शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

अमळनेरात दोन खुनांमुळे लॉकडाऊनच्या शांततेचा भंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 16:04 IST

सर्वत्र आनंद शांतता असताना मात्र अमळनेरात १५ दिवसांनंतर दोन सराईत गुन्हेगारांच्या खुनामुळे शांततेला सुरुंग लागला.

ठळक मुद्देलॉकडाऊनला महिना झाल्यानंतरचे चित्रचोऱ्या, अपघात, कौटुंबिक कलह, मारामाºया नियंत्रणात

संजय पाटीलअमळनेर, जि.जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन झाल्यामुळे चोºया, अपघात, कौटुंबिक कलह, मारामाºया नियंत्रणात आल्या. सर्वत्र आनंद शांतता असताना मात्र अमळनेरात १५ दिवसांनंतर दोन सराईत गुन्हेगारांच्या खुनामुळे शांततेला सुरुंग लागला. या घटना वगळता पुन्हा मात्र कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली.२२ मार्चला जनता कर्फ्यू लागला. सर्वत्र बंद झाल्याने सुरुवातीचे १५ दिवस लोक आपल्या घरातच थांबू लागले. पोलीस फक्त दिवस रात्र गस्तीवर राहू लागले. त्यामुळे चोरटेदेखील घरातच थांबू लागले. परिणामी द्वेष, मारामाºया, घरफोडी, चोºया, महिलांची छेडछाड आदी प्रकार थांबले. गुन्हेगारी बंद झाल्याने रामराज्य सुरू असल्याचा अनुभव आला. मात्र न्यायालयाने कोरोनाच्या पाशर््वभूमीवर काही आरोपींना पॅरोलवर सोडले आणि राकेश वसंत चव्हाण हादेखील जेलमधून बाहेर आला आणि त्याला त्याच्या मैत्रिणीने होत असलेल्या त्रासाची तक्रार केली आणि चिडलेल्या राकेशने आपल्या भावासह ख्वाजा नगरमध्ये जाऊन वाद घातल्याने संतप्त जमाव अंगावर आला आणि त्यातून दगडफेक, जातीय दंगल झाली आणि सामूहिक मारहाणीत राकेशचा मृत्यू झाला. ही घटना होत नाही तोच तिसºया दिवशी कुर्हे खुर्द गावात रवींद्र पाटील नामक खुनाची शिक्षा भोगून आलेला गुन्हेगार आला. त्यानेदेखील गावात आपल्या नातेवाईकांशीच भांडणे उकरून काढू लागला होता. म्हणून अखेर जमाव जमला आणि त्यांनीही रवींद्रवर सामूहिक हल्ला चढवला. गंभीर जखमी झालेल्या रवींद्रचा उपचार घेताना मृत्यू झाला. या दोन्ही घटनांनी लॉकडाऊनमधल्या शांततेला सुरूंग लावला.लॉकडाऊनमुळे पालक आपल्या मुलांना कुटुंबांना वेळ देऊ लागले. कुटुंबात सुसंवाद झाला तर गुन्हेगार घरात दडून बसल्याने चोºया, घरफोड्या, वाद, भांडणे थांबून कायदा व सुव्यवस्था उत्तम झाली. वाहतूक बंद झाल्याने अपघाताचे प्रमाण शून्यावर आले आणि बाहेरील लोकांनाही प्रवेश नसल्याने गुन्हे घडणे थांबले. -अंबादास मोरे, पोलीस निरीक्षक, अमळनेर

टॅग्स :MurderखूनAmalnerअमळनेर