शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

शिवसेनेला पाठिंब्याबाबत काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 17:49 IST

प्रदेश प्रवक्त्यांचे संकेत: पत्रकार परिषदेत भाजपच्या धोरणांवर टीका

जळगाव : काँग्रेसची विकासकामे, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचे योगदान याबाबत शिवसेनेने वारंवार प्रशंसा केली आहे़ भाजप व सेनेत हा मुलभूत फरक असून पाठिंब्याबाबतचा प्रस्ताव सेनेकडून आल्यास विचार होऊ शकतो, असे संकेत काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी दिले. मात्र, पाठिंब्याबाबत पक्षात दोन मतप्रवाह असल्याचेही ते म्हणाले.शुक्रवारी दुपारी काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते़ जनतेने आम्हाला सक्षम विरोधी म्हणून निवडून दिलेले आहेत ती भूमिका आम्ही पार पाडू, असेही ते म्हणाले़ नोटबंदीचा निर्णय अत्यंत दुर्देवी असून गेल्या तीन वर्षांपासून या निर्णयाची पुण्यतिथी काँग्रेस करीत आहे़ अर्थव्यवस्थेची दयनीय स्थिती झालेली आहे. भूक बळींची संख्या वाढली़ बेरोजगारी ४५ टक्क्यांनी वाढली, बँक घोटाळ्यांमध्ये पाच वर्षात ७३ टक्क््यांनी वाढ झाली़ या घटनांमुळे सरकारच्या धोरणांविषयी शंका निर्माण झाली, कुठे चालला आहे देश माझा अशी परिस्थिती निर्माण झाली व त्याचा परिणाम म्हणून भाजपच्या जागा घटल्या़ कुठलाही निर्णय नसताना काही घटना नसताना भारतीय अर्थव्यवस्थेची ५ ट्रीलीयनकडे वाटचाल हे विधान हास्यास्पद आहे़ सरकारी कंपन्यांचे खच्चीकरण करण्यात आल्याचा आरोप तिवारी यांनी केला़खान्देशला फायद्याचा ठरणार नदी जोड प्रकल्प ३१ जुलै २०१९ मध्ये भाजप सरकारने रद्द केल्याचे ते म्हणाले.अमित शहा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दबाबामुळे फडणवीस सरकारने हा करार रद्द केला व यामुळे जळगावचे मोठे नुकसान झाल्याचे तिवारी यांनी सांगितले़दरम्यान, जनता अजुनही भाजप सेनेकडून आशावादी होती म्हणून त्यांना संधी दिली आहे़ मात्र, आम्हाला सक्षम विरोधीपक्ष म्हणून कौल मिळाला असल्याचेही त्यांनी सांगितले़ नोटबंदीच्या मुद्दयावरून तिवारी यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले़ खासगी कंपन्यांना रेड कार्पेट घालून द्यायचा या सरकारचा मूळ उद्देश असल्याचे ते म्हणाले़काँग्रेसच्या जिल्ह्यातील कमी जागांबाबत बोलताना जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़ संदीप पाटील यांनी सांगितले की, अनेक ठिकाणी राष्ट्रवादीला अत्यंत कमी जागा देण्यात आल्या होत्या़ नांदेड मध्ये कॉंग्रेस आठ तर राष्ट्रवादी केवळ एका जागेवर लढली़ त्यामुळे जागा वाटप हा वरिष्ठांचा निर्णय असल्याचे अ‍ॅड़ संदीप पाटील यांनी स्पष्ट केले़ यावेळी श्याम तायडे, श्रीधर चौधरी आदी उपस्थित होते़पाठिंब्याबाबत दोन मतप्रवाहशिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह आहेत़ भाजप घटनात्मक चौकटी मोडायला निघाला आहे़ त्यामानाने शिवसेना पक्ष आक्रमक असला तरी कुणाचा द्वेष करणारा नाही, त्यांनी वारंवार काँग्रेसच्या विकासकामांची प्रशंसा केली आहे़ त्यामुळे शिवसेनेला सत्तास्थापनेत पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसमध्ये हो व नाही असे दोन मतप्रवाह आहेत, सोनिया गांधी यांच्याकडून कुठलाही निर्णय याबाबत झालेला नाही़ शिवाय शिवसेनेकडून तसा कुठलाही प्रस्ताव काँग्रेसकडे आलेला नाही, असे तिवारी यांनी यावेळी स्पष्ट केले़

टॅग्स :congressकाँग्रेसJalgaonजळगाव