शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अमळनेरात दोन घरफोडीत पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 21:04 IST

घरमालक लग्नाला गेलेले असताना अज्ञात चोरट्यानी घराचा कडीकोयंडा तोडून सोन्याचे दागिन्यांसह, रोख रक्कम असा सव्वालाखाचा ऐवज चोरून नेला.

ठळक मुद्देबंद घरात चोरट्यांनी डाव साधला.

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : घरमालक पुतणीच्या लग्नाला गेलेले असताना अज्ञात चोरट्यानी घराचा कडीकोयंडा तोडून सोन्याचे दागिन्यांसह, रोख रक्कम असा सव्वालाखाचा ऐवज चोरून नेल्याची व दुसऱ्या घरातून ४० हजार रुपयांची चोरी झाल्याची घटना ४ रोजी आर. के. नगरजवळील मुंदडा नगर ४मध्ये घडली.

संजय रतीलाल धनगर (मुंदडानगर) हे ३ रोजी दुपारी २ वाजता पुतणीच्या लग्नासाठी लामकाणी (जि. धुळे) येथे लग्नासाठी गेले असता ४ रोजी त्यांना त्यांचे मामेभाऊ बापूराव संगोरे यांचा फोन आला की, तुमच्या घरचा कडी कोंडा तोडलेला दिसून येत असून घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसत आहे.

संजय धनगर यांनी घरी येऊन खात्री केली असता घरातील वरच्या मजल्यावरील कपाट तोडून रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरीस गेलेले दिसले. त्यात १ लाख ६० हजारांचे मणी मंगळसूत्र, सोन्याच्या अंगठ्या, १० ग्रॅम वजनाचे कानातले, १५ हजार रुपयांची ३० भार चांदी, ४८ हजार रुपये रोख असा माल चोरीस गेल्याचे उघडकीस आले. त्याचवेळी त्यांनी आर.के. नगरमधील सर्वज्ञ नगरमधील विलास शिवाजी पाटील यांना ही घटना कळवली. त्यांनीदेखील त्यांच्या घरातदेखील रोख रकमेसह सोन्याचे दागिने असे एकूण ४० हजार रुपयांची चोरी झाल्याचे सांगितले. घटनास्थळी डीवायएसपी राकेश जाधव, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी भेट देऊन पाहणी केली. अज्ञात चोराविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. असून तपास पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे करीत आहेत.

टॅग्स :JalgaonजळगावAmalnerअमळनेरThiefचोर