शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

पाणी योजनांचा सुकाळ, लाभात मात्र दुष्काळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 4:01 PM

मंगरुळला घोटभर पाण्यासाठी भटकंती

रावसाहेब भोसलेपारोळा : तालुक्यातील मंगरुळ या गावाला भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून टंचाईवर मात करण्यासाठी गावकऱ्यांना टँकरवर अवलंबून रहावे लागत आहे. घोटभर पाण्यासाठी ग्रामस्थांची चांगलीच दमछाक होत आहे. येथे विविध योजना राबविल्या तरी त्यांना ग्रहण लागत गेल्याने गावाला जणू पाणी टंचाई पाचवीला पुजली आहे. एक प्रकारे येथे योजनांचा सुकाळ असला तरी प्रत्यक्षात त्यांचा लाभ मिळण्यात दुष्काळच असल्याचे चित्र आहे.हिवाळ््यापासूनच टंचाईच्या झळामंगरुळ येथे डिसेंबर महिन्यापासून टंचाईचा झळा बसत आहे. या गावाची लोकसंख्या साडेतीन ते चार हजार आहे. १९९८मध्ये बिगर आदिवासी पाणी पुरवठा योजना खोलसर धरणावरून होती. पण खोलसर धरणात पाण्याचा ठणठणाट आहे. यामुळे ही योजना बंद पडली. त्यानंतर गावात पाणी टंचाई समस्या निर्माण झाली. त्यावर मात करण्यासाठी पुन्हा भारत निर्माण पाणी पुरवठा योजना गावाला दिली. तीही योजना बारगळली. आता पुन्हा एक कोटी पाच लाखांची योजना मुख्यमंत्री पेयजल या गावाला सुरू आहे. या योजनेचे विहिरीचे काम सुरू आहे. पण निधीअभावी ते कामदेखील रखडले आहे.जीव धोक्यात घालून मिळते हंडाभर पाणीमंगरुळ गावाला शासनाच्या तीन- तीन पाणी पुरवठा योजना राबविल्या गेल्या पण गाव पाणी टंचाईपासून मुक्त होऊ शकले नाही, हे विशेष. गावाला सद्यस्थितीत पाणी टंचाई समस्याने उग्ररूप धारण केले आहे. या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी गावाला टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीत चार खेपा शासकीय टँकरने व दोन खेपा खाजगी टँकरने टाकले जाते. मग रणरणत्या उन्हात अबाल वृद्ध हे टँकर गावात दिसताच विहिरीवर एकच गर्दी करतात. विहिरीतून वाटेल त्या जागेवरून विहिरीतून पाणी तोलून काढतात आणि पिण्यासाठी हंडाभर पाणी भरतात.विकतचे पाणी घेऊन गुरांना पाजावे लागते पाणीपाऊस कमी झाल्याने आजुबाजूचे नाले, केटीवेअर भरले नाही. पाण्याचे स्रोतच नसल्याने ग्रामस्थांना एक ते दोन किलोमीटर जिथे शक्य असेल तेथून बैलगाडीने पाणी आणून आपल्या गुरांना दिले जात आहे. गुरांसाठी ५० रुपये टाकीप्रमाणे पाणी विकत घेऊन गुरांना पाजावे लागत आहे. गावाची कायमस्वरूपी पाणी टंचाई समस्या दूर व्हावी, यासाठी प्रयत्न झाले पाहिजे, अशी मागणी ग्रामस्थ सुनील पाटील यांनी केली.तासन् तास टँकरची प्रतीक्षागावात वर्षातून किमान सहा महिने पाणी टंचाईशी सामना करावा लागतो. सध्या तर दिवसभर टँकरची वाट पहावी लागते. टँकर येण्याची निश्चित वेळ नसल्याने रणरणत्या उन्हात टँकर आले की धावपळ करून बादलीभर पाण्यासाठी जीव धोक्यात घालून विहिरीतून पाणी तोलून काढावे लागते. कोणाचा धक्का लागून विहिरीत तोल जाऊन पडणार की काय अशी भीती कायम विहिरवर असताना वाटते, अशी प्रतिक्रिया गृहिणी उषाबाई पाटील यांनी दिली.निधीअभावी योजना रखडलीगावात पाण्याच्या टँकरच्या केवळ सहा फेºया होतात. तेही विहिरीत टाकून ग्रामस्थ तोलूून पाणी काढतात. यात कुणाला पाणी मिळतं तर कोणाला मिळत नाही त्यातही टँकरची अनियमितता असून विहिरीत पाणी कधी टाकले जाते तर कधी टाकले जात नाही. त्यामुळे बºयाचवेळा पाण्याशिवाय दिवस काढावा लागतो. याआधी जलस्वराज्य योजना झाली पण गावात त्याचा काहीच उपयोग झाला नाही. आता मुख्यमंत्री पेयजल योजनाचे मंजूर आहे, मात्र निधीअभावी ते काम ठप्प आहे, असे सरपंच आरोस्तलबाई भिल यांनी सांगितले.गावातील पाणी समस्येबाबत ग्रामसेविकेसी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद असल्याचा अनुभव आला.

टॅग्स :Jalgaonजळगाव