शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष वल्ली आम्हा सोयरे....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 08:13 IST

अभियंत्याने जगविली १२०० वृक्षराजी

चुडामण बोरसे/जळगाव - सरकारी अधिकाऱ्याने ठरविले तर ते चांगले काम करुन दाखवू शकतात. गोंडगाव (ता. भडगाव) येथील तत्कालीन शाखा अभियंता डी.टी. पाटील यांनी अतिशय अल्पखर्चात सुमारे १२०० झाडे लावून ती जगविली आहेत. त्यामुळे संत तुकाराम महाराजांच्या वृक्षवल्ली आम्हा सोयरे .... या अभंगांचा प्रत्यय या परिसरात गेल्यावर होतो. जामदा उजवा कालवा, शाखा गोंडगाव कॉलनी येथे पाटील यांनी तीन वर्षापूर्वी जवळपास १२०० झाडे लावली. ती आज ४० ते ५० फुटापर्यंत वाढली आहेत. यामुळे गोंडगाव शाखेचा परिसर हिरवागार झाल्याचे दिसत आहे. या कामासाठी तीन लाख ६० हजार रुपयांचा निधी मंजूर होता. त्यापैकी फक्त ९० हजार रुपयात हे अवघड काम आपण करुन दाखविल्याचा त्यांचा दावा आहे.

या १२०० झाडांमध्ये ३५० चिंचेची झाडे, ५० बांबूची झाडे, ३५० गुलमोहर झाडे तर इतर जातीची तब्बल ४५० झाडे इथे आहेत. एवढेच नाही तर इलेक्ट्रीक मोटार, जेसीबीच्या सहाय्याने चर खोदून स्वखर्चाने कंपाऊडही तयार केले आहे. विशेष म्हणजे या परिसरात पीर बाबांचा दर्गा आणि जवळच जर्नादन स्वामींचा आश्रम आहे. त्यात या बहरलेल्या वृक्षराजीमुळे या परिसराला वेगळी शोभा आली आहे.वाहून जाणारे पाणी अडविले

याशिवाय पावसाळ्यात वाहून जाणा-या गिरणेच्या पाण्याचा पुनर्भरणासाठी उपयोग करण्याचा एक प्रयत्न पाटील यांनी केला. त्याला यशही मिळाले. गिरणा प्रकल्पावरील जामदा कालव्यावर वितरिका व औटलेट गेट नसल्यामुळे पावसाळ्यामध्ये उजव्या कालव्यावरील गिरणा नदीचे वाहून जात होते. त्यामुळे हे पाणी नदीनाले, विहिरी भरण्यासाठी टाकता येत नव्हते. अभियंता पाटील यांनी उजव्या कालव्यावरील सर्व चा-यांना गेट बसविले. त्यामुळे पावसाळ्यात गिरणेचे पाणी नदीनाले व विहिरीच्या पुनर्भरणासाठी देता आले.त्याचा फायदा अनेक गावांना झाला आहे.

एवढेच नाही तर उजव्या कालव्यावरील शेवटच्या चारीचा काही भाग सिंचनासाठी एक वर्षापासून बंद होता. तो त्यांनी मागील वर्षी सिंचनासाठी खुला करुन दिला. याचा फायदा वाडे (ता. भडगाव) या गावाला झाला. कारण वाडे गावामध्ये गेल्या काही वर्षापूर्वी विहिरींनी तळ गाठला होता. त्या वर्षी पावसाचे पाणी उजव्या कालव्याद्वारे दिल्याने विहिरींचे पुनर्भरण झाल्याचा पाटील यांचा दावा आहे.नेहरुजी - इंदिराजी यांची परिसराला भेटमहाराष्ट्रात सन १९५२ मध्ये दुष्काळ पडला होता. त्याची पाहणी करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु हे जळगाव जिल्ह्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत इंदिरा गांधीही होत्या. नेहरु व इंदिराजी गोंडगाव पाटशाखेच्या विश्रांतीगृहात काही काळ थांबले होते, त्यांना आदरांजली आणि अभिवादन म्हणून आपण ही वृक्षराजी इथे लावली आणि त्याचे जतनही केले आहे. गोंडगाव पाटशाखेचा हा परिसर आता पर्यटनस्थळ म्हणून विकसित व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीenvironmentवातावरण