शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

खान्देशातील सात पाणी प्रकल्पांच्या घशाला कोरड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 17:26 IST

जळगाव जिल्ह्यातील मन्याड, बोरी, भोकरबारी, अग्नावती, हिवरा प्रकल्पातील जलसाठा शून्यावर आला आहे. धुळ्यातील सोनवद आणि अमरावती प्रकल्पातही तीच स्थिती आहे.

कुंदन पाटील

जळगाव : खान्देशातील सात प्रकल्पातील जलसाठा शून्यावर आला आहे. तसेच जळगावच्या हतनूरमध्ये ४० तर गिरणा धरणात केवळ २१ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. मान्सून लांबल्यास भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

जळगाव जिल्ह्यातील मन्याड, बोरी, भोकरबारी, अग्नावती, हिवरा प्रकल्पातील जलसाठा शून्यावर आला आहे. धुळ्यातील सोनवद आणि अमरावती प्रकल्पातही तीच स्थिती आहे. मोठे, मध्यम आणि लघू प्रकल्पांमध्ये बुधवारी ६२३.१४ दलघमी एवढा उपयुक्त साठा शिल्लक आहे. जळगावसाठी जीवनदायी ठरणाऱ्या हतनूर आणि गिरणा धरणातील साठाही ओसरला आहे. तसेच वाघूरमध्ये ६५.६८ टक्के इतका साठा आहे. अन्य काही प्रकल्पातील साठा अतिशय नाजूक आहे. मे महिन्याच्या मध्यान्हात बहुतांशी प्रकल्पांच्या घशाला कोरड पडली आहे. मान्सून १२ जूनपर्यंत दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मान्सून वेळेवर दाखल झाल्यास पाणीटंचाईसह धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील चाराटंचाईचाही प्रश्न सुटणार आहे.

आवर्तन जूनमध्येच१५ मेपर्यंत गिरणा धरणातून आवर्तनाची एकही मागणी आलेली नाही. तसेच बिगर सिंचनासाठी शेवटचे आवर्तन शिल्लक आहे. हे आवर्तन सुटल्यानंतर गिरणा धरणातील उपयुक्त साठा शून्यावर येणार आहे. त्यामुळे प्रशासनही ‘अलर्ट’मोडवर आहे. जून महिन्यात पाऊस लांबल्याची चिन्हे पाहून पहिल्या आठवड्यात आवर्तन सोडण्याविषयी निर्णय घेतला जाणार आहे.

प्रकल्पनिहाय जलसाठाप्रकल्प-टक्केवारीहतनूर-४०.५९गिरणा-२१.१६वाघूर-६५.६८सुकी-६५.६०अभोरा-६७.५६तोंडापूर-१९.७५मंगरुळ-४४.५१बहुळा-१४.७८मोर-६६.६२अंजनी-३.८४गूळ-४८.८७सुलवाडे बॅरेज-३७.६४पांझरा-२४.१५मालनगाव-३३.५४जामखेडी-२७.३९कनोली-२.३७बुराई-६.४०अनेर-६०.०६करवंद-३८.७७

गिरणा धरणातून शेवटचे आवर्तन सोडण्याविषयी अद्याप निर्णय झालेला नाही. या पंधरवड्यानंतर मागणीनुसार आवर्तन सोडण्याचा निर्णय जिल्हास्तरीय समिती घेईल.-देवेंद्र अग्रवाल, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग.

टॅग्स :Jalgaonजळगावwater scarcityपाणी टंचाई