शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वरुणराजाच्या रुसव्याने पुन्हा भाववाढीचा तडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 12:59 IST

कमी पावसामुळे रब्बी हंगामावरही परिणाम होणार असण्याची चिन्हे

विजयकुमार सैतवालजळगाव : जिल्ह्यात यंदाही पावसाने सत्तरीदेखील न गाठल्याने पाणीटंचाईचे सावट असताना कृषी उत्पादनांवरही त्याचा परिणाम होऊन बाजारपेठेमध्ये भाववाढीस सुरुवात झाली आहे. कमी पावसामुळे कडधान्याच्या उत्पादनावर परिणाम होऊन डाळींच्या भावात तब्बल २०० ते ४०० रुपये प्रती क्विंटलने वाढ झाली आहे.यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने जळगाव जिल्ह्यात उडीद व मुगाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. उडीद-मुगाच्या शेंगांमध्ये दाणा तयार होण्याचा प्रक्रियेदरम्यानच पावसाने पाठ फिरविली होती. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा जळगावच्या बाजारात येणाऱ्या आवकमध्ये मोठी घट दिसून येत आहे.गेल्या आठवड्यात मूग डाळींचा दर ६,४०० ते ६,६०० रुपये प्रतिक्किंटल इतका होता. सध्या मूग डाळींचा दर दोनशे रुपयांनी वाढला असून, ६,६०० तो ७,००० रुपये इतका झाला आहे. उडदाचा दर ५,४०० रुपये प्रतिक्विंटल इतका आहे. भाव वाढल्याने शेतकरी माल बाजारात आणतील, अशी शक्यता होती. मात्र, भाव वाढले असले तरी ज्या प्रमाणात मालाची आवक वाढायला हवी होती, तितकी आवक बाजारात दिसून येत नाही. उडीद-मुगामधील ओलाव्याचे प्रमाणदेखील कमी झाले आहे. डाळींचा दर्जादेखील चांगला असल्याने दर वाढले आहेत.बाजार समितीमध्येदेखील आवक घटली असून उडदाची आवक २ हजार क्विंटल तर मुगाची आवक ७०० क्विंटल इतकी आहे. पितृपक्ष संपल्यानंतर आता नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली व पुढे दिवाळी आहे. त्यादरम्यान, डाळींच्या दरात वाढ झाल्याने शेतकºयाला दिलासा मिळाला आहे. तूर डाळीच्या दरातदेखील प्रतिक्विंटल १५० रुपयांची, तर चना डाळीतही २०० रुपयांची वाढ झाल्याची माहिती दाणा बाजार असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया यांनी दिली आहे. डाळींव्यतिरीक्त गहू व तांदळाचे दर स्थिर आहेत. मात्र, दिवाळीपर्यंत मागणीत मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याने दरातदेखील वाढ होण्याची शक्यता आहे.सध्या बाजारात सोयाबीनची आवकदेखील कमी आहे. आॅक्टोबर महिन्यात सोयाबीन काढण्यास सुरुवात होते. मात्र, अद्याप बाजारात सोयाबीनची आवकदेखील वाढलेली नाही. सध्या २,८०० ते ३,००० रुपये प्रतिक्विंटल इतके सोयाबीनचे भाव आहेत. त्यामुळे भावात वाढ होईल या अपेक्षेने शेतकरी आपला माल बाजारात आणत नसल्याचे चित्र आहे. ज्या शेतकºयांना पैशांची गरज आहे असेच शेतकरी आपला माल बाजारात आणून विकून मोकळे होत आहेत.शासकीय उडीद-मूगखरेदी केंद्र सुरू करण्यास शासनाने मंजुरी दिल्यानंतरदेखील खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. अनेक शेतकरी हे केंद्र सुरू होईल याच अपेक्षेने आपला माल बाजारात आणत नसल्याचेदेखील दिसून येत आहे. त्यामुळे हंगाम संपल्यानंतर खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील का? असा सवाल केला जात आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत गव्हाच्या भावात ५० रुपये प्रतिक्विंटलने वाढ झाली आहे. १४७ गहू २,४०० ते २,५०० रुपयांवरून २,४५० ते २,५५० रुपये प्रतिक्विंटल, लोकवन गव्हाचे भाव २,३५० ते २,४५० रुपये, शरबती गहू २,५५० ते २,६५० रुपये आणि चंदोसीचे भाव ३,६५० ते ३,८५० रुपयांवर पोहोचले आहेत.त्यात आता कमी पावसामुळे रब्बी हंगामावरही परिणाम होणार असण्याची चिन्हे असून त्यापूर्वीच हरभरा डाळीचेही भाव वाढल्याने ग्राहकांची चिंताही वाढली आहे.

टॅग्स :MarketबाजारJalgaonजळगाव