शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
3
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
4
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
5
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
6
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
7
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
8
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
9
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
10
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
11
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
12
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
13
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

पारोळा तालुक्यातील सांगवी येथे पाण्यासाठी दाही दिशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 3:55 PM

दोन योजना ठरल्या अयशस्वी

पारोळा : सांगवी, ता. पारोळा येथे जानेवारी महिन्यापासून गावाला शासकीय टँकरने पाणीपुरवठा केला जात असून गेल्या तीन महिन्यांपासून पाणीटंचाइमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. गावाच्या दोन्ही बाजूला असलेल्या दोन विहिरीत टँकरने पाणी आणून टाकले जाते, मात्र ते बोरी धरणावरून आणून थेट गावाच्या विहिरीत टाकले जात असल्याने अशुद्ध पाण्यावर शुद्धीकरणासाठी कोणतीही प्रकिया होत नसल्याने त्याचा पिण्यासाठी उपयोग होत नसल्याने समस्यांमध्ये अधिक भर पडते. हे पाणी केवळ गुरांना पिण्यासाठी, सांडपाणी, कपडे धुणे, अंघोळीसाठी वापरले जाते.पाण्यासाठी कसरतटँकर गावात आले म्हणजे विहिरीवर पाणी भरण्यासाठी एकच झुंबड उडते. सर्वजण दोर-बादलीने पाणी तोलून काढतात. पाणी भरण्यासाठी सर्वात जास्त गर्दी ही महिला वर्गाची असते. या गर्दीत मोठा धोका पत्करत पाण्यासाठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र या गावात आहे.गावात दोन पाणीपुरवठा योजना बंदगावाला पाणीपुरवठ्यासाठी २००३-०४मध्ये २२ लाखांची भारत निर्माण योजना राबविली गेली. पण ही योजना विहिरीत पाणी नसल्याने बंद पडली ती कायमची. त्यानंतर गावात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी २०१४ -१५मध्ये राष्ट्रीय पाणीपुरवठा पेयजल योजना सुमारे २५ लाखांची योजना मिळाली. पण गावाला पुरेसे पाणी मिळण्या आधीच त्या योजनेचा बोजवारा उडाला. त्यानंतर ५१ हजारांची दलित वस्ती सुधार योजना मिळाली पण तिचाही उपयोग झाला नाही. आता या भीषण पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ६५ लाखांची राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर झाली आहे. मात्र तीदेखील लालफितीत अडकली आहे.पिण्यासाठी विकतचे पाणीसांगवी गावात २० रुपयेप्रमाणे पारोळा येथून पाणी विकत घेऊन पित आहेत. अशुद्ध पाणी पिऊन दवाखाना भरण्यापेक्षा विकतचे पाणी घेऊन पिलेले बरे असा सूर ग्रामस्थांकडून उमटला. जे पाणी विकत घेऊ शकत नाही ते दिवसभर रणरणत्या उन्हात दाही दिशांना रानावनात हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करतात.पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळावीगावाला तीव्र पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. शेतातील विहिरीवरून पिण्यासाठी पाणी आणत आहे. सांगवी गावाला राष्ट्रीय पेयजल ६५ लाखांची योजना मंजूर व्हावी यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. आचारसंहितामुळे रखडला आहे. ही योजना लवकर मंजूर व्हावी, अशी मागणी सरपंच महेंद्र शालीग्राम पाटील यांनी केली.टँकरची वाट पाहावी लागतेदिवसभराचे उद्योग व्यवसाय सोडून पाण्याचे टँकर येण्याची वाट पहात राहावी लागते. टँकर येताच पाणी भरण्यासाठी एकच गर्दी होते. विहिरीतून पाणी तोलून काढावे लागते. यामुळे खूप दमछाक होते. कोणता दिवस उजडेल की त्या दिवशी नळांना पाणी येईल याची आम्ही सर्व महिला प्रतीक्षा करीत आहे, असे सुनिता राठोड यांनी सांगितले.हंडाभर पाण्यासाठी रानावनात भटकंतीसांडपाण्यासाठी टँकरने आलेल्या पाण्याचा उपयोग होतो. मात्र पिण्याच्या पाण्यासाठी रानावनात रणरणत्या उन्हात भटकंती करावी लागते. अनेक विहिरींनी तळ गाठला आहे. दोन-चार दिवसांनी पाणी असलेल्या विहिरींचा शोध घ्यावा लागतो आणि त्यातच दिवस मात्र निघून जातो, असे शेतकरी श्रीराम भिवसन पाटील यांनी सांगितले.पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रयत्नसांगवी गावात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासकीय टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. गावालगत असलेल्या धरणात असलेली पाणीपुरवठा विहीरीत आडवे बोअर, उभे बोअर करणे सूचविले आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ग्रामसेवक नीलेश साळुंखे यांनी सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगाव