेली दिसून येते पाणीपुरवठा नगरपालिकेमार्फत होत असून २० ते २५ दिवसांतून होतो. तोदेखील अशुध्द असल्याने यापुढे जर पाणीपुरवठा अशुद्ध प्रमाणात आला तर भाजपतर्फे आंदोलन करण्यात येईल.

-दिलीप महाजन, शहराध्यक्ष, भाजपा, धरणगाव

टॅग्स :JalgaonजळगावDharangaonधरणगावMuncipal Corporationनगर पालिकाwater pollutionजल प्रदूषण