कचरा टाकण्याच्या कारणावरुन दोन बहिणींना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2017 16:33 IST2017-06-11T16:33:44+5:302017-06-11T16:33:44+5:30
मोकळ्या जागेत टाकलेला कचरा घरात उडून येत असल्याच्या कारणावरून तिघांनी दोन्ही तरूणींना मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री साडे नऊ वाजता इंद्रप्रस्थनगरातील शिवशंकर कॉलनीत घडली.

कचरा टाकण्याच्या कारणावरुन दोन बहिणींना मारहाण
>ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.11 - मोकळ्या जागेत टाकलेला कचरा घरात उडून येत असल्याच्या कारणावरून तिघांनी दोन्ही तरूणींना मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री साडे नऊ वाजता इंद्रप्रस्थनगरातील शिवशंकर कॉलनीत घडली. दरम्यान, याप्रकरणी तिघांविरूध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिव शंकर कॉलनीत जयश्री अशोक शिंदे (वय 30) ही शनिवारी रात्री मावस बहिण अश्विनी हिच्यासोबत अंगणात बसलेली होती. त्यावेळी शेजारी राहणारे दीपक वाणी व त्यांची प}ी रुपा, गल्लीत राहणारी बबली हे तिघे जयश्री हिच्याकडे येवून तुम्ही मोकळ्या जागेत कचरा टाकतात, तोच कचरा आमच्या घरात उडून येतो असे बोलून शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. सगळेच या ठिकाणी कचरा टाकतात असे जयश्री बोलताच तिला दीपक वाणी याने मारहाण केली. यानंतर भांडण सोडविण्यासाठी आलेल्या अश्विनी हिला देखील दीपक याने ढकलून दिले. जयश्री शिंदे यांच्या फिर्यादीवरुन दीपक वाणी, त्याची प}ी रुपा वाणी व बबली या तिघांविरूध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.