मध्यरात्री पाळधीतून चोरली दुचाकी; दुपारी दोघांना भास्कर मार्केटमधून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:17 IST2021-05-26T04:17:05+5:302021-05-26T04:17:05+5:30
जळगाव : पाळधीतील साईबाबा मंदिर परिसरातून सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी दुचाकी चोरली. या चोरट्यांना मंगळवारी दुपारी भास्कर मार्केट येथून अटक ...

मध्यरात्री पाळधीतून चोरली दुचाकी; दुपारी दोघांना भास्कर मार्केटमधून अटक
जळगाव : पाळधीतील साईबाबा मंदिर परिसरातून सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी दुचाकी चोरली. या चोरट्यांना मंगळवारी दुपारी भास्कर मार्केट येथून अटक करण्यात जिल्हापेठ पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून चोरीला गेलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.
पाळधीतील सोनार गल्लीत समाधान ज्ञानेश्वर पाटीले हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. सोमवारी मध्यरात्री पाटील यांची दुचाकी (एमएच.१९.सीडी.३८२८) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. हा प्रकार मंगळवारी सकाळी पाटील यांच्या लक्षात येताच, त्यांनी पोलिसांत तक्रार केली. दरम्यान, दुपारी दोन तरुण विना क्रमांकाची दुचाकी घेऊन भास्कर मार्केट परिसरात वावरत असल्याची माहिती जिल्हा पेठ पोलिसांना मिळाली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली व चौकशीअंती त्यांनी पाळधी येथून दुचाकी चोरी केली असल्याची पोलिसांना कबुली दिली. गोविंदा डिगंबर जाधव व नितीन गजानन माळी (दोन्ही, रा. पाळधी) असे चोरट्यांनी त्यांची नावे सांगितली. दोघांकडून चोरीला गेलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली असून, पुढील कार्यवाहीसाठी दोघांना धरणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
यांनी केली कारवाई
जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली शेखर जोशी, तुषार जावरे, रामेश्वर ताटे, विनोद पाटील, भरत बारी, प्रवीण भोसले, आदींनी ही कारवाई केली.