शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
3
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
4
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
5
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
6
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
7
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
8
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
9
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
10
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
11
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
12
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
13
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
14
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
15
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
16
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
17
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
18
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
19
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
20
कोल्हापुरातील शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट! शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश

अमळनेर तालुक्यात दोघा शाळकरी मित्रांचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 15:17 IST

वाघोदे शिवारातील दुर्घटना, लोंढवे गावात शोककळा

संजय पाटीलअमळनेर : तालुक्यातील वाघोदे शिवारामध्ये नाल्यात पोहण्यासाठी गेलेल्या लोंढवे येथील दहावीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थी मित्रांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता घडली. यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.अमळनेर तालुक्यातील लोंढवे येथील स्व.एस.एस.पाटील माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीत शिकणारे भावेश बळीराम देसले ( वय १५) , हितेश सुनील पवार (वय १५) आणि जयवंत सुरेश पाटील हे तिघे मित्र शनिवारी जवळच असलेल्या नाल्यात पोहण्यासाठी गेले होते. पावसामुळे हा नाला तुडूंब भरून वाहत आहे. भावेश देसले आणि हितेश पवार हे दोन्ही १५ फूट खोल पाण्यात गेले आणि आही वेळातच ते बुडू लागले. दोन्ही मित्र बुडत असल्याचे पाहून जयंवत हा गलितगात्र झाला. थरथरत्या अंगाने आणि कापºया आवाजाने त्याने दोघांना वाचवण्यासाठी आरडाओरड केली. परंतु जवळ कोणीच नसल्याने मदतीला कोणीही आले नाही. यानंतर त्याने गावात धाव घेऊन दोघे मित्र पाण्यात बुडल्याची माहिती दिली. लगेच भावेश, हितेश यांच्या कुटुबीयांसह ग्रामस्थ त्यांच्या शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब जीवन पाटील, सरपंच कैलास खैनरनार यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यातील पट्टीच्या पोहणाऱ्यांनी पटापट नाल्यात उड्या टाकून दोघा मुलांचे मृतदेह अवघ्या पंधरा मिनीटात बाहेर काढले. दोघांच्या कुटुंबियांनी आपल्या काळजाच्या तुकड्यांना मृतावस्थेत पाहुन तेथेच हंभरडा फोडला. या घटनेने गाव सुन्न झाला आहे.पोहताना दोर तुटला आणि घात झाला..भावेश, हितेश आणि जयवंत या तिघांपैकी भावेश याला चांगले पोहता येत होते. परंतु मित्र हितेश याला पोहता येत नसल्याने त्याला दोर बांधून भावेश पोहण्याचे शिकवत होता. तर जयवंत हा काठावरच होता. त्यालाही दोघांनी पोहण्यासाठी येण्याचा आग्रह केला होता. परंतु त्याला पोहता येत नसल्याने तो नाल्यात उतरलाच नाही. काही वेळाने हितेशचा तोल जाऊ लागला. त्यात त्याला बांधलेला दोरही तुटला. त्यामुळे भावेशने त्याला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला तर जयवंत काठावर बसून मदतीचा प्रयत्न करीत होता. परंतु दुर्दैवाने हितेशचा पाय अधिकच खोल पाण्यात गेल्याने त्याला वाचवताना पोहता येत असूनही भावेश पाण्यात बुडला आणि दोन्ही मित्राच करुना अंत झाला.दोन्ही सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलेभावेश आणि हितेश या दोन्ही मित्रांचे वडील शेतकरी असून त्यांची घरची परिस्थिती सर्वसामान्य आहे. भावेश हा एकुलता एक मुलगा होता. तसेच त्याला एक बहिण आहे. तर हितेश हे तीन भाऊ असून तो घरात सर्वात मोठा होता. यामुळे या दोन्ही कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे. दरम्यान भावेश आणि हितेश यांचा मृतदेह अमळनेर ग्रामीण रुग्णालयात आणून शवच्छदेन करण्यात आले. यावेळी लोंढवे येथील ग्रामस्थ, दोन्ही मुलांचे कुटुंबिय, नातलग आणि शाळेचे मुख्याध्यापकांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.