शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

वृक्ष वल्ली आम्हा सोयरे....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 08:13 IST

अभियंत्याने जगविली १२०० वृक्षराजी

चुडामण बोरसे/जळगाव - सरकारी अधिकाऱ्याने ठरविले तर ते चांगले काम करुन दाखवू शकतात. गोंडगाव (ता. भडगाव) येथील तत्कालीन शाखा अभियंता डी.टी. पाटील यांनी अतिशय अल्पखर्चात सुमारे १२०० झाडे लावून ती जगविली आहेत. त्यामुळे संत तुकाराम महाराजांच्या वृक्षवल्ली आम्हा सोयरे .... या अभंगांचा प्रत्यय या परिसरात गेल्यावर होतो. जामदा उजवा कालवा, शाखा गोंडगाव कॉलनी येथे पाटील यांनी तीन वर्षापूर्वी जवळपास १२०० झाडे लावली. ती आज ४० ते ५० फुटापर्यंत वाढली आहेत. यामुळे गोंडगाव शाखेचा परिसर हिरवागार झाल्याचे दिसत आहे. या कामासाठी तीन लाख ६० हजार रुपयांचा निधी मंजूर होता. त्यापैकी फक्त ९० हजार रुपयात हे अवघड काम आपण करुन दाखविल्याचा त्यांचा दावा आहे.

या १२०० झाडांमध्ये ३५० चिंचेची झाडे, ५० बांबूची झाडे, ३५० गुलमोहर झाडे तर इतर जातीची तब्बल ४५० झाडे इथे आहेत. एवढेच नाही तर इलेक्ट्रीक मोटार, जेसीबीच्या सहाय्याने चर खोदून स्वखर्चाने कंपाऊडही तयार केले आहे. विशेष म्हणजे या परिसरात पीर बाबांचा दर्गा आणि जवळच जर्नादन स्वामींचा आश्रम आहे. त्यात या बहरलेल्या वृक्षराजीमुळे या परिसराला वेगळी शोभा आली आहे.वाहून जाणारे पाणी अडविले

याशिवाय पावसाळ्यात वाहून जाणा-या गिरणेच्या पाण्याचा पुनर्भरणासाठी उपयोग करण्याचा एक प्रयत्न पाटील यांनी केला. त्याला यशही मिळाले. गिरणा प्रकल्पावरील जामदा कालव्यावर वितरिका व औटलेट गेट नसल्यामुळे पावसाळ्यामध्ये उजव्या कालव्यावरील गिरणा नदीचे वाहून जात होते. त्यामुळे हे पाणी नदीनाले, विहिरी भरण्यासाठी टाकता येत नव्हते. अभियंता पाटील यांनी उजव्या कालव्यावरील सर्व चा-यांना गेट बसविले. त्यामुळे पावसाळ्यात गिरणेचे पाणी नदीनाले व विहिरीच्या पुनर्भरणासाठी देता आले.त्याचा फायदा अनेक गावांना झाला आहे.

एवढेच नाही तर उजव्या कालव्यावरील शेवटच्या चारीचा काही भाग सिंचनासाठी एक वर्षापासून बंद होता. तो त्यांनी मागील वर्षी सिंचनासाठी खुला करुन दिला. याचा फायदा वाडे (ता. भडगाव) या गावाला झाला. कारण वाडे गावामध्ये गेल्या काही वर्षापूर्वी विहिरींनी तळ गाठला होता. त्या वर्षी पावसाचे पाणी उजव्या कालव्याद्वारे दिल्याने विहिरींचे पुनर्भरण झाल्याचा पाटील यांचा दावा आहे.नेहरुजी - इंदिराजी यांची परिसराला भेटमहाराष्ट्रात सन १९५२ मध्ये दुष्काळ पडला होता. त्याची पाहणी करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु हे जळगाव जिल्ह्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत इंदिरा गांधीही होत्या. नेहरु व इंदिराजी गोंडगाव पाटशाखेच्या विश्रांतीगृहात काही काळ थांबले होते, त्यांना आदरांजली आणि अभिवादन म्हणून आपण ही वृक्षराजी इथे लावली आणि त्याचे जतनही केले आहे. गोंडगाव पाटशाखेचा हा परिसर आता पर्यटनस्थळ म्हणून विकसित व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीenvironmentवातावरण