शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

गिरणा धरणातून शेतीसाठी दोन आवर्तन: कालवा सल्लागार समितीचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 10:46 PM

बोरी व अंजनीला मार्च महिन्यात पाणी मिळणार

ठळक मुद्देफेब्रुवारी महिन्यात पुन्हा बैठकशेतीसाठी ५ डिसेंबर व ५ जानेवारीला आवर्तन बोरी धरणात ३६० द.ल.घ.फु. मृतसाठा शिल्लक

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.१३ - कालवा सल्लागार समितीची बैठक सोमवारी दुपारी मंत्रालयात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या दालनात पार पडली. त्यात जिल्हा प्रशासनाने गिरणा धरणातील सर्व उपलब्ध पाणीसाठा १०० टक्के पिण्यासाठी राखीव करण्याची शिफारस केलेली असताना शेतीसाठी गिरणातून दोन आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच बोरी व अंजनीसाठी गिरणातून पाणी सोडण्याबाबत फेब्रुवारी महिन्यात पुन्हा बैठक घेऊन मार्च मध्ये पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.या बैठकीसाठी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार डॉ.सतीश पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार कुणाल पाटील, आमदार स्मिता वाघ, आमदार शेख, जि.प. अध्यक्षा उज्ज्वला पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, गिरणा पाटबंधारे अधीक्षक अभियंता पाटीलआदीउपस्थितहोते.गिरीश महाजन यांनी जिल्'ातील मध्यम प्रकल्पांच्या पाणी साठ्यासंदर्भात विचारणा केली. पाणी आरक्षण कसे आहे याबाबत मुंडके यांनी सांगितले की, प्रशासनाने अगोदर पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावे. मात्र गिरणा धरणाचे तीन आवर्तन रब्बी हंगामासाठी सोडावे, अशी मागणी आमदारांनी केली. परंतु पाण्याची मागणी पाहता ते शक्य नाही. एरंडोल व पारोळा तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता असून याबाबतही विचार व्हावा, अशी मागणी आ़मदार डॉ.सतीश पाटील यांनी केली. शेतीला पाणी द्यावे़ कारण यावर्षी खरीप हंगाम आला नाही़ रब्बी हंगामावर शेतकºयांची मदार असून शेतीला तर पाणी द्या; परंतु बोरी व अंजनी धरणात देखील पाणी सोडावे, अशी मागणी आमदार डॉ.सतीश पाटील यांनी केली. त्यावर मार्च महिन्यात पाणी सोडू, असे गिरीश महाजन यांनी सांगितले. गुलाबराव पाटील यांनी तीन आवर्तन सोडावे, अशी मागणी केली.शेतीसाठी ५ डिसेंबर व ५ जानेवारीला आवर्तनया बैठकीत शेती उपयोगासाठी ५ डिसेंबर व ५ जानेवारी रोजी असे दोन आवर्तन देण्याचे ठरले. बोरीधरण तामसवाडी ता.पारोळा या धरणात ३६० द.ल.घ.फु. मृतसाठा शिल्लक आहे, हे पाणी दोन ते तीन महिने पारोळा शहर व परिसराला पाणी पुरवठ्यासाठी पुरेल, असे अधिकारी वर्गाकडून आकडेवरुन सांगण्यात आले. पुढे फेब्रुवारी महिनाअखेर परत कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन गिरणा धरणाचे शिल्लक पाणी व मृतसाठ्यातून बोरी धरणात व अंजनी मध्यम प्रकल्पात पाणी सोडण्याचे बैठकीत ठरणार आहे. तशी संमती या बैठकीत देण्यात आल्याची माहिती आमदार डॉ.सतीश पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.