शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

टोमॅटोवरील विषाणूचा मानवी आरोग्याला कोणताही धोका नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 11:49 IST

अफवांचा बाजार गरम : शेतकऱ्यांसह नागरिकांनी घाबरू नये

जळगाव : जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे सोशल मीडियावर टोमॅटोवर कोरोनापेक्षाही भयंकर व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्याचा अफवा पसरविल्या जात आहेत. तसेच या व्हायरसचा परिणाम मानवी आरोग्यावर होत असल्याचेही सांगितले जात आहे. सोशल मीडियावरील हे संदेश केवळ अफवा असून, या विषाणूंचा कोणताही प्रादुर्भाव मानवी आरोग्यावर होत नाही. या केवळ अफवा असल्याचे कृषी विज्ञान केंद्राचे विशेषज्ञ प्रा.किरण जाधव यांनी म्हटले आहे.बंगळूरु येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेतंर्गत भारतीय बागवानी अनुसंधान केंद्राने महाराष्टÑातील फलटण, अकोला व इतर भागातून टॉमेटोचे नमुने घेतले होते.नमुन्यांची तपासणीअंती या टोमॅटोवर कुकुंबर मोझॅक, टोबॅको मोझॅक, ब्रक्ट नेक्रॉसीस व्हायरसचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. या व्हायरसमुळे असमान पक्वता, रंग पिवळसर पडणे, फळात पोकळपणा, रसविरहीत फळ तयार होणे अस लक्षणे तयार होत असतात. मात्र, व्हायरसबाबत सोशल मीडियावरील अनेक अफवा पसरविल्या जात आहेत. विषाणूयुक्त फळ खाल्ल्याने मानवी आरोग्य धोक्यात येते असे म्हटले जात आहे. मात्र, या केवळ अफवा असून, हे विषाणू केवळ वनस्पतीवर येणारे आहेत. याचा कधिही मानवी आरोग्याला धोका राहत नाही असेही प्रा.किरण जाधव यांनी काढलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.टरबूज कारपेट किंवा इंजेक्शन देऊन पिकवले जात नाहीटोमॅटोप्रमाणेच टरबूजबाबतदेखील अफवा पसरविल्या जात आहे. नागपूर येथे टरबूज फुटल्यामुळे अफवांचा बाजार जोरात आहे. उन्हाळ्यात टरबूजच्या गराचे तापमान वाढलेले असते व पक्वतेच्या पुढे काही वायू फळांमध्ये तयार होत असतात. यामुळेत्या फळातील गर बाहेर पडत असते. टरबूज हे फळ कारपेट किंवा इंजेक्शन विनाच पिकत असते. त्यामुळे हे फळ आरोग्यदायी आहे. त्यामुळे या फळाबाबतही अफवा पसरविल्या जात आहे. या अफवांमुळे शेतकऱ्यांचेच नुकसान अधिक होत असल्याचे प्रा.किरण जाधव यांनी म्हटले आहे.टोमॅटोवर विषाणूंचा प्रादुर्भाव वाढला याबाबतचे काही संदेश व्हायरल होत आहेत. मात्र,त्या अफवाच आहे. दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोच्या आवकवर कोणताही परिणाम झालेला नाही.-कैलास चौधरी, सभापती, बाजार समिती, जळगावटोमॅटोवर विषाणूंचा प्रादुर्भाव वाढला असला तरी त्याचा परिणाम मानवी आरोग्यावर होत नाही, हे बंगळूरु येथील संस्थेनेही जाहीर केले आहे. मात्र, अफवांमुळे नागरिकांमध्ये ती भीती असल्याने टोमॅटो लागवडीवर त्याचा परिणाम होऊ शकतो.-नीलेश ईश्वर पाटील, शेतकरी

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव