शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
4
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
5
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
6
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
7
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
8
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
9
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
10
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

शिवसेनेला पाठिंब्याबाबत काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 17:49 IST

प्रदेश प्रवक्त्यांचे संकेत: पत्रकार परिषदेत भाजपच्या धोरणांवर टीका

जळगाव : काँग्रेसची विकासकामे, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचे योगदान याबाबत शिवसेनेने वारंवार प्रशंसा केली आहे़ भाजप व सेनेत हा मुलभूत फरक असून पाठिंब्याबाबतचा प्रस्ताव सेनेकडून आल्यास विचार होऊ शकतो, असे संकेत काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी दिले. मात्र, पाठिंब्याबाबत पक्षात दोन मतप्रवाह असल्याचेही ते म्हणाले.शुक्रवारी दुपारी काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते़ जनतेने आम्हाला सक्षम विरोधी म्हणून निवडून दिलेले आहेत ती भूमिका आम्ही पार पाडू, असेही ते म्हणाले़ नोटबंदीचा निर्णय अत्यंत दुर्देवी असून गेल्या तीन वर्षांपासून या निर्णयाची पुण्यतिथी काँग्रेस करीत आहे़ अर्थव्यवस्थेची दयनीय स्थिती झालेली आहे. भूक बळींची संख्या वाढली़ बेरोजगारी ४५ टक्क्यांनी वाढली, बँक घोटाळ्यांमध्ये पाच वर्षात ७३ टक्क््यांनी वाढ झाली़ या घटनांमुळे सरकारच्या धोरणांविषयी शंका निर्माण झाली, कुठे चालला आहे देश माझा अशी परिस्थिती निर्माण झाली व त्याचा परिणाम म्हणून भाजपच्या जागा घटल्या़ कुठलाही निर्णय नसताना काही घटना नसताना भारतीय अर्थव्यवस्थेची ५ ट्रीलीयनकडे वाटचाल हे विधान हास्यास्पद आहे़ सरकारी कंपन्यांचे खच्चीकरण करण्यात आल्याचा आरोप तिवारी यांनी केला़खान्देशला फायद्याचा ठरणार नदी जोड प्रकल्प ३१ जुलै २०१९ मध्ये भाजप सरकारने रद्द केल्याचे ते म्हणाले.अमित शहा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दबाबामुळे फडणवीस सरकारने हा करार रद्द केला व यामुळे जळगावचे मोठे नुकसान झाल्याचे तिवारी यांनी सांगितले़दरम्यान, जनता अजुनही भाजप सेनेकडून आशावादी होती म्हणून त्यांना संधी दिली आहे़ मात्र, आम्हाला सक्षम विरोधीपक्ष म्हणून कौल मिळाला असल्याचेही त्यांनी सांगितले़ नोटबंदीच्या मुद्दयावरून तिवारी यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले़ खासगी कंपन्यांना रेड कार्पेट घालून द्यायचा या सरकारचा मूळ उद्देश असल्याचे ते म्हणाले़काँग्रेसच्या जिल्ह्यातील कमी जागांबाबत बोलताना जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़ संदीप पाटील यांनी सांगितले की, अनेक ठिकाणी राष्ट्रवादीला अत्यंत कमी जागा देण्यात आल्या होत्या़ नांदेड मध्ये कॉंग्रेस आठ तर राष्ट्रवादी केवळ एका जागेवर लढली़ त्यामुळे जागा वाटप हा वरिष्ठांचा निर्णय असल्याचे अ‍ॅड़ संदीप पाटील यांनी स्पष्ट केले़ यावेळी श्याम तायडे, श्रीधर चौधरी आदी उपस्थित होते़पाठिंब्याबाबत दोन मतप्रवाहशिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह आहेत़ भाजप घटनात्मक चौकटी मोडायला निघाला आहे़ त्यामानाने शिवसेना पक्ष आक्रमक असला तरी कुणाचा द्वेष करणारा नाही, त्यांनी वारंवार काँग्रेसच्या विकासकामांची प्रशंसा केली आहे़ त्यामुळे शिवसेनेला सत्तास्थापनेत पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसमध्ये हो व नाही असे दोन मतप्रवाह आहेत, सोनिया गांधी यांच्याकडून कुठलाही निर्णय याबाबत झालेला नाही़ शिवाय शिवसेनेकडून तसा कुठलाही प्रस्ताव काँग्रेसकडे आलेला नाही, असे तिवारी यांनी यावेळी स्पष्ट केले़

टॅग्स :congressकाँग्रेसJalgaonजळगाव