शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

जळगाव येथील समता नगर भागातून दोन मुले बेपत्ता; पालकांमध्ये भीती आणि तणावाचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 01:03 IST

गेल्या महिन्यात आठ वर्षीय बालिका बेपत्ता झाल्यानंतर तिचा मृतदेहच आढळून आल्याची घटना ताजी असताना बुधवारी पुन्हा सायंकाळी सात वाजता समता नगरातील वंजारी टेकडी या भागातून समीर रमजान पिंजारी (वय ९) व रेहान शेख निजाम (वय १०) हे दोन मुले गायब झाल्याने खळबळ उडाली आहे.

जळगाव : गेल्या महिन्यात आठ वर्षीय बालिका बेपत्ता झाल्यानंतर तिचा मृतदेहच आढळून आल्याची घटना ताजी असताना बुधवारी पुन्हा सायंकाळी सात वाजता समता नगरातील वंजारी टेकडी या भागातून समीर रमजान पिंजारी (वय ९) व रेहान शेख निजाम (वय १०) हे दोन मुले गायब झाल्याने खळबळ उडाली आहे.दरम्यान, या हा प्रकार समजल्यानंतर पोलिसांनी समता नगर गाठून माहिती जाणून घेतली. रात्री उशिरापर्यंत या भागात प्रचंड गर्दी व तणाव निर्माण झाला होता. समीर व रेहान ही दोन्ही मुले त्र्यंबक नगरातील शाळेत शिक्षण घेतात. दोघं जण साडे पाच वाजता घरी आले. घरी दप्तर ठेवल्यानंतर दोघंही वंजारी टेकडी या भागात खेळायला गेले. सात वाजले तरी मुले घरी आली नाहीत, त्यामुळे पालकांनी त्यांचा शोध घेतला. मेहरुण तलाव, समता नगर, खदान या भागात त्यांचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तरीही कुठेच त्यांचा थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे कुटुंबातील लोकांनी रामानंद नगर पोलिसांत तक्रार केली. पोलीस निरीक्षक बी.जी.रोहोम, प्रदीप चौधरी व सहकाऱ्यांनी माहिती घेतली.गेल्या महिन्यात १३ जून रोजी आठ वर्षीय बालिका खेळायला गेली असता गायब झाली होती. दुसºया दिवशी धामणगाववाडा टेकडीवर गोणपाटात तिचा मृतदेहच आढळून आला होता. आदेशबाबाने तिच्यावर अत्याचार करुन खून केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे आता ही मुले गायब झाल्याने या भागात प्रचंड भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर उलटसुलट चर्चा या भागात आहे.खान्देशात मुले पळविण्याच्या संशयवारुन जमावाकडून बाहेरील व्यक्ति दिसल्यास मारहाण होण्याच्या घटना घडत असताना जलगावतून ही मुले गायब झाल्याने वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या जात आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव