शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

वीज कडाडताच मोबाइल करा बंद, झाडांपासून राहा दूर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:13 IST

(डमी ९२२) अजय पाटील लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : दरवर्षी पावसाळ्यात वीज पडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते, ढगांच्या ...

(डमी ९२२)

अजय पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : दरवर्षी पावसाळ्यात वीज पडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते, ढगांच्या गडगडाटासह दरवर्षी विजादेखील पडत असतात. यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानीदेखील होत असते. जिल्ह्यातदेखील वीज पडून मृत्यू होणाऱ्यांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात आहे. पावसाळ्यात बाहेर असताना नागरिकांनी मोबाइल बंद करणे तसेच झाडांपासून दूर राहिल्यास अंगावर वीज पडण्याच्या शक्यतेपासून काही प्रमाणात सुरक्षित राहता येता येऊ शकते. विशेष म्हणजे मान्सूनच्या आगमनावेळेस वीज पडण्याचा घटना मोठ्या प्रमाणात होत असतात. वीज पडताना प्राथमिक स्तरावर मोबाइल बंद करणे किंवा झाडाखाली उभे न राहणे अशी काळजी घेतली तरी विजेपासून काही अंशी सुरक्षित राहता येऊ शकते.

वीज पडताच ही घ्या काळजी

वीज चमकत असताना व विजेचा गडगडाट होत असताना मोबाइल फोन बंद ठेवा. तो चार्जिंगला लावला असेल तर चार्जिंग बंद करून चार्जरची वायर प्लगमधून बाजूला काढून ठेवा. कदाचित फोन चालू असल्यास व त्यावर कॉल आल्यास घेऊ नका. तसेच शेतात काम करीत असताना शेताजवळील घराचा त्वरित आसरा घ्यावा. शेतातील सुरक्षित ठिकाणाचा आसरा घेतल्यानंतर पायाखाली कोरडे लाकूड, प्लॅस्टिक, गोणपाट, कोरडा पालापाचोळा ठेवा. दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून तळपायावर बसावे, झाडापासून झाडाच्या उंचीपेक्षा दुप्पट अंतरावर उभे रहावे. एखादे उंच झाड सुरक्षित ठेवायचे असल्यास, वृक्षाच्या उंच फांदीवर तांब्याची एक तार बांधून तिचे दुसरे टोक जमिनीत खोलवर गाडून ठेवावे.

कोणाला किती मिळाली नुकसानभरपाई

जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत वीज पडून मृत झालेल्यांपैकी १२ जणांना नुकसानभरपाई मिळाली आहे. त्यात सर्व शेतकऱ्यांचा समावेश आहे. शासनाकडून विजांमुळे मृत पावलेल्या नागरिकांना चार लाखांची नुकसानभरपाई दिली जाते. विशेष करून शेतात काम करणारे मजूर व शेतकऱ्यांसाठी शासनाने ही विशेष तरतूद केली आहे. तसेच विजांमुळे मृत पावणाऱ्यांमध्ये ८० टक्के शेतकरी व मजुरांचाच समावेश असतो. यासह मृत जनावरांबाबतदेखील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जात असते.

वीज पडल्याने झालेले मृत्यू

२०१८ - ११ मनुष्य , १९ जनावरे

२०१९ - १४ मनुष्य - १७ जनावरे

२०२० - ११ मनुष्य - २१ जनावरे

२०२१ - ५ मनुष्य - १० जनावरे

जिल्ह्यात २४ ठिकाणी वीज अटकाव यंत्रणा

काही वर्षांमध्ये वीज पडून मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. या कारणांमुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी कमी करण्यासाठी वीज अटकाव यंत्रणा तयार केली जात असते. जळगाव जिल्ह्यात एकूण २४ ठिकाणी ही यंत्रणा प्रशासनाच्या माध्यमातून बसविण्यात आली आहे. यासह खासगी मोबाइल टॉवरवरदेखील ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्याने, आता ग्रामीण भागातदेखील मोबाइल टॉवरमुळे विजेपासून काही अंशी सुरक्षा ही मिळत असते. जळगाव शहरात महापालिकेसह अनेक शासकीय कार्यालयांवरदेखील ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.