शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
3
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
4
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
5
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
6
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
7
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
8
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
9
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
10
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
11
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
12
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
13
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
14
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
15
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
16
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
17
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
18
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
19
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
20
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!

वरुणराजाच्या रुसव्याने पुन्हा भाववाढीचा तडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 12:59 IST

कमी पावसामुळे रब्बी हंगामावरही परिणाम होणार असण्याची चिन्हे

विजयकुमार सैतवालजळगाव : जिल्ह्यात यंदाही पावसाने सत्तरीदेखील न गाठल्याने पाणीटंचाईचे सावट असताना कृषी उत्पादनांवरही त्याचा परिणाम होऊन बाजारपेठेमध्ये भाववाढीस सुरुवात झाली आहे. कमी पावसामुळे कडधान्याच्या उत्पादनावर परिणाम होऊन डाळींच्या भावात तब्बल २०० ते ४०० रुपये प्रती क्विंटलने वाढ झाली आहे.यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने जळगाव जिल्ह्यात उडीद व मुगाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. उडीद-मुगाच्या शेंगांमध्ये दाणा तयार होण्याचा प्रक्रियेदरम्यानच पावसाने पाठ फिरविली होती. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा जळगावच्या बाजारात येणाऱ्या आवकमध्ये मोठी घट दिसून येत आहे.गेल्या आठवड्यात मूग डाळींचा दर ६,४०० ते ६,६०० रुपये प्रतिक्किंटल इतका होता. सध्या मूग डाळींचा दर दोनशे रुपयांनी वाढला असून, ६,६०० तो ७,००० रुपये इतका झाला आहे. उडदाचा दर ५,४०० रुपये प्रतिक्विंटल इतका आहे. भाव वाढल्याने शेतकरी माल बाजारात आणतील, अशी शक्यता होती. मात्र, भाव वाढले असले तरी ज्या प्रमाणात मालाची आवक वाढायला हवी होती, तितकी आवक बाजारात दिसून येत नाही. उडीद-मुगामधील ओलाव्याचे प्रमाणदेखील कमी झाले आहे. डाळींचा दर्जादेखील चांगला असल्याने दर वाढले आहेत.बाजार समितीमध्येदेखील आवक घटली असून उडदाची आवक २ हजार क्विंटल तर मुगाची आवक ७०० क्विंटल इतकी आहे. पितृपक्ष संपल्यानंतर आता नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली व पुढे दिवाळी आहे. त्यादरम्यान, डाळींच्या दरात वाढ झाल्याने शेतकºयाला दिलासा मिळाला आहे. तूर डाळीच्या दरातदेखील प्रतिक्विंटल १५० रुपयांची, तर चना डाळीतही २०० रुपयांची वाढ झाल्याची माहिती दाणा बाजार असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया यांनी दिली आहे. डाळींव्यतिरीक्त गहू व तांदळाचे दर स्थिर आहेत. मात्र, दिवाळीपर्यंत मागणीत मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याने दरातदेखील वाढ होण्याची शक्यता आहे.सध्या बाजारात सोयाबीनची आवकदेखील कमी आहे. आॅक्टोबर महिन्यात सोयाबीन काढण्यास सुरुवात होते. मात्र, अद्याप बाजारात सोयाबीनची आवकदेखील वाढलेली नाही. सध्या २,८०० ते ३,००० रुपये प्रतिक्विंटल इतके सोयाबीनचे भाव आहेत. त्यामुळे भावात वाढ होईल या अपेक्षेने शेतकरी आपला माल बाजारात आणत नसल्याचे चित्र आहे. ज्या शेतकºयांना पैशांची गरज आहे असेच शेतकरी आपला माल बाजारात आणून विकून मोकळे होत आहेत.शासकीय उडीद-मूगखरेदी केंद्र सुरू करण्यास शासनाने मंजुरी दिल्यानंतरदेखील खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. अनेक शेतकरी हे केंद्र सुरू होईल याच अपेक्षेने आपला माल बाजारात आणत नसल्याचेदेखील दिसून येत आहे. त्यामुळे हंगाम संपल्यानंतर खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील का? असा सवाल केला जात आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत गव्हाच्या भावात ५० रुपये प्रतिक्विंटलने वाढ झाली आहे. १४७ गहू २,४०० ते २,५०० रुपयांवरून २,४५० ते २,५५० रुपये प्रतिक्विंटल, लोकवन गव्हाचे भाव २,३५० ते २,४५० रुपये, शरबती गहू २,५५० ते २,६५० रुपये आणि चंदोसीचे भाव ३,६५० ते ३,८५० रुपयांवर पोहोचले आहेत.त्यात आता कमी पावसामुळे रब्बी हंगामावरही परिणाम होणार असण्याची चिन्हे असून त्यापूर्वीच हरभरा डाळीचेही भाव वाढल्याने ग्राहकांची चिंताही वाढली आहे.

टॅग्स :MarketबाजारJalgaonजळगाव