बाबासाहेबांची वर्षभरात दोनदा धुळ्याला भेट

By Admin | Updated: December 6, 2015 00:15 IST2015-12-06T00:15:06+5:302015-12-06T00:15:06+5:30

78 वर्षापूर्वीची गोष्ट : लांडोर बंगल्यावर होता मुक्काम

A visit to Baba Saheb twice a year | बाबासाहेबांची वर्षभरात दोनदा धुळ्याला भेट

बाबासाहेबांची वर्षभरात दोनदा धुळ्याला भेट

धुळे : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ़बाबासाहेब आंबेडकर यांनी 31 जुलै 1937 रोजी धुळे शहराला भेट दिली होती़ त्यावेळी बाबासाहेबांचे भव्य स्वागत करण्यात आले होत़े बाबासाहेबांनी लांडोर बंगल्यावर मुक्काम केला होता, त्या आठवणी आज 78 वर्षानंतरही धुळेकरांमध्ये कायम आहेत़

बाबासाहेबांचे पहाटे पाच वाजता धुळे रेल्वेस्थानकात आगमन झाले होत़े ते येणार असल्याची बातमी ऐकून बंधूभगिनी मोठय़ा संख्येने त्यांचे स्वागत करण्यासाठी एकवटल्या होत्या़ बाबासाहेबांचे आगमन होताच आंबेडकर ङिांदाबाद या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला होता़

त्यानंतर पुन्हा एकदा बाबासाहेबांचा धुळ्याला यायचा योग आला तो 17 जून 1938 ला़ त्या वेळीही बाबासाहेब रेल्वेनेच धुळ्याला आले होत़े न्यायालयाच्या कामासाठी ते धुळ्यात आले होते. त्यामुळे न्यायालय परिसरातही तुफान जनसागर एकवटला होता़ अपील संपल्यानंतर त्यांनी बार लायब्ररीला भेट दिली होती़ तेथे काकासाहेब बव्रे यांच्यातर्फे देण्यात आलेले चहापानही त्यांनी घेतले होत़े

याच दौ:यात बाबासाहेबांनी राजवाडे संशोधन मंडळासही भेट दिली होती़ त्यानंतर रात्री आठ वाजता मनपा शाळा क्रमांक पाचच्या मैदानात त्यांनी भव्य जाहीर सभा घेतली होती़ त्या वेळीदेखील बाबासाहेबांनी लांडोर बंगल्यावर मुक्काम केला होता़ त्यामुळे लांडोर बंगल्याला भेट दिल्यावर अजूनही बाबासाहेबांच्या भेटीची आठवण होते, असे मान्यवर सांगतात़ सध्या लळींग परिक्षेत्राचा पर्यटन विकास करण्याचे काम वनविभागाकडून सुरू आह़े मात्र त्याची गती संथ असल्याचे दिसून येत़े

लांडोर बंगल्याच्या त्या ऐतिहासिक स्मृतींना उजाळा देण्यासाठी आजही महापरिनिर्वाण दिनाला समाज बांधव या ठिकाणी एकवटतात़ बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करतात़ महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांच्या कार्यासह धुळे भेटीचा दाखलाही दिला जातो़

Web Title: A visit to Baba Saheb twice a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.