शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

नागरिकांच्या अनास्थेमुळे ‘प्लॅस्टिक’मुक्त अभियानाचा ‘कचरा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 22:51 IST

चाळीसगाव पालिका : वर्षभरात २५ कारवाया, ३० हजार दंड वसूल, पाटणादेवी येथे वनविभागाचे एक पाऊल पुढे

ठळक मुद्देपाटणादेवी येथे वनविभागाचे एक पाऊल पुढे पाटणादेवी येथे प्लॅस्टिक कचºयाची समस्या निकाली काढण्यासाठी वन्यजीव विभागामार्फत १ जूनपासून ‘प्लॅस्टिकमुक्त' अभियान राबविण्यात येत आहे.गेल्या चार दिवसात पाटणादेवी मंदिर आणि जंगल परिसरात वनविभागाने प्लॅस्टिक कचरा संकलन करण्याची मोहीम राबवली आहे. यात १३ हजार प्लॅस्टिकच्या रिकाम्या बाटल्या जमा केल्या आहेत. मंगळवारी वृक्षारोपण करून अभियानाची सांगता केली जाणार आहे.वन्यजीव विभागाने मंदिर आणि जंगल परिसरात अन्न शिजवण्यावर बंदी घोषित केली आहे. हे अन्न प्लॅस्टिक वस्तुंमध्ये वाढले आणि खाल्ले जाते. यामुळे भाविकांमध्ये रोष असला तरी बाहेरुन अन्न शिजवून नवसफेड करावी, असा पर्यायदेखील वनविभागाने सुचविला आहे.कापडी पिशव्यांना ठेंगा पालिकेने सुरुवातीला नाममात्र दरात २० हजार कापडी पिशव्या नागरिकांना उपलब्ध करून दिल्या. गेल्या १५ दिवसांपूर्वी मीनाक्षी निकम यांच्या दिव्यांग महिला भगिनी मंडळाने पालिकेच्या आवारातच कापडी पिशवी विक्रीचा स्टॉल लावला होता. यालाही प्रतिस

जिजाबराव वाघआॅनलाईन लोकमतचाळीसगाव, जि.जळगाव, दि. ४ : पालिकेने अकरा महिन्यांपूर्वी ‘प्लॅस्टिक’ समस्येला तोंड देण्यासाठी थेट ट्रिपल ‘महाराष्ट्र केसरी’ विजय चौधरी यांच्या उपस्थितीत दंड थोपटले. प्लॅस्टिकमुक्तीची कुस्ती जिंकण्याची गर्जनाही केली होती. मात्र शहरवासीयांच्या प्रतिसादशून्य अनास्थेमुळे हा प्रयोग फसला असून, अभियानाचाच ‘कचरा’ झाल्याचे ठळक वास्तव समोर आले आहे.चाळीसगाव पालिकेत दीड वर्षांपूूर्वी सत्तांतर झाल्यानंतर बहुविध उपक्रमांचे बिगूल वाजले. ३० जुलै २०१७ रोजी चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे, आमदार उन्मेष पाटील यांच्या उपस्थित ‘प्लॅस्टिकमुक्त चाळीसगाव’ अभियानाचा श्रीगणेशाही केला. यासाठी ट्रीपल महाराष्ट्र केसरी पहिलवान विजय चौधरी यांची ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर’ म्हणून निवड केली. पालिकेमार्फत पर्यावरणस्नेही जनजागृती सुरू असली तरी नागरिकांमधून अभियानाला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. प्लॅस्टिकला पर्याय म्हणून कापडी पिशव्यांचा पर्याय समोर आला. काही प्रमाणात नागरिकांमध्ये जनजागृती झालीही. तथापि, अभियानाला गती मिळत नसल्याचे ११ महिन्यांनंतर जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर अधोरेखित झाले आहे.मुख्याधिकाऱ्यांचा स्तुत्य उपक्रमओला आणि सुका कचरा वेगळा करणे हीच एक मोठी समस्या आहे. घराघरातील डस्टबीन ओल्यासुक्या एकत्रित कचºयाने भरुन जातात. ओल्या कचºयापासून घरगुती खत निर्मिती झाल्यास ही समस्या सुटू शकते. पालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी १ फेब्रुवारी २०१८ पासून आपल्या घरी हा प्रयोग यशस्वी केला असून, ओल्या कचºयापासून तयार केलेले खत ते झाडांना देतात. यासाठी त्यांनी साध्या दोन बास्केट वापरल्या आहेत. शहरवासीयांनी ओला आणि सुका कचरा वेगळा करावा, असे त्यांचे आवाहन आहे.वर्षभरात ३० हजार रुपये दंड वसूलपालिकेने प्लॅस्टिकविरोधी मोहिमेत शहरातील प्लॅस्टिक वस्तू विक्रेत्यांवर कारवाई करताना ३० हजार रुपये दंड वसुली केली. वर्षभरात लहान-मोठ्या २५ कारवाई केल्या गेल्या.५० मायक्रोन पेक्षा कमी असणाºया प्लॅस्टिक कॅरीबॅगवर बंदी आहे. मध्यंतरी न्यायालयाने सर्वच प्लॅस्टिक वस्तू विक्रीवर टाच आणली.प्लॅस्टिक विक्रेत्यांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने त्यांना आहे ते प्लॅस्टिक नष्ट करण्याचा ३१ मार्च ते १९ जून असा तीन महिन्यांचा कालावधी दिला आहे. यामुळे सद्य:स्थितीत ५० मायक्रोनपेक्षा कमी क्षमतेच्या कॅरीबॅग बाजारात वापरल्या जात आहेत. १९ जूननंतर पालिका यावर काय कारवाई करते, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.शहरात सामाजिक काम करणाºया संघटनांनीदेखील या अभियानापासून अंतर राखले आहे. पालिकेनेही प्लॅस्टिकविरोधी घोषवाक्य स्पर्धा घेण्याव्यतिरिक्त फारसे ठोस उपक्रम राबविले नाही, असा पर्यावरणप्रेमी नागरिकांचा रोष आहे.नागरिकांनी सहकार्य करावेप्लॅस्टिकमुक्त अभियान सुरुच आहे. आरोग्य विभागामार्फत कारवाई होत आहे. नागरिकांनी सहकार्य केले पाहिजे. कापडी पिशवी वापरावी. सामाजिक संघटनांनीही यात सहभागी व्हावे.- आशालता चव्हाणनगराध्यक्षा, चाळीसगावनगरपालिकेचे अपयशप्लॅस्टिकमुक्त अभियान राबविताना पालिका अपयशी ठरली आहे. नागरी सुविधांकडे लक्ष देताना सतत कारवाईचा बडगा उगारणेही गरजेचे आहे. शहराच्या मध्यभागातून वाहणारी नदी प्लॅस्टीक कचºयामुळे प्रदूषित झाली आहे.- दिलीप घोरपडेउत्तर महाराष्ट्र प्रमुख, सह्याद्री प्रतिष्ठानआम्ही प्रबोधन कराणारप्लॅस्टिकमुक्त अभियानात आम्ही १० हजार रुपयांच्या तीन हजार कापडी पिशव्या दिल्या होत्या. यापुढेही आम्ही प्रबोधन करणार आहोत. नागरिकांनी कापडी पिशवी वापरण्याची सवय लावून घेतली पाहिजे.- धरती सचिन पवारअध्यक्षा, वसुंधरा फाऊंडेशन, चाळीसगावसर्वांना सहभागी करून घ्यावेपालिका प्रशासनाने अभियानाची व्याप्ती वाढवून सामाजिक संघटना, पक्षीय कार्यकर्ते यांनाही सहभागी करून घ्यावे. जनजागृतीसाठी मोहीमदेखील राबवावी. पालिका प्रशासनाचे प्रयत्न ठोस असले पाहिजे.- दीपक पाटील,नगरसेवक, चाळीसगाव