शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

अमळनेरात दोन खुनांमुळे लॉकडाऊनच्या शांततेचा भंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 16:04 IST

सर्वत्र आनंद शांतता असताना मात्र अमळनेरात १५ दिवसांनंतर दोन सराईत गुन्हेगारांच्या खुनामुळे शांततेला सुरुंग लागला.

ठळक मुद्देलॉकडाऊनला महिना झाल्यानंतरचे चित्रचोऱ्या, अपघात, कौटुंबिक कलह, मारामाºया नियंत्रणात

संजय पाटीलअमळनेर, जि.जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन झाल्यामुळे चोºया, अपघात, कौटुंबिक कलह, मारामाºया नियंत्रणात आल्या. सर्वत्र आनंद शांतता असताना मात्र अमळनेरात १५ दिवसांनंतर दोन सराईत गुन्हेगारांच्या खुनामुळे शांततेला सुरुंग लागला. या घटना वगळता पुन्हा मात्र कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली.२२ मार्चला जनता कर्फ्यू लागला. सर्वत्र बंद झाल्याने सुरुवातीचे १५ दिवस लोक आपल्या घरातच थांबू लागले. पोलीस फक्त दिवस रात्र गस्तीवर राहू लागले. त्यामुळे चोरटेदेखील घरातच थांबू लागले. परिणामी द्वेष, मारामाºया, घरफोडी, चोºया, महिलांची छेडछाड आदी प्रकार थांबले. गुन्हेगारी बंद झाल्याने रामराज्य सुरू असल्याचा अनुभव आला. मात्र न्यायालयाने कोरोनाच्या पाशर््वभूमीवर काही आरोपींना पॅरोलवर सोडले आणि राकेश वसंत चव्हाण हादेखील जेलमधून बाहेर आला आणि त्याला त्याच्या मैत्रिणीने होत असलेल्या त्रासाची तक्रार केली आणि चिडलेल्या राकेशने आपल्या भावासह ख्वाजा नगरमध्ये जाऊन वाद घातल्याने संतप्त जमाव अंगावर आला आणि त्यातून दगडफेक, जातीय दंगल झाली आणि सामूहिक मारहाणीत राकेशचा मृत्यू झाला. ही घटना होत नाही तोच तिसºया दिवशी कुर्हे खुर्द गावात रवींद्र पाटील नामक खुनाची शिक्षा भोगून आलेला गुन्हेगार आला. त्यानेदेखील गावात आपल्या नातेवाईकांशीच भांडणे उकरून काढू लागला होता. म्हणून अखेर जमाव जमला आणि त्यांनीही रवींद्रवर सामूहिक हल्ला चढवला. गंभीर जखमी झालेल्या रवींद्रचा उपचार घेताना मृत्यू झाला. या दोन्ही घटनांनी लॉकडाऊनमधल्या शांततेला सुरूंग लावला.लॉकडाऊनमुळे पालक आपल्या मुलांना कुटुंबांना वेळ देऊ लागले. कुटुंबात सुसंवाद झाला तर गुन्हेगार घरात दडून बसल्याने चोºया, घरफोड्या, वाद, भांडणे थांबून कायदा व सुव्यवस्था उत्तम झाली. वाहतूक बंद झाल्याने अपघाताचे प्रमाण शून्यावर आले आणि बाहेरील लोकांनाही प्रवेश नसल्याने गुन्हे घडणे थांबले. -अंबादास मोरे, पोलीस निरीक्षक, अमळनेर

टॅग्स :MurderखूनAmalnerअमळनेर