शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

नशिराबादच्या पाणी योजनेबाबत टोलवाटोलवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 13:07 IST

ग्रामस्थांची गैरसोय

ठळक मुद्देउन्हाळा संपला तरी योजनेची चाचणी सुरूनियोजनाचा फज्जा उडाला

आॅनलाइन लोकमतनशिराबाद, जि. जळगाव, दि. १ - वर्षानुवर्षांपासून पाण्यासाठी संघर्ष सुरू असला तरी अद्यापही नशिराबादकर पाण्यासाठी शापितच ठरल्यागत आहे. पाणी टंचाईची बोंबाबोंब होऊनही उदासीन शासन व अधिकाऱ्यांनी मात्र पाणी योजनेबाबत ग्रामस्थांना वाटाण्याच्या अक्षदा लावल्या. मे महिना संपला तरीही योजनेची अद्याप चाचणीच सुरू आहे. उन्हाळा जवळपास संपला तरी ग्रामस्थांची तहान भागली नाही. येत्या आठवडाभरात योजनेचे शुद्ध पाणी मिळणार असे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात योजनेचे पाणी मिळेल तो दिवस उजाडण्याची सर्वच जण वाट पाहत आहे.गावाला पाणीपुरवठा करणाºया जलस्त्रोतांची पातळी खोलवर गेल्याने व ठोस पर्यायी योजनाही नसल्याने येथे जानेवारीपासून टंचाईचा सामना ग्रामस्थ करीत आहे. हंडाभर पाणी मिळविण्यासाठी प्रचंड हाल होत आहे. आतापर्यंत १० ते १३ दिवसाआड झालेल्या पाणीपुरवठ्यामुळे सर्वच हैराण आहे.नशिराबादला पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सुमारे १६ कोटी रुपयांची जलशुद्धीकरण योजनेचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. योजना सुरू होण्याबाबत आश्वासने व तारीख पे तारीख मिळाली. हतबल झालेले ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला. मात्र संबंधित विभागाने सहानुभूतीपूर्वक आठवडाभरात पाणी सुरू होईल, अशी विनंती करीत आंदोलनाला स्थगिती दिली. त्यानंतर पंप दुरुस्ती, बसविणे आदी कामे सुरू असल्याचे सांगत मे महिन्याचा पंधरवाडा लोटला अन् त्यानंतर चाचणी सुरू झाली. त्यातही पाईपलाईन फुटल्याने पुन्हा खोडा आला. मे अखेर नशिराबादला योजनेच्या ठिकाणी पाणी पोहचले. अद्याप चाचणीच सुरू असल्याने शुद्ध पाण्यासाठी ग्रामस्थ तहानलेलेच आहे. उन्हाळा संपला मात्र पाणी योजनेची प्रतिक्षा कायमच असल्याचे ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहे. जीव गेल्यावर शुद्ध पाणी देणार काय? असा संतप्त प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.दरम्यान पाणी समस्येवर मात करण्यासाठी वाघूर धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्याच्या मागणीला मंजुरी मिळाली. त्यामुळे वाघूरचे आवर्तन सुटल्यानेच टंचाईची तीव्रता कमी होण्यास मदत झाली. वाघूरच्या आवर्तनाने तरले हे मात्र तितकेच खरे.नियोजनाचा फज्जा उडालावाघूर बेळी, मुर्दापूर धरण व स्थानिक जलस्त्रोतातून गावाला पाणीपुरवठा होतो. मात्र त्याची भूजल पातळी कमी झाल्याने टंचाईची तीव्रता वाढली व पाणीपुरवठा व्यवस्था कोलमडली. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी अद्यापपर्यंत ठोस उपाययोजनाच कार्यान्वित नसल्याने नशिराबादकरांना टंचाईचा सामना करावाच लागत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात टंचाईच्या तीव्रतेवर मात होईल तसे नियोजन असल्याचा लोकप्रतिनिधी व प्रशासनाचा दावा फोल ठरला आहे. शेळगाव बॅरेजची जलशुद्धीकरण योजनाच अद्यापही कार्यान्वित न झाल्याने व एमआयडीसी पाणीप्रश्नी तोडगा न निघाल्याने सर्वच नियोजनाचा फज्जा उडाला.पाणी समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीने परिपूर्ण प्रयत्न केले. बोरींग करून पाणीपुरवठा सुरळीत केला. मात्र जलस्त्रोतच आटल्याने टंचाई वाढली. त्यातच एमआयडीसी पाणीप्रश्नी तोडगाच निघाला नाही. पाणी योजनेकामी अधिकाºयांनी दिशाभूल केली त्यामुळे योजना कार्यान्वितेची प्रतिक्षा आहे.-विकास पाटील, सरपंच.पाणी योजनेच्या चाचणीचे काम सुरू आहे. नशिराबादला जलशुद्धीकरण ठिकाणी पाणी आले असून चाचणी कार्यात आढळलेल्या त्रुटीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या ४ ते ५ दिवसात योजना पूर्णपणे कार्यान्वित होईल व सुरळीत पाणीपुरवठा सुरू होईल.-एस.सी.निकम, कार्यकारी अभियंता, मजिप्र.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईJalgaonजळगाव