शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

नशिराबादच्या पाणी योजनेबाबत टोलवाटोलवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 13:07 IST

ग्रामस्थांची गैरसोय

ठळक मुद्देउन्हाळा संपला तरी योजनेची चाचणी सुरूनियोजनाचा फज्जा उडाला

आॅनलाइन लोकमतनशिराबाद, जि. जळगाव, दि. १ - वर्षानुवर्षांपासून पाण्यासाठी संघर्ष सुरू असला तरी अद्यापही नशिराबादकर पाण्यासाठी शापितच ठरल्यागत आहे. पाणी टंचाईची बोंबाबोंब होऊनही उदासीन शासन व अधिकाऱ्यांनी मात्र पाणी योजनेबाबत ग्रामस्थांना वाटाण्याच्या अक्षदा लावल्या. मे महिना संपला तरीही योजनेची अद्याप चाचणीच सुरू आहे. उन्हाळा जवळपास संपला तरी ग्रामस्थांची तहान भागली नाही. येत्या आठवडाभरात योजनेचे शुद्ध पाणी मिळणार असे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात योजनेचे पाणी मिळेल तो दिवस उजाडण्याची सर्वच जण वाट पाहत आहे.गावाला पाणीपुरवठा करणाºया जलस्त्रोतांची पातळी खोलवर गेल्याने व ठोस पर्यायी योजनाही नसल्याने येथे जानेवारीपासून टंचाईचा सामना ग्रामस्थ करीत आहे. हंडाभर पाणी मिळविण्यासाठी प्रचंड हाल होत आहे. आतापर्यंत १० ते १३ दिवसाआड झालेल्या पाणीपुरवठ्यामुळे सर्वच हैराण आहे.नशिराबादला पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सुमारे १६ कोटी रुपयांची जलशुद्धीकरण योजनेचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. योजना सुरू होण्याबाबत आश्वासने व तारीख पे तारीख मिळाली. हतबल झालेले ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला. मात्र संबंधित विभागाने सहानुभूतीपूर्वक आठवडाभरात पाणी सुरू होईल, अशी विनंती करीत आंदोलनाला स्थगिती दिली. त्यानंतर पंप दुरुस्ती, बसविणे आदी कामे सुरू असल्याचे सांगत मे महिन्याचा पंधरवाडा लोटला अन् त्यानंतर चाचणी सुरू झाली. त्यातही पाईपलाईन फुटल्याने पुन्हा खोडा आला. मे अखेर नशिराबादला योजनेच्या ठिकाणी पाणी पोहचले. अद्याप चाचणीच सुरू असल्याने शुद्ध पाण्यासाठी ग्रामस्थ तहानलेलेच आहे. उन्हाळा संपला मात्र पाणी योजनेची प्रतिक्षा कायमच असल्याचे ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहे. जीव गेल्यावर शुद्ध पाणी देणार काय? असा संतप्त प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.दरम्यान पाणी समस्येवर मात करण्यासाठी वाघूर धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्याच्या मागणीला मंजुरी मिळाली. त्यामुळे वाघूरचे आवर्तन सुटल्यानेच टंचाईची तीव्रता कमी होण्यास मदत झाली. वाघूरच्या आवर्तनाने तरले हे मात्र तितकेच खरे.नियोजनाचा फज्जा उडालावाघूर बेळी, मुर्दापूर धरण व स्थानिक जलस्त्रोतातून गावाला पाणीपुरवठा होतो. मात्र त्याची भूजल पातळी कमी झाल्याने टंचाईची तीव्रता वाढली व पाणीपुरवठा व्यवस्था कोलमडली. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी अद्यापपर्यंत ठोस उपाययोजनाच कार्यान्वित नसल्याने नशिराबादकरांना टंचाईचा सामना करावाच लागत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात टंचाईच्या तीव्रतेवर मात होईल तसे नियोजन असल्याचा लोकप्रतिनिधी व प्रशासनाचा दावा फोल ठरला आहे. शेळगाव बॅरेजची जलशुद्धीकरण योजनाच अद्यापही कार्यान्वित न झाल्याने व एमआयडीसी पाणीप्रश्नी तोडगा न निघाल्याने सर्वच नियोजनाचा फज्जा उडाला.पाणी समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीने परिपूर्ण प्रयत्न केले. बोरींग करून पाणीपुरवठा सुरळीत केला. मात्र जलस्त्रोतच आटल्याने टंचाई वाढली. त्यातच एमआयडीसी पाणीप्रश्नी तोडगाच निघाला नाही. पाणी योजनेकामी अधिकाºयांनी दिशाभूल केली त्यामुळे योजना कार्यान्वितेची प्रतिक्षा आहे.-विकास पाटील, सरपंच.पाणी योजनेच्या चाचणीचे काम सुरू आहे. नशिराबादला जलशुद्धीकरण ठिकाणी पाणी आले असून चाचणी कार्यात आढळलेल्या त्रुटीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या ४ ते ५ दिवसात योजना पूर्णपणे कार्यान्वित होईल व सुरळीत पाणीपुरवठा सुरू होईल.-एस.सी.निकम, कार्यकारी अभियंता, मजिप्र.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईJalgaonजळगाव