शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
4
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
5
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
7
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
8
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
9
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
10
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
11
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
12
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
13
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
14
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
15
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
16
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
17
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
18
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
19
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
20
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा

संभाषणातून भुरळ घालत कारद्वारे अपहरण केलेले दोन्ही युवक इगतपुरी रेल्वे स्थानकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 22:18 IST

शिक्षणासाठी ये- जा करणार्‍या दोन युवकांना छोरीया मार्केटच्या परिसरात कारने आलेल्या अज्ञात इसमांनी कुणाचा तरी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने संभाषणातून  भुरळ घालत चारचाकी गाडीत बसवून नेले.

ठळक मुद्देरावेर शहरासह ग्रामीण भागात खळबळ.इगतपुरी पोलीसांनी दिली सुखरूप ताब्यात.

रावेर : तालुक्यातील पाडळे बु ।। व पातोंडी येथील कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता ११ वीच्या शिक्षणासाठी ये- जा करणार्‍या दोन युवकांना छोरीया मार्केटच्या परिसरात कारने आलेल्या अज्ञात इसमांनी कुणाचा तरी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने संभाषणातून  भुरळ घालत चारचाकी गाडीत बसवून नेले. हे अपह्रत दोन्ही युवक शुध्दीवर येताच रेल्वेमधून इगतपुरी स्थानकावर उतरून त्यांनी बंदोबस्तावर असलेल्या रेल्वे पोलिसांशी संपर्क साधल्याने पोलीसांनी दुसर्‍या दिवशी त्यांची ओळख पटवून पालकांच्या स्वाधीन करण्यात आल्याची घटना गुरुवारी घडली. या घटनेने शहरासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, तालुक्यातील पाडळे बु ।। व पातोंडी गावातील दोन युवक येथील एका कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता ११ वी विज्ञान शाखेत शिकत असल्याने एक दिवसाआड सुरू असलेल्या तासिकांसाठी गुरूवारी सकाळी शहरात दाखल झाले. काही खासगी कामानिमित्त ते दोघंही मित्र शहरातील छोरीया मार्केट परिसरात पायी फिरत असताना चारचाकी कारमधून आलेल्या अज्ञात इसमांनी त्यांना कुणाचा तरी पत्ता विचारला. तेवढ्याचं संभाषणातून त्यांना भुरळ पडल्याने चारचाकी कारमधून गेलेले ही दोन्ही १७ ते १८ वर्ष वयोगटातील मुले थेट रेल्वेमधून इगतपुरी रेल्वे स्थानकावर सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पोहचल्यानंतर भानावर आले. स्मृतिभ्रंश झालेल्या या दोन्ही मित्रांना आपण चारचाकी कारमध्ये बसवल्यानंतर रेल्वे एक्स्प्रेसने इगतपुरी रेल्वे स्थानकावर कशी पोहचत आहोत? याचा धक्का बसल्याने त्यांनी मध्य रेल्वेच्या इगतपुरी स्थानकातील रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला. 

दरम्यान, दररोज दुपारी तीन वाजेपर्यंत पोहचणारी मुलं सायंकाळी घरी न पोहचल्याने पालक इकडे कासावीस झाले. पालकांनी त्यांच्या मित्रांकडे व नातलगांकडे चौकशी केली असता कुणीही काहीही माहिती देत नसल्याने पालक चिंतातूर झाले होते. त्या दरम्यान इगतपुरी रेल्वे पोलिसांनी त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्याकडून पालकांचे भ्रमणध्वनी क्रमांक प्राप्त करीत संपर्क साधल्याने संबंधित पालकांचा जीव भांड्यात पडला. संबंधित युवकांच्या पालकांनी मुंबईस्थित असलेल्या आपल्या आप्तेष्टांना कळवून इगतपुरी रेल्वे पोलिसांत रवाना केले होते. इगतपुरी पोलीसांनी रात्री दोन्ही युवकांची भोजन व झोपण्याची व्यवस्था करून त्यांना धीर दिला.

 शुक्रवारी सकाळी दोन्ही मित्र असलेल्या युवकांचे मुंबईतील आप्तेष्ट त्यांना ताब्यात घेण्यासाठी धडकले असता प्रथमदर्शनी पोलीसांनी त्यांच्या ताब्यात देण्यास नकार दिला. मात्र, संबंधित आप्तेष्टांनी युवकांच्या पालकांशी व्हिडिओ कॉलवर त्यांची व मुलांचीही ओळख पटवून दिल्याने, त्यांचे लेखी जबाब नोंदवून दोन्ही अपह्रत मुलांना त्यांच्या ताब्यात देवून सुटका केली. 

घरून स्वतंत्र वाहनाने गेलेल्या पालकांनी त्यांच्या आप्तेष्टांकडून नाशिक येथून दोन्ही मुलांना ताब्यात घेऊन सुटकेचा नि:श्वास सोडल्याची घटना घडली. या घटनेने शहरासह ग्रामीण भागातील शैक्षणिक वर्तुळात व शिक्षक, पालक व विद्यार्थीवर्गात कमालीची खळबळ उडाली असून दहशत निर्माण झाली आहे. तत्संबंधी रावेर पोलीसात मात्र कुठलीही नोंद नसल्याचे सुत्रांनी सांगितले.  

टॅग्स :JalgaonजळगावRaverरावेरCrime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरण