शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
2
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
3
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
4
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
5
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
6
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
7
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
8
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
9
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
10
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
11
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
12
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
13
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
14
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
15
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
16
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
17
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
18
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
19
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
20
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेद्वारे १० हजार टन जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 12:08 IST

कोरोनातील उत्पन्न : बसने पावणेतीनशे टन मालाची वाहतूक

जळगाव : रेल्वे प्रशासनातर्फे लॉकडाऊनच्या काळात करण्यात आलेल्या मालवाहतुकीद्वारे आतापर्यंत जळगावरेल्वे स्थानकावरून १० हजार टन जीवनावश्यक वस्तू बाहेरगावी रवाना करण्यात आल्या आहेत.तसेच गेल्या पंधरा दिवसापासून एस. टी. महामंडळानेही सुरू केलेल्या मालवाहतुकीद्वारे आतापर्यंत ३०० टन मालाची वाहतूक करण्यात आली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्याने तेव्हापासून रेल्वे प्रशासनातर्फे प्रवासी सेवा बंद ठेवून फक्त जीवनावश्यक मालाची वाहतूक करण्यात येत आहे. नागरिकांना आपले नातलग व मित्र परिवाराला कुठलीही जीवनावश्यक वस्तू पाठविण्यासाठी प्रत्येक राज्यात मालगाड्या व पार्सल यान सोडण्यात येत आहे.रेल्वे प्रशासनातर्फे १ एप्रिलपासून ही सेवा देण्यात येत असून, यासाठी नागरिकांकडून अत्यल्प भाडे आकारण्यात येत आहे. विशेष म्हणजे या सेवेद्वारे पाठवलेली वस्तू अवघ्या काही तासातच संबधित व्यक्तीकडे रवाना होत आहे. त्यामुळे जळगाव येथून मोठ्या प्रमाणावर पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात इतकेच नव्हे तर दिल्लीपर्यंत वस्तू पाठविण्यात आल्या असल्याचे भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. नागरिकांनीही या सेवेचा फायदा उचलला.दोन महिन्यांत १० हजार टन माल रवानाभुसावळ रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पार्सल यान व मालगाड्यांद्वारे जळगावहून आतापर्यंत विविध प्रकारच्या वस्तूंचा सुमारे १० हजार टन माल विविध राज्यात रवाना करण्यात आला आहे. या वस्तूंमध्ये धान्य, औषधांचा साठा, घरातील इतर जीवनावश्यक वस्तू यासह खते, बियाणे व गेल्या आठवड्यात दिल्ली येथे केळीदेखील पाठविण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. तसेच बाहेरूनदेखील काही नागरिकांच्या वस्तू रेल्वेने जळगावला आल्या. दरम्यान, या १० हजार टन मालामध्ये सर्वाधिक वाहतूक ही खते व बियाण्यांची झाल्याचेही सांगण्यात आले.एस. टी.द्वारे दहा दिवसांत तीनशे टन मालवाहतूककोरोनामुळे एस. टी. महामंडळाच्या सेवेला फटका बसला असून, कर्मचाऱ्यांच्या पगारासाठीदेखील महामंडळाकडे पैसे नव्हते. या तोट्यातून बाहेर निघण्यासाठी महामंडळातर्फे गेल्या आठवड्यापासून मालाची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. बसचे ट्रक मध्ये रूपांतर करून व्यापारी व उद्योजकांचा माल राज्यभरात विविध ठिकाणी पोहचविण्यात येत आहे. सेवा सुरू झाल्यापासून दहा दिवसांत महामंडळाच्या ट्रकद्वारे २६८ टन मालाची वाहतूक करण्यात आली असल्याचे विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा यांनी सांगितले.आगार निहाय मालाचे उत्पन्नआगार उत्पन्न१) जळगाव ९८,७९९ रूपये२) जामनेर १३,०३९३) रावेर १,१६,९९७४) चोपडा ३०,०३९५) एरंडोल २०,७३६६) यावल ६,३००७) अमळनेर ६,४७५८) भुसावळ ११,११०९) मुक्ताईनगर १५,१४५१०) पाचोरा १०,०००एकूण उत्पन्न ३,२८,६४०३० जूनपर्यंत सेवा... कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३० जून पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आल्याने तोपर्यंत मालवाहतूक सेवा सुरू राहणार असल्याचे भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी जळगाव स्थानक येथील पार्सल कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :railwayरेल्वेJalgaonजळगाव