शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

कन्नड घाटात वाहतुकीचा खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 2:50 PM

औरंगाबाद मागार्वर  कन्नड  घाटात शुक्रवारी सायंकाळी पासून शनिवारी दुपारी बारापर्यंत १५ तास वाहतूक खोळंबली होती.

ठळक मुद्देआठ किमीपर्यंत रांगा : शुक्रवारी सायंकाळपासून ते शनिवापर्यंत वाहतूक ठप्प 

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : औरंगाबाद मागार्वर  कन्नड  घाटात शुक्रवारी सायंकाळी पासून शनिवारी दुपारी बारापर्यंत १५ तास वाहतूक खोळंबली होती.त्यामुळे सुमारे पाचशे पेक्षा अधिक वाहने घाटात अडकून पडली होती. घाटाच्या पायथ्यापासून थेट वरपर्यंत  आठ कि.मी. पर्यत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यात अवजड वाहनांसह इतर छोटी-मोठी वाहनाचा समावेश होता. अडकून पडलेल्या वाहनांमध्ये अवजड वाहतुकीबरोबरच छोट्या वाहनांचाही समावेश असल्याने प्रवास करणारे अनेकजण हवालदिल झाले होते. एक दोन नव्हे तर तब्बल पंधरा तास याठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाला  होता. त्यामुळे प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला.घाटात एवढी वाहतूक यंत्रणा ठप्प होवूनसुद्धा महामार्गावरील पोलीस वेळीच येवू शकले नाही. रात्री वाहतूक सुरळीत करण्यासाठी काही वाहनधारक पुढे आल्याने त्यांची अक्षरशः दमछाक झाली. घाटातील वाहतूक जाममुळे प्रवाशांना विनाकारण नाहक मनस्ताप सहन करावा लागला. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक -२११ वरील कन्नड घाट आहे. उत्तर व दक्षिण भारताला जोडणाऱ्या या महामार्गावरून दररोज हजारो अवजड वाहनांसह इतर वाहने या घाटातून जात असतात.  पावसामुळे  कन्नड घाटातील रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे  पडले आहेत. घाटात यु आकाराची अनेक वळणे आहेत. शुक्रवारी सायंकाळी घाटातील वळणावर अवजड वाहन बंद पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.

 

टॅग्स :JalgaonजळगावAurangabadऔरंगाबादTrafficवाहतूक कोंडीkannad-acकन्नड