शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

महिंदळे येथील ट्रान्सफार्मर झाले जीवघेणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 17:56 IST

महिंदळे येथे वीजपुरवठा करण्यासाठी तीन ट्रान्सफार्मर आहेत. ह्या तीनही ट्रान्सफार्मरची फारच दुरवस्था झाल्यामुळे हे जीवघेणे ठरू पहात आहेत. जमिनीत वीजप्रवाह उतरल्याने गाय व वासरू नागरिकांच्या प्रसंगावधानाने बचावले.

ठळक मुद्देस्थानिक रहिवाशांनी केला वीजपुरवठा खंडितट्रान्सफार्मरजवळ वीजप्रवाह उतरल्यावर गाय व वासरू नागरिकांच्या प्रसंगावधानाने बचावलेगावातील तीनही ट्रान्सफार्मर देत आहेत धोक्याची घंटालोकवस्तीला लागून आहेत ट्रान्सफार्मरट्रान्सफार्मर येथून दुसऱ्या जागेवर जात नाही तोपर्यंत वीजपुरवठा सुरू होऊ देणार नाहीदोनशे ग्राहकांना धरले धारेवर१२ तास वीजपुरवठा बंद तरीही अधिकारी व कर्मचारी सुस्त

महिंदळे, ता.भडगाव, जि.जळगाव : महिंदळे येथे वीजपुरवठा करण्यासाठी तीन ट्रान्सफार्मर आहेत. ह्या तीनही ट्रान्सफार्मरची फारच दुरवस्था झाल्यामुळे हे जीवघेणे ठरू पहात आहेत. जमिनीत वीजप्रवाह उतरल्याने गाय व वासरू नागरिकांच्या प्रसंगावधानाने बचावले. त्यामुळे रहिवाशांनी तब्बल बारा तास वीजपुरवठा खंडित केला. जोपर्यंत ट्रान्सफार्मर स्थलांतरीत होत नाही तोपर्यंत आम्ही वीजपुरवठा सुरू करू देणार नाही, असा पावित्रा त्यांनी घेतला. संबंधित अभियंत्यास कळवूनही ते फिरकले नाही. शेवटी ग्रामस्थांनी मध्यस्थी करून १२ तासात वीजपुरवठा सुरू झाला व पुन्हा रात्री स्थानिक रहिवाशांनी बंद केला.सूत्रांनुसार, येथील तीनही ट्रान्सफार्मर शेवटच्या घटीका मोजत आहेत. येथे एकाही ट्रान्सफार्मरला कटआउट नाही. केबल उघडी पडलेली आहे. यामुळे येथे मुके प्राणी अनावधानाने जातात व मृत्युमुखी पडतात. हे ट्रान्सफार्मर वर्दळीच्या ठिकाणी असल्यामुळे येथे लहान मुलांना धोका होऊ शकतो. पाऊस पडल्यानंतर येथे जमिनीत वीजप्रवाह उतरतो. यामुळे मोठा धोका होऊ शकतो. गोरख गंभीर पाटील यांच्या घरासमोरच ट्रान्सफार्मर आहे. त्या ट्रान्सफार्मरमधून जमिनीत वीजप्रवाह उरला. जवळच त्यांची गाय व वासरू यांना विजेचा शॉक लागला. परंतु नागरिकांनी प्रसंगावधान राखत वीजपुरवठा खंडित केल्याने मोठा अनर्थ टळला.वेळोवेळी कळवूनही घेतली जात नाही दखलसंबंधित रहिवाशांनी वेळोवेळी वीज कंपनीच्या अभियंत्यास लेखी व तोंडी कळवूनही दखल घेत नाहीत व या तीनही ट्रान्सफार्मरची झालेली दैनावस्था पहाण्याची तसदी घेत नाहीत. ते जीवित हानी होण्याची वाट पहात आहेत की काय, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.पाऊस येतो मिनिटभर वीज जाते घंटाभरपरिसरात वाºयाची झुळूक किंवा पावसाचे दोन थेंब आले तरी वीजपुरवठा कधी तासभर तर कधी तासन्तास खंडित होते. याचे मुख्य कारण म्हणजे जीर्ण वीज वाहिन्या व पावसाळ्यापूर्वी झाडांची कटिंग न होणे यामुळे थोडी वाºयाची झुळूक व पावसाचे दोन थेंबही वीज वाहिन्या सहन करत नाहीत. तरीही संबंधित अधिकारी मात्र दुुर्लक्ष करतात.हे ट्रान्सफार्मर खरोखर धोकादायक आहेत. अगोदर ते मोकळ्या जागेत होते. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून ते लोकवस्तीत आल्याने ते धोकादायक ठरत आहेत. ते तीनही ट्रान्सफार्मर लवकरच इतरत्र हलवण्यात येतील.- जी. एस.मोरे, कनिष्ठ अभियंता, वीज कंपनी कार्यालय, भडगाव 

टॅग्स :MSRDCराज्य रस्ते विकास महामंडळBhadgaon भडगाव