शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

खान्देशातील सात पाणी प्रकल्पांच्या घशाला कोरड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 17:26 IST

जळगाव जिल्ह्यातील मन्याड, बोरी, भोकरबारी, अग्नावती, हिवरा प्रकल्पातील जलसाठा शून्यावर आला आहे. धुळ्यातील सोनवद आणि अमरावती प्रकल्पातही तीच स्थिती आहे.

कुंदन पाटील

जळगाव : खान्देशातील सात प्रकल्पातील जलसाठा शून्यावर आला आहे. तसेच जळगावच्या हतनूरमध्ये ४० तर गिरणा धरणात केवळ २१ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. मान्सून लांबल्यास भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

जळगाव जिल्ह्यातील मन्याड, बोरी, भोकरबारी, अग्नावती, हिवरा प्रकल्पातील जलसाठा शून्यावर आला आहे. धुळ्यातील सोनवद आणि अमरावती प्रकल्पातही तीच स्थिती आहे. मोठे, मध्यम आणि लघू प्रकल्पांमध्ये बुधवारी ६२३.१४ दलघमी एवढा उपयुक्त साठा शिल्लक आहे. जळगावसाठी जीवनदायी ठरणाऱ्या हतनूर आणि गिरणा धरणातील साठाही ओसरला आहे. तसेच वाघूरमध्ये ६५.६८ टक्के इतका साठा आहे. अन्य काही प्रकल्पातील साठा अतिशय नाजूक आहे. मे महिन्याच्या मध्यान्हात बहुतांशी प्रकल्पांच्या घशाला कोरड पडली आहे. मान्सून १२ जूनपर्यंत दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मान्सून वेळेवर दाखल झाल्यास पाणीटंचाईसह धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील चाराटंचाईचाही प्रश्न सुटणार आहे.

आवर्तन जूनमध्येच१५ मेपर्यंत गिरणा धरणातून आवर्तनाची एकही मागणी आलेली नाही. तसेच बिगर सिंचनासाठी शेवटचे आवर्तन शिल्लक आहे. हे आवर्तन सुटल्यानंतर गिरणा धरणातील उपयुक्त साठा शून्यावर येणार आहे. त्यामुळे प्रशासनही ‘अलर्ट’मोडवर आहे. जून महिन्यात पाऊस लांबल्याची चिन्हे पाहून पहिल्या आठवड्यात आवर्तन सोडण्याविषयी निर्णय घेतला जाणार आहे.

प्रकल्पनिहाय जलसाठाप्रकल्प-टक्केवारीहतनूर-४०.५९गिरणा-२१.१६वाघूर-६५.६८सुकी-६५.६०अभोरा-६७.५६तोंडापूर-१९.७५मंगरुळ-४४.५१बहुळा-१४.७८मोर-६६.६२अंजनी-३.८४गूळ-४८.८७सुलवाडे बॅरेज-३७.६४पांझरा-२४.१५मालनगाव-३३.५४जामखेडी-२७.३९कनोली-२.३७बुराई-६.४०अनेर-६०.०६करवंद-३८.७७

गिरणा धरणातून शेवटचे आवर्तन सोडण्याविषयी अद्याप निर्णय झालेला नाही. या पंधरवड्यानंतर मागणीनुसार आवर्तन सोडण्याचा निर्णय जिल्हास्तरीय समिती घेईल.-देवेंद्र अग्रवाल, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग.

टॅग्स :Jalgaonजळगावwater scarcityपाणी टंचाई