शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पदोन्नतीच्या निकषात अनपेक्षित बदल, या सरकारी कर्मचाऱ्यांना बसला फटका

By अमित महाबळ | Updated: September 20, 2022 16:13 IST

राज्य सरकारने हिवताप कर्मचाऱ्यांचे पदोन्नतीचे निकष अनपेक्षितपणे बदलून शैक्षणिक पात्रतेत वाढ केली आहे. त्यानुसार प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी पदासाठी बीएसएस्सी, डीएमएलटी लागणार आहे. मात्र ही पात्रता असलेले कर्मचारी नाशिक महसूल विभागातील पाच जिल्ह्यात नाहीत.

जळगाव : राज्य सरकारने पदोन्नतीच्या निकषात अनपेक्षित बदल केल्याचा मोठा फटका हिवताप कर्मचाऱ्यांना बसला असून, त्यामुळे सप्टेंबर २०२१ नंतर एकाही जुन्या कर्मचाऱ्याला पदोन्नती मिळालेली नाही. या निर्णयात बदल व्हावा म्हणून कर्मचारी पाठपुरावा करत असताना त्यांचे पगार काढण्याचे अधिकार अचानकपणे जिल्हा परिषदेतील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आले आहेत. हे दोन्ही निर्णय अन्यायकारक असून, ते मागे घेण्याची मागणी कर्मचारी करत आहेत.  

राज्य सरकारने हिवताप कर्मचाऱ्यांचे पदोन्नतीचे निकष अनपेक्षितपणे बदलून शैक्षणिक पात्रतेत वाढ केली आहे. त्यानुसार प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी पदासाठी बीएसएस्सी, डीएमएलटी लागणार आहे. मात्र ही पात्रता असलेले कर्मचारी नाशिक महसूल विभागातील पाच जिल्ह्यात नाहीत. याआधीची पात्रता बीएसएस्सी होती. त्याआधारे अनेक कर्मचारी विभागात भरती झाले असून, त्यांनी पदोन्नती घेतली आहे. आरोग्य सेवक पदाची शैक्षणिक पात्रता दहावी पास होती, ती आता बारावी विज्ञान करण्यात आली आहे.  जुन्या निकषांनुसार भरती झाले, पदोन्नतीही घेतली -राज्य सरकारने शैक्षणिक पात्रतेत केलेल्या बदलांमुळे सप्टेंबर २०२१ पासून ते आजपर्यंत राज्यात एकाही हिवताप कर्मचाऱ्याला पदोन्नती मिळालेली नाही. हे सगळे कर्मचारी सेवेत रुजू होऊन २० ते २५ वर्षे झालेली आहेत. सरकारने हा निर्णय मागे घ्यावा म्हणून कर्मचारी संघटना पाठपुरावा करत असताना हिवताप विभागातील कर्मचाऱ्यांचे वेतन काढण्याचे जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांचे अधिकार कमी करून ते जिल्हा परिषदेतील जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे वर्ग करण्यात आले आहेत. पूर्वीपासून जिल्हा परिषद आणि हिवताप निर्मूलन विभाग या दोन्ही स्वतंत्र आस्थापना असल्याचा दावा कर्मचाऱ्यांनी केला आहे. 

ही आहे मागणी -हिवताप कर्मचाऱ्यांची नियुक्ती, पदोन्नती व इतर सेवाविषयक अधिकार सहाय्यक संचालक, हिवताप नाशिक विभाग व त्यांच्या अधिनस्त जिल्हा हिवताप अधिकारी यांच्याकडे आहेत. त्यामुळे वेतन व भत्ते यांचे अधिकार पूर्ववत जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांकडेच असावेत, पदोन्नतीचे निकष पूर्वी होते तेच ठेवावेत अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. शासनाच्या दोन्ही निर्णयाला महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेचा विरोध आहे. या संदर्भातील निवेदन त्यांनी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांना दिले. त्यावर लवकरात लवकर निर्णय होण्याची त्यांना अपेक्षा आहे.

टॅग्स :JalgaonजळगावEmployeeकर्मचारीGovernmentसरकारzpजिल्हा परिषद