शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

संभाषणातून भुरळ घालत कारद्वारे अपहरण केलेले दोन्ही युवक इगतपुरी रेल्वे स्थानकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 22:18 IST

शिक्षणासाठी ये- जा करणार्‍या दोन युवकांना छोरीया मार्केटच्या परिसरात कारने आलेल्या अज्ञात इसमांनी कुणाचा तरी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने संभाषणातून  भुरळ घालत चारचाकी गाडीत बसवून नेले.

ठळक मुद्देरावेर शहरासह ग्रामीण भागात खळबळ.इगतपुरी पोलीसांनी दिली सुखरूप ताब्यात.

रावेर : तालुक्यातील पाडळे बु ।। व पातोंडी येथील कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता ११ वीच्या शिक्षणासाठी ये- जा करणार्‍या दोन युवकांना छोरीया मार्केटच्या परिसरात कारने आलेल्या अज्ञात इसमांनी कुणाचा तरी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने संभाषणातून  भुरळ घालत चारचाकी गाडीत बसवून नेले. हे अपह्रत दोन्ही युवक शुध्दीवर येताच रेल्वेमधून इगतपुरी स्थानकावर उतरून त्यांनी बंदोबस्तावर असलेल्या रेल्वे पोलिसांशी संपर्क साधल्याने पोलीसांनी दुसर्‍या दिवशी त्यांची ओळख पटवून पालकांच्या स्वाधीन करण्यात आल्याची घटना गुरुवारी घडली. या घटनेने शहरासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, तालुक्यातील पाडळे बु ।। व पातोंडी गावातील दोन युवक येथील एका कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता ११ वी विज्ञान शाखेत शिकत असल्याने एक दिवसाआड सुरू असलेल्या तासिकांसाठी गुरूवारी सकाळी शहरात दाखल झाले. काही खासगी कामानिमित्त ते दोघंही मित्र शहरातील छोरीया मार्केट परिसरात पायी फिरत असताना चारचाकी कारमधून आलेल्या अज्ञात इसमांनी त्यांना कुणाचा तरी पत्ता विचारला. तेवढ्याचं संभाषणातून त्यांना भुरळ पडल्याने चारचाकी कारमधून गेलेले ही दोन्ही १७ ते १८ वर्ष वयोगटातील मुले थेट रेल्वेमधून इगतपुरी रेल्वे स्थानकावर सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पोहचल्यानंतर भानावर आले. स्मृतिभ्रंश झालेल्या या दोन्ही मित्रांना आपण चारचाकी कारमध्ये बसवल्यानंतर रेल्वे एक्स्प्रेसने इगतपुरी रेल्वे स्थानकावर कशी पोहचत आहोत? याचा धक्का बसल्याने त्यांनी मध्य रेल्वेच्या इगतपुरी स्थानकातील रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला. 

दरम्यान, दररोज दुपारी तीन वाजेपर्यंत पोहचणारी मुलं सायंकाळी घरी न पोहचल्याने पालक इकडे कासावीस झाले. पालकांनी त्यांच्या मित्रांकडे व नातलगांकडे चौकशी केली असता कुणीही काहीही माहिती देत नसल्याने पालक चिंतातूर झाले होते. त्या दरम्यान इगतपुरी रेल्वे पोलिसांनी त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्याकडून पालकांचे भ्रमणध्वनी क्रमांक प्राप्त करीत संपर्क साधल्याने संबंधित पालकांचा जीव भांड्यात पडला. संबंधित युवकांच्या पालकांनी मुंबईस्थित असलेल्या आपल्या आप्तेष्टांना कळवून इगतपुरी रेल्वे पोलिसांत रवाना केले होते. इगतपुरी पोलीसांनी रात्री दोन्ही युवकांची भोजन व झोपण्याची व्यवस्था करून त्यांना धीर दिला.

 शुक्रवारी सकाळी दोन्ही मित्र असलेल्या युवकांचे मुंबईतील आप्तेष्ट त्यांना ताब्यात घेण्यासाठी धडकले असता प्रथमदर्शनी पोलीसांनी त्यांच्या ताब्यात देण्यास नकार दिला. मात्र, संबंधित आप्तेष्टांनी युवकांच्या पालकांशी व्हिडिओ कॉलवर त्यांची व मुलांचीही ओळख पटवून दिल्याने, त्यांचे लेखी जबाब नोंदवून दोन्ही अपह्रत मुलांना त्यांच्या ताब्यात देवून सुटका केली. 

घरून स्वतंत्र वाहनाने गेलेल्या पालकांनी त्यांच्या आप्तेष्टांकडून नाशिक येथून दोन्ही मुलांना ताब्यात घेऊन सुटकेचा नि:श्वास सोडल्याची घटना घडली. या घटनेने शहरासह ग्रामीण भागातील शैक्षणिक वर्तुळात व शिक्षक, पालक व विद्यार्थीवर्गात कमालीची खळबळ उडाली असून दहशत निर्माण झाली आहे. तत्संबंधी रावेर पोलीसात मात्र कुठलीही नोंद नसल्याचे सुत्रांनी सांगितले.  

टॅग्स :JalgaonजळगावRaverरावेरCrime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरण