शहरं
Join us  
Trending Stories
1
भावाचा हातात हात, तोंडावर मास्क, हात उंचावून अभिवादन; आजारपणातही संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर
2
"बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मतं मागणाऱ्यांची..."; राज ठाकरेंचे 'फटकारे', कुणावर डागली तोफ?
3
"मी हे मान्यच करू शकत नाही..."; टीम इंडियाच्या पराभवानंतर चेतेश्वर पुजाराने चांगलंच सुनावलं
4
५ वर्षांत ५३०० टक्के रिटर्न; आता 'हा' शेअर पुन्हा सुस्साट! सातत्यानं लागतंय अपर सर्किट, कारण काय?
5
भारताचा अमेरिकेसोबत ऐतिहासिक LPG करार; घरगुती गॅस सिलिंडरची किंमत कमी होणार?
6
Protest: आधी ‘शेल्टर’ची व्यवस्था करा, नंतरच श्वानांना हात लावा; प्राणीमित्र संघटना रस्त्यावर!
7
गौतम अदानी आणताहेत देशातील सर्वात मोठा राइट्स इश्यू; ७१६ रुपये स्वस्त मिळतोय शेअर, पाहा डिटेल्स
8
खळबळजनक! थारसाठी पत्नीची हत्या, हुंड्यासाठी पती झाला हैवान; भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
9
SIR च्या कामाचा भार असह्य; वरिष्ठाच्या धमक्यांना कंटाळून शिक्षकाची रेल्वेखाली उडी, एकाच दिवशी दोन कर्मचाऱ्यांचे टोकाचे पाऊल
10
Ritual: पानाच्या टपरीवर का असते शंकराची पितळी मूर्ती? धार्मिक मान्यता की आणखी काही?
11
सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका
12
सुश्मिता सेनने पूर्ण शुद्धीत राहूनच केलेली अँजिओप्लास्टी, दोन वर्षांपूर्वी आलेला हार्टॲटॅक
13
काँगोमधील तांब्याच्या खाणीत मोठी दुर्घटना; पूल कोसळून ३२ जणांचा मृत्यू, अनेक जण अजूनही बेपत्ता
14
आई वडिलांची एक चूक नडली, मुलाला झाला गंभीर आजार; हाताचे बोट कापावे लागले, कारण काय?
15
Delhi Blast : दिल्ली स्फोटातील डॉ. शाहीनच्या कोट्यवधींच्या फंडिंगबाबत धक्कादायक खुलासा, ATS-NIA चे छापे
16
टॅक्स भरणे झाले सोपे! बँक, नेट बँकिंगचा झंझट नाही; आता UPI ॲपद्वारे मिनिटांत भरा प्राप्तीकर
17
पालघर साधू हत्याकांडात आरोप केले, त्यालाच पक्षात घेतले? चौफेर टीका होताच भाजपानं दिलं असं स्पष्टीकरण
18
देवेंद्र फडणवीसांना भेटला, सत्कार करून घेतला; पंतप्रधान कार्यालयात सचिव म्हणणारा निघाला...
19
नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी सुवर्णसंधी! ९०% कंपन्या 'या' पदावर प्रोफेशनल्सची करणार भरती
20
देवेंद्र फडणवीसांचं 'धक्कातंत्र'! उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर पुन्हा सोपवली जबाबदारी
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांच्या अनास्थेमुळे ‘प्लॅस्टिक’मुक्त अभियानाचा ‘कचरा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 22:51 IST

चाळीसगाव पालिका : वर्षभरात २५ कारवाया, ३० हजार दंड वसूल, पाटणादेवी येथे वनविभागाचे एक पाऊल पुढे

ठळक मुद्देपाटणादेवी येथे वनविभागाचे एक पाऊल पुढे पाटणादेवी येथे प्लॅस्टिक कचºयाची समस्या निकाली काढण्यासाठी वन्यजीव विभागामार्फत १ जूनपासून ‘प्लॅस्टिकमुक्त' अभियान राबविण्यात येत आहे.गेल्या चार दिवसात पाटणादेवी मंदिर आणि जंगल परिसरात वनविभागाने प्लॅस्टिक कचरा संकलन करण्याची मोहीम राबवली आहे. यात १३ हजार प्लॅस्टिकच्या रिकाम्या बाटल्या जमा केल्या आहेत. मंगळवारी वृक्षारोपण करून अभियानाची सांगता केली जाणार आहे.वन्यजीव विभागाने मंदिर आणि जंगल परिसरात अन्न शिजवण्यावर बंदी घोषित केली आहे. हे अन्न प्लॅस्टिक वस्तुंमध्ये वाढले आणि खाल्ले जाते. यामुळे भाविकांमध्ये रोष असला तरी बाहेरुन अन्न शिजवून नवसफेड करावी, असा पर्यायदेखील वनविभागाने सुचविला आहे.कापडी पिशव्यांना ठेंगा पालिकेने सुरुवातीला नाममात्र दरात २० हजार कापडी पिशव्या नागरिकांना उपलब्ध करून दिल्या. गेल्या १५ दिवसांपूर्वी मीनाक्षी निकम यांच्या दिव्यांग महिला भगिनी मंडळाने पालिकेच्या आवारातच कापडी पिशवी विक्रीचा स्टॉल लावला होता. यालाही प्रतिस

