शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

महिंदळे येथील ट्रान्सफार्मर झाले जीवघेणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 17:56 IST

महिंदळे येथे वीजपुरवठा करण्यासाठी तीन ट्रान्सफार्मर आहेत. ह्या तीनही ट्रान्सफार्मरची फारच दुरवस्था झाल्यामुळे हे जीवघेणे ठरू पहात आहेत. जमिनीत वीजप्रवाह उतरल्याने गाय व वासरू नागरिकांच्या प्रसंगावधानाने बचावले.

ठळक मुद्देस्थानिक रहिवाशांनी केला वीजपुरवठा खंडितट्रान्सफार्मरजवळ वीजप्रवाह उतरल्यावर गाय व वासरू नागरिकांच्या प्रसंगावधानाने बचावलेगावातील तीनही ट्रान्सफार्मर देत आहेत धोक्याची घंटालोकवस्तीला लागून आहेत ट्रान्सफार्मरट्रान्सफार्मर येथून दुसऱ्या जागेवर जात नाही तोपर्यंत वीजपुरवठा सुरू होऊ देणार नाहीदोनशे ग्राहकांना धरले धारेवर१२ तास वीजपुरवठा बंद तरीही अधिकारी व कर्मचारी सुस्त

महिंदळे, ता.भडगाव, जि.जळगाव : महिंदळे येथे वीजपुरवठा करण्यासाठी तीन ट्रान्सफार्मर आहेत. ह्या तीनही ट्रान्सफार्मरची फारच दुरवस्था झाल्यामुळे हे जीवघेणे ठरू पहात आहेत. जमिनीत वीजप्रवाह उतरल्याने गाय व वासरू नागरिकांच्या प्रसंगावधानाने बचावले. त्यामुळे रहिवाशांनी तब्बल बारा तास वीजपुरवठा खंडित केला. जोपर्यंत ट्रान्सफार्मर स्थलांतरीत होत नाही तोपर्यंत आम्ही वीजपुरवठा सुरू करू देणार नाही, असा पावित्रा त्यांनी घेतला. संबंधित अभियंत्यास कळवूनही ते फिरकले नाही. शेवटी ग्रामस्थांनी मध्यस्थी करून १२ तासात वीजपुरवठा सुरू झाला व पुन्हा रात्री स्थानिक रहिवाशांनी बंद केला.सूत्रांनुसार, येथील तीनही ट्रान्सफार्मर शेवटच्या घटीका मोजत आहेत. येथे एकाही ट्रान्सफार्मरला कटआउट नाही. केबल उघडी पडलेली आहे. यामुळे येथे मुके प्राणी अनावधानाने जातात व मृत्युमुखी पडतात. हे ट्रान्सफार्मर वर्दळीच्या ठिकाणी असल्यामुळे येथे लहान मुलांना धोका होऊ शकतो. पाऊस पडल्यानंतर येथे जमिनीत वीजप्रवाह उतरतो. यामुळे मोठा धोका होऊ शकतो. गोरख गंभीर पाटील यांच्या घरासमोरच ट्रान्सफार्मर आहे. त्या ट्रान्सफार्मरमधून जमिनीत वीजप्रवाह उरला. जवळच त्यांची गाय व वासरू यांना विजेचा शॉक लागला. परंतु नागरिकांनी प्रसंगावधान राखत वीजपुरवठा खंडित केल्याने मोठा अनर्थ टळला.वेळोवेळी कळवूनही घेतली जात नाही दखलसंबंधित रहिवाशांनी वेळोवेळी वीज कंपनीच्या अभियंत्यास लेखी व तोंडी कळवूनही दखल घेत नाहीत व या तीनही ट्रान्सफार्मरची झालेली दैनावस्था पहाण्याची तसदी घेत नाहीत. ते जीवित हानी होण्याची वाट पहात आहेत की काय, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.पाऊस येतो मिनिटभर वीज जाते घंटाभरपरिसरात वाºयाची झुळूक किंवा पावसाचे दोन थेंब आले तरी वीजपुरवठा कधी तासभर तर कधी तासन्तास खंडित होते. याचे मुख्य कारण म्हणजे जीर्ण वीज वाहिन्या व पावसाळ्यापूर्वी झाडांची कटिंग न होणे यामुळे थोडी वाºयाची झुळूक व पावसाचे दोन थेंबही वीज वाहिन्या सहन करत नाहीत. तरीही संबंधित अधिकारी मात्र दुुर्लक्ष करतात.हे ट्रान्सफार्मर खरोखर धोकादायक आहेत. अगोदर ते मोकळ्या जागेत होते. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून ते लोकवस्तीत आल्याने ते धोकादायक ठरत आहेत. ते तीनही ट्रान्सफार्मर लवकरच इतरत्र हलवण्यात येतील.- जी. एस.मोरे, कनिष्ठ अभियंता, वीज कंपनी कार्यालय, भडगाव 

टॅग्स :MSRDCराज्य रस्ते विकास महामंडळBhadgaon भडगाव