शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
2
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
3
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
4
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
5
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
6
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
7
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
8
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
9
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
10
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
11
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
12
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
13
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
15
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
16
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
17
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
18
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
19
Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
20
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेरात दोन खुनांमुळे लॉकडाऊनच्या शांततेचा भंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 16:04 IST

सर्वत्र आनंद शांतता असताना मात्र अमळनेरात १५ दिवसांनंतर दोन सराईत गुन्हेगारांच्या खुनामुळे शांततेला सुरुंग लागला.

ठळक मुद्देलॉकडाऊनला महिना झाल्यानंतरचे चित्रचोऱ्या, अपघात, कौटुंबिक कलह, मारामाºया नियंत्रणात

संजय पाटीलअमळनेर, जि.जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन झाल्यामुळे चोºया, अपघात, कौटुंबिक कलह, मारामाºया नियंत्रणात आल्या. सर्वत्र आनंद शांतता असताना मात्र अमळनेरात १५ दिवसांनंतर दोन सराईत गुन्हेगारांच्या खुनामुळे शांततेला सुरुंग लागला. या घटना वगळता पुन्हा मात्र कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली.२२ मार्चला जनता कर्फ्यू लागला. सर्वत्र बंद झाल्याने सुरुवातीचे १५ दिवस लोक आपल्या घरातच थांबू लागले. पोलीस फक्त दिवस रात्र गस्तीवर राहू लागले. त्यामुळे चोरटेदेखील घरातच थांबू लागले. परिणामी द्वेष, मारामाºया, घरफोडी, चोºया, महिलांची छेडछाड आदी प्रकार थांबले. गुन्हेगारी बंद झाल्याने रामराज्य सुरू असल्याचा अनुभव आला. मात्र न्यायालयाने कोरोनाच्या पाशर््वभूमीवर काही आरोपींना पॅरोलवर सोडले आणि राकेश वसंत चव्हाण हादेखील जेलमधून बाहेर आला आणि त्याला त्याच्या मैत्रिणीने होत असलेल्या त्रासाची तक्रार केली आणि चिडलेल्या राकेशने आपल्या भावासह ख्वाजा नगरमध्ये जाऊन वाद घातल्याने संतप्त जमाव अंगावर आला आणि त्यातून दगडफेक, जातीय दंगल झाली आणि सामूहिक मारहाणीत राकेशचा मृत्यू झाला. ही घटना होत नाही तोच तिसºया दिवशी कुर्हे खुर्द गावात रवींद्र पाटील नामक खुनाची शिक्षा भोगून आलेला गुन्हेगार आला. त्यानेदेखील गावात आपल्या नातेवाईकांशीच भांडणे उकरून काढू लागला होता. म्हणून अखेर जमाव जमला आणि त्यांनीही रवींद्रवर सामूहिक हल्ला चढवला. गंभीर जखमी झालेल्या रवींद्रचा उपचार घेताना मृत्यू झाला. या दोन्ही घटनांनी लॉकडाऊनमधल्या शांततेला सुरूंग लावला.लॉकडाऊनमुळे पालक आपल्या मुलांना कुटुंबांना वेळ देऊ लागले. कुटुंबात सुसंवाद झाला तर गुन्हेगार घरात दडून बसल्याने चोºया, घरफोड्या, वाद, भांडणे थांबून कायदा व सुव्यवस्था उत्तम झाली. वाहतूक बंद झाल्याने अपघाताचे प्रमाण शून्यावर आले आणि बाहेरील लोकांनाही प्रवेश नसल्याने गुन्हे घडणे थांबले. -अंबादास मोरे, पोलीस निरीक्षक, अमळनेर

टॅग्स :MurderखूनAmalnerअमळनेर