शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

खान्देशातील सात पाणी प्रकल्पांच्या घशाला कोरड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 17:26 IST

जळगाव जिल्ह्यातील मन्याड, बोरी, भोकरबारी, अग्नावती, हिवरा प्रकल्पातील जलसाठा शून्यावर आला आहे. धुळ्यातील सोनवद आणि अमरावती प्रकल्पातही तीच स्थिती आहे.

कुंदन पाटील

जळगाव : खान्देशातील सात प्रकल्पातील जलसाठा शून्यावर आला आहे. तसेच जळगावच्या हतनूरमध्ये ४० तर गिरणा धरणात केवळ २१ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. मान्सून लांबल्यास भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

जळगाव जिल्ह्यातील मन्याड, बोरी, भोकरबारी, अग्नावती, हिवरा प्रकल्पातील जलसाठा शून्यावर आला आहे. धुळ्यातील सोनवद आणि अमरावती प्रकल्पातही तीच स्थिती आहे. मोठे, मध्यम आणि लघू प्रकल्पांमध्ये बुधवारी ६२३.१४ दलघमी एवढा उपयुक्त साठा शिल्लक आहे. जळगावसाठी जीवनदायी ठरणाऱ्या हतनूर आणि गिरणा धरणातील साठाही ओसरला आहे. तसेच वाघूरमध्ये ६५.६८ टक्के इतका साठा आहे. अन्य काही प्रकल्पातील साठा अतिशय नाजूक आहे. मे महिन्याच्या मध्यान्हात बहुतांशी प्रकल्पांच्या घशाला कोरड पडली आहे. मान्सून १२ जूनपर्यंत दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मान्सून वेळेवर दाखल झाल्यास पाणीटंचाईसह धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील चाराटंचाईचाही प्रश्न सुटणार आहे.

आवर्तन जूनमध्येच१५ मेपर्यंत गिरणा धरणातून आवर्तनाची एकही मागणी आलेली नाही. तसेच बिगर सिंचनासाठी शेवटचे आवर्तन शिल्लक आहे. हे आवर्तन सुटल्यानंतर गिरणा धरणातील उपयुक्त साठा शून्यावर येणार आहे. त्यामुळे प्रशासनही ‘अलर्ट’मोडवर आहे. जून महिन्यात पाऊस लांबल्याची चिन्हे पाहून पहिल्या आठवड्यात आवर्तन सोडण्याविषयी निर्णय घेतला जाणार आहे.

प्रकल्पनिहाय जलसाठाप्रकल्प-टक्केवारीहतनूर-४०.५९गिरणा-२१.१६वाघूर-६५.६८सुकी-६५.६०अभोरा-६७.५६तोंडापूर-१९.७५मंगरुळ-४४.५१बहुळा-१४.७८मोर-६६.६२अंजनी-३.८४गूळ-४८.८७सुलवाडे बॅरेज-३७.६४पांझरा-२४.१५मालनगाव-३३.५४जामखेडी-२७.३९कनोली-२.३७बुराई-६.४०अनेर-६०.०६करवंद-३८.७७

गिरणा धरणातून शेवटचे आवर्तन सोडण्याविषयी अद्याप निर्णय झालेला नाही. या पंधरवड्यानंतर मागणीनुसार आवर्तन सोडण्याचा निर्णय जिल्हास्तरीय समिती घेईल.-देवेंद्र अग्रवाल, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग.

टॅग्स :Jalgaonजळगावwater scarcityपाणी टंचाई