शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

जळगाव येथील समता नगर भागातून दोन मुले बेपत्ता; पालकांमध्ये भीती आणि तणावाचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 01:03 IST

गेल्या महिन्यात आठ वर्षीय बालिका बेपत्ता झाल्यानंतर तिचा मृतदेहच आढळून आल्याची घटना ताजी असताना बुधवारी पुन्हा सायंकाळी सात वाजता समता नगरातील वंजारी टेकडी या भागातून समीर रमजान पिंजारी (वय ९) व रेहान शेख निजाम (वय १०) हे दोन मुले गायब झाल्याने खळबळ उडाली आहे.

जळगाव : गेल्या महिन्यात आठ वर्षीय बालिका बेपत्ता झाल्यानंतर तिचा मृतदेहच आढळून आल्याची घटना ताजी असताना बुधवारी पुन्हा सायंकाळी सात वाजता समता नगरातील वंजारी टेकडी या भागातून समीर रमजान पिंजारी (वय ९) व रेहान शेख निजाम (वय १०) हे दोन मुले गायब झाल्याने खळबळ उडाली आहे.दरम्यान, या हा प्रकार समजल्यानंतर पोलिसांनी समता नगर गाठून माहिती जाणून घेतली. रात्री उशिरापर्यंत या भागात प्रचंड गर्दी व तणाव निर्माण झाला होता. समीर व रेहान ही दोन्ही मुले त्र्यंबक नगरातील शाळेत शिक्षण घेतात. दोघं जण साडे पाच वाजता घरी आले. घरी दप्तर ठेवल्यानंतर दोघंही वंजारी टेकडी या भागात खेळायला गेले. सात वाजले तरी मुले घरी आली नाहीत, त्यामुळे पालकांनी त्यांचा शोध घेतला. मेहरुण तलाव, समता नगर, खदान या भागात त्यांचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तरीही कुठेच त्यांचा थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे कुटुंबातील लोकांनी रामानंद नगर पोलिसांत तक्रार केली. पोलीस निरीक्षक बी.जी.रोहोम, प्रदीप चौधरी व सहकाऱ्यांनी माहिती घेतली.गेल्या महिन्यात १३ जून रोजी आठ वर्षीय बालिका खेळायला गेली असता गायब झाली होती. दुसºया दिवशी धामणगाववाडा टेकडीवर गोणपाटात तिचा मृतदेहच आढळून आला होता. आदेशबाबाने तिच्यावर अत्याचार करुन खून केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे आता ही मुले गायब झाल्याने या भागात प्रचंड भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर उलटसुलट चर्चा या भागात आहे.खान्देशात मुले पळविण्याच्या संशयवारुन जमावाकडून बाहेरील व्यक्ति दिसल्यास मारहाण होण्याच्या घटना घडत असताना जलगावतून ही मुले गायब झाल्याने वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या जात आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव