शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

शिवसेनेला पाठिंब्याबाबत काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 17:49 IST

प्रदेश प्रवक्त्यांचे संकेत: पत्रकार परिषदेत भाजपच्या धोरणांवर टीका

जळगाव : काँग्रेसची विकासकामे, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचे योगदान याबाबत शिवसेनेने वारंवार प्रशंसा केली आहे़ भाजप व सेनेत हा मुलभूत फरक असून पाठिंब्याबाबतचा प्रस्ताव सेनेकडून आल्यास विचार होऊ शकतो, असे संकेत काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी दिले. मात्र, पाठिंब्याबाबत पक्षात दोन मतप्रवाह असल्याचेही ते म्हणाले.शुक्रवारी दुपारी काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते़ जनतेने आम्हाला सक्षम विरोधी म्हणून निवडून दिलेले आहेत ती भूमिका आम्ही पार पाडू, असेही ते म्हणाले़ नोटबंदीचा निर्णय अत्यंत दुर्देवी असून गेल्या तीन वर्षांपासून या निर्णयाची पुण्यतिथी काँग्रेस करीत आहे़ अर्थव्यवस्थेची दयनीय स्थिती झालेली आहे. भूक बळींची संख्या वाढली़ बेरोजगारी ४५ टक्क्यांनी वाढली, बँक घोटाळ्यांमध्ये पाच वर्षात ७३ टक्क््यांनी वाढ झाली़ या घटनांमुळे सरकारच्या धोरणांविषयी शंका निर्माण झाली, कुठे चालला आहे देश माझा अशी परिस्थिती निर्माण झाली व त्याचा परिणाम म्हणून भाजपच्या जागा घटल्या़ कुठलाही निर्णय नसताना काही घटना नसताना भारतीय अर्थव्यवस्थेची ५ ट्रीलीयनकडे वाटचाल हे विधान हास्यास्पद आहे़ सरकारी कंपन्यांचे खच्चीकरण करण्यात आल्याचा आरोप तिवारी यांनी केला़खान्देशला फायद्याचा ठरणार नदी जोड प्रकल्प ३१ जुलै २०१९ मध्ये भाजप सरकारने रद्द केल्याचे ते म्हणाले.अमित शहा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दबाबामुळे फडणवीस सरकारने हा करार रद्द केला व यामुळे जळगावचे मोठे नुकसान झाल्याचे तिवारी यांनी सांगितले़दरम्यान, जनता अजुनही भाजप सेनेकडून आशावादी होती म्हणून त्यांना संधी दिली आहे़ मात्र, आम्हाला सक्षम विरोधीपक्ष म्हणून कौल मिळाला असल्याचेही त्यांनी सांगितले़ नोटबंदीच्या मुद्दयावरून तिवारी यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले़ खासगी कंपन्यांना रेड कार्पेट घालून द्यायचा या सरकारचा मूळ उद्देश असल्याचे ते म्हणाले़काँग्रेसच्या जिल्ह्यातील कमी जागांबाबत बोलताना जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़ संदीप पाटील यांनी सांगितले की, अनेक ठिकाणी राष्ट्रवादीला अत्यंत कमी जागा देण्यात आल्या होत्या़ नांदेड मध्ये कॉंग्रेस आठ तर राष्ट्रवादी केवळ एका जागेवर लढली़ त्यामुळे जागा वाटप हा वरिष्ठांचा निर्णय असल्याचे अ‍ॅड़ संदीप पाटील यांनी स्पष्ट केले़ यावेळी श्याम तायडे, श्रीधर चौधरी आदी उपस्थित होते़पाठिंब्याबाबत दोन मतप्रवाहशिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह आहेत़ भाजप घटनात्मक चौकटी मोडायला निघाला आहे़ त्यामानाने शिवसेना पक्ष आक्रमक असला तरी कुणाचा द्वेष करणारा नाही, त्यांनी वारंवार काँग्रेसच्या विकासकामांची प्रशंसा केली आहे़ त्यामुळे शिवसेनेला सत्तास्थापनेत पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसमध्ये हो व नाही असे दोन मतप्रवाह आहेत, सोनिया गांधी यांच्याकडून कुठलाही निर्णय याबाबत झालेला नाही़ शिवाय शिवसेनेकडून तसा कुठलाही प्रस्ताव काँग्रेसकडे आलेला नाही, असे तिवारी यांनी यावेळी स्पष्ट केले़

टॅग्स :congressकाँग्रेसJalgaonजळगाव