शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

रेल्वेद्वारे १० हजार टन जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 12:08 IST

कोरोनातील उत्पन्न : बसने पावणेतीनशे टन मालाची वाहतूक

जळगाव : रेल्वे प्रशासनातर्फे लॉकडाऊनच्या काळात करण्यात आलेल्या मालवाहतुकीद्वारे आतापर्यंत जळगावरेल्वे स्थानकावरून १० हजार टन जीवनावश्यक वस्तू बाहेरगावी रवाना करण्यात आल्या आहेत.तसेच गेल्या पंधरा दिवसापासून एस. टी. महामंडळानेही सुरू केलेल्या मालवाहतुकीद्वारे आतापर्यंत ३०० टन मालाची वाहतूक करण्यात आली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्याने तेव्हापासून रेल्वे प्रशासनातर्फे प्रवासी सेवा बंद ठेवून फक्त जीवनावश्यक मालाची वाहतूक करण्यात येत आहे. नागरिकांना आपले नातलग व मित्र परिवाराला कुठलीही जीवनावश्यक वस्तू पाठविण्यासाठी प्रत्येक राज्यात मालगाड्या व पार्सल यान सोडण्यात येत आहे.रेल्वे प्रशासनातर्फे १ एप्रिलपासून ही सेवा देण्यात येत असून, यासाठी नागरिकांकडून अत्यल्प भाडे आकारण्यात येत आहे. विशेष म्हणजे या सेवेद्वारे पाठवलेली वस्तू अवघ्या काही तासातच संबधित व्यक्तीकडे रवाना होत आहे. त्यामुळे जळगाव येथून मोठ्या प्रमाणावर पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात इतकेच नव्हे तर दिल्लीपर्यंत वस्तू पाठविण्यात आल्या असल्याचे भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. नागरिकांनीही या सेवेचा फायदा उचलला.दोन महिन्यांत १० हजार टन माल रवानाभुसावळ रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पार्सल यान व मालगाड्यांद्वारे जळगावहून आतापर्यंत विविध प्रकारच्या वस्तूंचा सुमारे १० हजार टन माल विविध राज्यात रवाना करण्यात आला आहे. या वस्तूंमध्ये धान्य, औषधांचा साठा, घरातील इतर जीवनावश्यक वस्तू यासह खते, बियाणे व गेल्या आठवड्यात दिल्ली येथे केळीदेखील पाठविण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. तसेच बाहेरूनदेखील काही नागरिकांच्या वस्तू रेल्वेने जळगावला आल्या. दरम्यान, या १० हजार टन मालामध्ये सर्वाधिक वाहतूक ही खते व बियाण्यांची झाल्याचेही सांगण्यात आले.एस. टी.द्वारे दहा दिवसांत तीनशे टन मालवाहतूककोरोनामुळे एस. टी. महामंडळाच्या सेवेला फटका बसला असून, कर्मचाऱ्यांच्या पगारासाठीदेखील महामंडळाकडे पैसे नव्हते. या तोट्यातून बाहेर निघण्यासाठी महामंडळातर्फे गेल्या आठवड्यापासून मालाची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. बसचे ट्रक मध्ये रूपांतर करून व्यापारी व उद्योजकांचा माल राज्यभरात विविध ठिकाणी पोहचविण्यात येत आहे. सेवा सुरू झाल्यापासून दहा दिवसांत महामंडळाच्या ट्रकद्वारे २६८ टन मालाची वाहतूक करण्यात आली असल्याचे विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा यांनी सांगितले.आगार निहाय मालाचे उत्पन्नआगार उत्पन्न१) जळगाव ९८,७९९ रूपये२) जामनेर १३,०३९३) रावेर १,१६,९९७४) चोपडा ३०,०३९५) एरंडोल २०,७३६६) यावल ६,३००७) अमळनेर ६,४७५८) भुसावळ ११,११०९) मुक्ताईनगर १५,१४५१०) पाचोरा १०,०००एकूण उत्पन्न ३,२८,६४०३० जूनपर्यंत सेवा... कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३० जून पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आल्याने तोपर्यंत मालवाहतूक सेवा सुरू राहणार असल्याचे भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी जळगाव स्थानक येथील पार्सल कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :railwayरेल्वेJalgaonजळगाव