जिजाबराव वाघआॅनलाईन लोकमतचाळीसगाव, जि.जळगाव, दि. ४ : पालिकेने अकरा महिन्यांपूर्वी ‘प्लॅस्टिक’ समस्येला तोंड देण्यासाठी थेट ट्रिपल ‘महाराष्ट्र केसरी’ विजय चौधरी यांच्या उपस्थितीत दंड थोपटले. प्लॅस्टिकमुक्तीची कुस्ती जिंकण्याची गर्जनाही केली होती. मात्र शहरवासीयांच्या प्रतिसादशून्य अनास्थेमुळे हा प्रयोग फसला असून, अभियानाचाच ‘कचरा’ झाल्याचे ठळक वास्तव समोर आले आहे.चाळीसगाव पालिकेत दीड वर्षांपूूर्वी सत्तांतर झाल्यानंतर बहुविध उपक्रमांचे बिगूल वाजले. ३० जुलै २०१७ रोजी चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे, आमदार उन्मेष पाटील यांच्या उपस्थित ‘प्लॅस्टिकमुक्त चाळीसगाव’ अभियानाचा श्रीगणेशाही केला. यासाठी ट्रीपल महाराष्ट्र केसरी पहिलवान विजय चौधरी यांची ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर’ म्हणून निवड केली. पालिकेमार्फत पर्यावरणस्नेही जनजागृती सुरू असली तरी नागरिकांमधून अभियानाला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. प्लॅस्टिकला पर्याय म्हणून कापडी पिशव्यांचा पर्याय समोर आला. काही प्रमाणात नागरिकांमध्ये जनजागृती झालीही. तथापि, अभियानाला गती मिळत नसल्याचे ११ महिन्यांनंतर जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर अधोरेखित झाले आहे.मुख्याधिकाऱ्यांचा स्तुत्य उपक्रमओला आणि सुका कचरा वेगळा करणे हीच एक मोठी समस्या आहे. घराघरातील डस्टबीन ओल्यासुक्या एकत्रित कचºयाने भरुन जातात. ओल्या कचºयापासून घरगुती खत निर्मिती झाल्यास ही समस्या सुटू शकते. पालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी १ फेब्रुवारी २०१८ पासून आपल्या घरी हा प्रयोग यशस्वी केला असून, ओल्या कचºयापासून तयार केलेले खत ते झाडांना देतात. यासाठी त्यांनी साध्या दोन बास्केट वापरल्या आहेत. शहरवासीयांनी ओला आणि सुका कचरा वेगळा करावा, असे त्यांचे आवाहन आहे.वर्षभरात ३० हजार रुपये दंड वसूलपालिकेने प्लॅस्टिकविरोधी मोहिमेत शहरातील प्लॅस्टिक वस्तू विक्रेत्यांवर कारवाई करताना ३० हजार रुपये दंड वसुली केली. वर्षभरात लहान-मोठ्या २५ कारवाई केल्या गेल्या.५० मायक्रोन पेक्षा कमी असणाºया प्लॅस्टिक कॅरीबॅगवर बंदी आहे. मध्यंतरी न्यायालयाने सर्वच प्लॅस्टिक वस्तू विक्रीवर टाच आणली.प्लॅस्टिक विक्रेत्यांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने त्यांना आहे ते प्लॅस्टिक नष्ट करण्याचा ३१ मार्च ते १९ जून असा तीन महिन्यांचा कालावधी दिला आहे. यामुळे सद्य:स्थितीत ५० मायक्रोनपेक्षा कमी क्षमतेच्या कॅरीबॅग बाजारात वापरल्या जात आहेत. १९ जूननंतर पालिका यावर काय कारवाई करते, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.शहरात सामाजिक काम करणाºया संघटनांनीदेखील या अभियानापासून अंतर राखले आहे. पालिकेनेही प्लॅस्टिकविरोधी घोषवाक्य स्पर्धा घेण्याव्यतिरिक्त फारसे ठोस उपक्रम राबविले नाही, असा पर्यावरणप्रेमी नागरिकांचा रोष आहे.नागरिकांनी सहकार्य करावेप्लॅस्टिकमुक्त अभियान सुरुच आहे. आरोग्य विभागामार्फत कारवाई होत आहे. नागरिकांनी सहकार्य केले पाहिजे. कापडी पिशवी वापरावी. सामाजिक संघटनांनीही यात सहभागी व्हावे.- आशालता चव्हाणनगराध्यक्षा, चाळीसगावनगरपालिकेचे अपयशप्लॅस्टिकमुक्त अभियान राबविताना पालिका अपयशी ठरली आहे. नागरी सुविधांकडे लक्ष देताना सतत कारवाईचा बडगा उगारणेही गरजेचे आहे. शहराच्या मध्यभागातून वाहणारी नदी प्लॅस्टीक कचºयामुळे प्रदूषित झाली आहे.- दिलीप घोरपडेउत्तर महाराष्ट्र प्रमुख, सह्याद्री प्रतिष्ठानआम्ही प्रबोधन कराणारप्लॅस्टिकमुक्त अभियानात आम्ही १० हजार रुपयांच्या तीन हजार कापडी पिशव्या दिल्या होत्या. यापुढेही आम्ही प्रबोधन करणार आहोत. नागरिकांनी कापडी पिशवी वापरण्याची सवय लावून घेतली पाहिजे.- धरती सचिन पवारअध्यक्षा, वसुंधरा फाऊंडेशन, चाळीसगावसर्वांना सहभागी करून घ्यावेपालिका प्रशासनाने अभियानाची व्याप्ती वाढवून सामाजिक संघटना, पक्षीय कार्यकर्ते यांनाही सहभागी करून घ्यावे. जनजागृतीसाठी मोहीमदेखील राबवावी. पालिका प्रशासनाचे प्रयत्न ठोस असले पाहिजे.- दीपक पाटील,नगरसेवक, चाळीसगाव