शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
5
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
8
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
9
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
10
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
11
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
12
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
13
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
14
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
15
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
16
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
17
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
18
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
19
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
20
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मागच्या बाकावर बसणाऱ्या विद्यार्थ्यांची भाषा समजून घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 22:10 IST

रिफ्रेशर कोर्सचे उद्घाटन : नाटककार जयंत पवार यांचे प्रतिपादन

जळगाव- शिक्षक हा समाजातील अत्यंत जबाबदार घटक असून ओपिनियन मेकरच्या भूमिकेत असलेल्या भाषा विषयाच्या शिक्षकांनी कष्टकरी वर्गाच्या रोखठोक व रांगडी भाषेचे पदर स्वत: आधी समजवून घ्यावे. तरच ते विद्यार्थ्यांच्या मनातील न्यूनगंड दूर करू शकतील असे प्रतिपादन नाटककार जयंत पवार यांनी केले.कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यासप्रशाळा व संशोधन केंद्राच्यावतीने सोमवार पासून प्राध्यापकांच्या रिफ्रेशर कोर्सला प्रारंभ झाला. दोन आठवड्यांच्या या कोर्सच्या उदघाटन प्रसंगी बीज भाषण करताना ते बोलत होते़ यावेळी कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. तर संचालक प्रा.म.सु.पगारे अध्यक्षस्थानी होते.विद्यार्थी-शिक्षकांमधील संवाद वाढवाजयंत पवार म्हणाले की, साहित्य आणि भाषा शिकविणे या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. भाषा शिकविणे हा शिक्षकांनी आनंदाचा विषय समजायला हवा. शिक्षकांनी कष्टकरी व श्रमिक वर्गाच्या भाषांचे पदर समजून घ्यावेत. वर्गात मागच्या बाकावर बसणाºया मुलांची भाषा शिक्षकांनी समजून घ्यावी. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर कुलगुरु प्रा.पाटील आपल्या भाषणात म्हणाले की, अलीकडच्या काळात शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील संवाद संपुष्टात आला आहे. तो वाढविणे गरजेचे आहे. डॉ. आशुतोष पाटील यांनी प्रास्ताविक केले. नेत्रा उपाध्ये व पुजा निचोले यांनी सुत्रसंचालन केले. प्रा.प्रिती सोनी यांनी आभार मानले.----------मराठी नाटक हे हौशी कलावंतांनी जिवंत ठेवलंयमराठी नाटक हे हौशी कलावंतांनी जिवंत ठेवलं असून आजच्या जागतिकीकरणाच्या काळात नाटक बदले आहे. ही कला प्रत्येक भागात, प्रदेशात ही वेगवेगळी आहे तिथल्या मातीशी संबंधित आहे, असे मत नाटककार जयंत पवार यांनी परिवर्तनतर्फे आयोजित माध्यामांच्या गर्दीत रंगभूमीचं अस्तित्व या चर्चासत्रात व्यक्त केले़यावेळी कार्यक्रमात जेष्ठ कवी अशोक कोतवाल, किसन पाटील, रंगकर्मी व परिवर्तनचे अध्यक्ष शंभू पाटील, चित्रकार राजू बाविस्कर, मंजुषा भिडे, नारायण बाविस्कर, होरिलसिंग राजपूत, वसंच गायकवाड, डॉ किशोर पवार, हर्षल पाटील, कुणाल चौधरी, हर्षदा कोल्हटकर आदींची उपस्थिती होती़बिनबियांच्या पिकांसारखी कलेची अवस्थाजयंत पवार पूढे म्हणाले की, आपला जागतिकीकरणाशी संबंध आला आणि आपल्या कलेतील सत्व गेले़ बिनबियांच्या पिकांसारखी आपल्या कलेची अवस्था होत आहे. व्यवसायिक रंगभूमी ही आपली खरी रंगभूमी नाही तर खरी रंगभूमी वेगळी आहे. आपल्या प्रदेशातील नाटकं आपण शोधली पाहिजेत. मुख्य धारेचं नाटक हे वेगळे असून ते सत्व तत्त्व शोधणं गरजेचं आहे. प्रत्येक काळाचा एक कलाप्रकार असतो आजच्या समाजाचं विखंडित होत जाणे हे प्रमुख कारण आहे़ त्यामुळे प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व विखंडित झाल्याने सलगता अनुभवण्याची क्षमता प्रत्येकाची जवळपास संपत आली आहे. त्यामुळे आपल्या कला काळानुरूप बदलण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले़

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव